शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

आरोग्याबाबत जागृतीची गरज

By admin | Updated: August 1, 2015 01:14 IST

प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन : हेमलकसा येथे प्रचार कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा

भामरागड : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांमध्ये अजुनही आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती नाही. शासन व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन व्यापक प्रमाणात जनजागृतीची मोहीम हाती घेण्याची गरज आहे. असे झाल्यास माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांचेही आयुष्यमान वाढेल, असे प्रतिपादन समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात माता व बाल आरोग्य अभियान तसेच मिशन इंद्रधनुष्य (लसीकरण) अभियान निमित्त क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे कर्मचारी यांच्यासाठी जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मंदाकिनी आमटे सहायक निर्देशक प्रभावती आकाशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा प्रभावती आकाशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मंदाकिनी आमटे यांनी क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे कर्मचारी व अधिकारी ग्रामीण भागातील नागरिकांना प्रत्यक्ष भेटून जनजागृतीचे कार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांचे कार्य अत्यंत प्रसंशनीय असल्याचे प्रतिपादन केले. बालकाच्या आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून बालकाची काळजी कशा पध्दतीने घेण्यात यावी, बालकांना होणारे विविध प्रकारचे आजार यावरसुध्दा प्रकाश टाकला. या कार्यशाळेत महाराष्ट्र व गोवा प्रदेश सहायक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)