शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

आरोग्याबाबत जागृतीची गरज

By admin | Updated: August 1, 2015 01:14 IST

प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन : हेमलकसा येथे प्रचार कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा

भामरागड : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांमध्ये अजुनही आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती नाही. शासन व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन व्यापक प्रमाणात जनजागृतीची मोहीम हाती घेण्याची गरज आहे. असे झाल्यास माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांचेही आयुष्यमान वाढेल, असे प्रतिपादन समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात माता व बाल आरोग्य अभियान तसेच मिशन इंद्रधनुष्य (लसीकरण) अभियान निमित्त क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे कर्मचारी यांच्यासाठी जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मंदाकिनी आमटे सहायक निर्देशक प्रभावती आकाशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा प्रभावती आकाशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मंदाकिनी आमटे यांनी क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे कर्मचारी व अधिकारी ग्रामीण भागातील नागरिकांना प्रत्यक्ष भेटून जनजागृतीचे कार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांचे कार्य अत्यंत प्रसंशनीय असल्याचे प्रतिपादन केले. बालकाच्या आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून बालकाची काळजी कशा पध्दतीने घेण्यात यावी, बालकांना होणारे विविध प्रकारचे आजार यावरसुध्दा प्रकाश टाकला. या कार्यशाळेत महाराष्ट्र व गोवा प्रदेश सहायक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)