शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

शिक्षकांच्या बदल्या करण्यास टाळाटाळ

By admin | Updated: May 21, 2016 01:26 IST

शासन निर्णयानुसार दरवर्षी शिक्षकांच्या बदल्या करणे अनिवार्य असतानाही जिल्हा परिषदेने यावर्षी पहिल्यांदाच शिक्षकांच्या बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले नाही.

आंदोलनाचा इशारा : ४०० पेक्षा अधिक शिक्षक बदलीसाठी पात्र; तीव्र असंतोषगडचिरोली : शासन निर्णयानुसार दरवर्षी शिक्षकांच्या बदल्या करणे अनिवार्य असतानाही जिल्हा परिषदेने यावर्षी पहिल्यांदाच शिक्षकांच्या बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले नाही. त्यामुळे बदल्या होणार नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या या अनागोंदी कारभारामुळे जिल्हाभरातील शिक्षकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरूवातीला ११, १२ व १३ मे रोजी शिक्षकांच्या बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु शिक्षकांची संच मान्यता व समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय शिक्षकांच्या बदल्या करणे उचित होणार नाही, ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर राज्याच्या प्रधान शिक्षण सचिवांनी संच मान्यता तत्काळ करून शिक्षकांचे समायोजन करावे व त्यानंतर शिक्षकांच्या बदल्या करण्याबाबतचे पत्र १६ मे रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविले. त्यानुसार शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आदिवासी, नक्षलग्रस्त भागामध्ये मागील १५ ते २० वर्षांपासून काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये बदलीची आशा निर्माण झाली होती. बदल्यांचे प्रमाण २० टक्क्यावरून ३० टक्के वाढवून देण्यात आले आहे. शिक्षण विभागाने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये शिक्षक समायोजनाची प्रक्रिया २६ मे रोजी राबविण्याचे अधिकार पंचायत समितीला दिले आहेत. त्यातून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे २८ मे रोजी जिल्हास्तरावर समायोजन ठेवले आहे. २९ मे रोजी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या बदल्या आयोजित केल्या आहेत. परंतु प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे दुर्गम भागातील शिक्षकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. शिक्षकांच्या बदल्या करू नये, असे कुठलेही शासन निर्देश नसताना देखील शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षकांच्या बदल्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे न उलगडणारे कोडे आहे. या बदली प्रक्रियेमुळे सात तालुक्यांमधून किमान ४०० प्राथमिक शिक्षक व ७० ते ८० पदवीधर शिक्षकांच्या बदल्या झाल्या असत्या. दुर्गम भागामध्ये आयुष्य काढणाऱ्या शिक्षकांना शहराच्या जवळपास येण्याची संधी प्राप्त झाली असती. बदल्याच रद्द झाल्याने शिक्षकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. काही शिक्षकांनी बदली टाळण्यासाठी शिक्षण विभाग व जिल्हा परिषद प्रशासनात फिल्डिंग लावल्याचेही बोलले जात आहे. शिक्षकांच्या बदल्या न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गडचिरोलीच्या वतीने देण्यात आला आहे. (नगर प्रतिनिधी)समायोजन व बदलीचे अधिकार सीईआेंनाच१८ मे २०११ च्या शासन निर्णयानुसार शिक्षकांची संच मान्यता झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याची तरतूद आहे. मात्र ही सर्व प्रक्रिया जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अखत्यारित पार पाडणे आवश्यक आहे. मात्र या शासन निर्णयाला पायदळी तुडवत पंचायत समित्यांना समायोजन करण्याचे अधिकार दिले आहेत. हे अधिकार अवैध आहेत. तालुकास्तरावर समायोजनाची प्रक्रिया राबविल्यामुळे गोंधळ निर्माण होण्याची व आर्थिक देवाणघेवाणीला चालना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.