शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

‘ई-पास’साठी दरदिवशी सरासरी १५० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST

जिल्हाबंदी केल्यास नागरिकांच्या अनावश्यक प्रवासावर बरीच बंधने येऊ शकत असल्याने संचारबंदीचे नियम कडक करताना शासनाने जिल्हाबंदीचा निर्णय घेतला आहे. ...

जिल्हाबंदी केल्यास नागरिकांच्या अनावश्यक प्रवासावर बरीच बंधने येऊ शकत असल्याने संचारबंदीचे नियम कडक करताना शासनाने जिल्हाबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या प्रमुख मार्गांवर पाेलीस विभागाने चाैक्या बसविल्या आहेत. पाेलीस विभागाकडून काढलेले ई-पास असल्याशिवाय आपल्या जिल्ह्यातील व्यक्तीला दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ देऊ नये व दुसऱ्या जिल्ह्यातील व्यक्तीला आपल्या जिल्ह्यात प्रवेश दिला जाऊ नये, असे शासनाचे निर्देश आहेत. काेराेनाचा प्रसार वाढला असल्याने नागरिक दुसऱ्या जिल्ह्यात सहजासहजी जात नाही. वैद्यकीय कारण असेल तर मात्र दुसऱ्या गावी जावे लागते. अशावेळी पाेलीस विभागाकडून ई-पासच्या माध्यमातून परवानगी मागावी लागते. पाेलीस विभागाकडे दरदिवशी जवळपास १५० अर्ज प्राप्त हाेतात. त्यापैकी सरासरी केवळ ४० ते ५० अर्जच शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार वैद्य ठरत असल्याने त्यांना परवानगी दिली जात आहे. २२ एप्रिल ते ४ मे या कालावधीत जवळपास १ हजार ८०० अर्ज प्राप्त झाले आहेत.

बाॅक्स

ई-पाससाठी असा करावा अर्ज

ई-पास काढण्यासाठी https://covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येते. या ठिकाणी विचारलेले आवश्यक कारण, कागदपत्रे नमूद करावीत. त्यानंतर फाेटाे अपलाेड करून अर्ज सबमिट करावा. अर्ज सादर केल्यानंतर एक टाेकन आयडी मिळेल. हा आयडी सेव्ह करून ठेवावा. या आयडीवरूनच ई-पास डाऊनलाेड करता येईल.

बाॅक्स

शेतीच्या कारणावरून सर्वाधिक अर्ज

मागील वर्षी शेतीचा हंगाम सुरू झाल्याने दुसऱ्या जिल्ह्यात शेती असल्यास संबंधित शेतकऱ्याला जाण्याची परवानगी दिली जात हाेती. यावर्षी शेतीचा हंगाम अजून सुरू झालेला नाही. मात्र, शेतीची कारणे सांगून अनेक अर्ज प्राप्त हाेत आहेत. शेतीच्या कारणावरून ई-पास देण्याचे अजूनपर्यंत शासनाकडून निर्देश प्राप्त झाले नसल्याने पाेलीस विभाग असे अर्ज नामंजूर करीत आहेत. वैद्यकीय कारण, आजारी नातेवाइकांना भेटणे, अंत्यविधी आदी कारणांसाठी पास दिले जात आहेत.

बाॅक्स

पाससाठी ही कागदपत्रे हवीत

ई-पास काढण्यासाठी सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून काेविड-१९ चे काेणतेही लक्षण नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र असावे. ज्या वाहनाने प्रवास करणार आहात त्या वाहनाचा नंबर, एक पासपाेर्ट साईज फाेटाे आवश्यक आहे.

बाॅक्स

चाेवीस तासांत मिळतो पास

ई-पास देण्यासाठी पाेलीस विभागाच्या डीएसबी शाखेत तीन पाेलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राप्त अर्जांची या विभागाकडून शहानिशा केली जाते. त्यानंतर पास दिले जातात. ही सर्व प्रक्रिया चाेवीस तासांच्या आत पूर्ण करून पास दिला जातो किंवा अर्ज रिजेक्ट केला जातो.

आतापर्यंत प्राप्त अर्ज - १८००

आतापर्यंत दिलेले पास - ६००