शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

देसाईगंजमधील शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:11 IST

देसाईगंजच्या गुलमोहर कॉलनीतील गांधी वॉर्डमध्ये असलेल्या शासनाच्या खुल्या जागेवर काही बेघर गरीब कुटुंबांनी बांधलेल्या झोपड्या नगर परिषदेच्या वाहनांची मदत घेत पोलिसांनी रात्री ११ वाजता उठविल्या. यावेळी त्या कुटुंबांना शिवीगाळ आणि मारहाणही झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देझोपडीधारकांना मारहाण : रात्री ११ वाजता केले बेघर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंजच्या गुलमोहर कॉलनीतील गांधी वॉर्डमध्ये असलेल्या शासनाच्या खुल्या जागेवर काही बेघर गरीब कुटुंबांनी बांधलेल्या झोपड्या नगर परिषदेच्या वाहनांची मदत घेत पोलिसांनी रात्री ११ वाजता उठविल्या. यावेळी त्या कुटुंबांना शिवीगाळ आणि मारहाणही झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुसऱ्या कोणाला ती शासकीय जागा हडपण्यास मदत करण्यासाठी आम्हाला तेथून हटविण्यात आले असून आम्हाला हक्काचा निवारा देऊन न्याय द्यावा, अशी मागणी बेघर कुटुंबियांनी उपविभागीय अधिकाºयांमार्फत जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.सदर निवेदनात नमुद केल्यानुसार, देसाईगंजच्या गुलमोहर कॉलनी परिसरात महसूल व वनविभागाची काही जागा अनेक वर्षांपासून रिकामी पडून आहे. ती जागा हडपण्याच्या उद्देशाने कोणीतरी त्या जागेत बांधकाम साहित्य आणले होते. दरम्यान आतापर्यंत कुठेतरी आडोशाने राहणाºया गोरगरीब २५ कुटुंबांनी या शासकीय जागेत (सर्व्हे नं.४३२) काही दिवसांपूर्वी आश्रय घेतला. मात्र दि.२२ आॅक्टोबरच्या रात्री ११ च्या सुमारास अचानक पोलिसांचा ताफा आला आणि त्यांनी काहीही सूचना न करता त्यांच्या काठ्यांनी मारणे सुरू केले. आमचा गुन्हा काय, अशी विचारणा केली असता ते काहीही ऐकायला तयार नव्हते. विशेष म्हणजे पोलिसांच्या ताफ्यासोबत नगर परिषदेचा कर्मचारी व ट्रॅक्टरसुद्धा झोपडीवाल्यांचे साहित्य नेण्यासाठी होता. त्यामुळे त्या जागेसंदर्भात नगर परिषदेचा संबंध काय? ती जागा नगर परिषदेच्या मालकीची नाही किंवा शासनाने कोणत्या कारणासाठी ती जागा कोणाला दिलेली नाही. मग असे असताना आम्हाला हटविण्यात नगर परिषदेने पुढाकार घेण्याची गरज काय? असा सवाल तक्रारकर्त्यांनी केला आहे.झोपडीधारकांवरील कारवाई नियमबाह्यवास्तविक कोणत्याही शासकीय जागेतील अतिक्रमण हटविताना संबंधितांना आधी नोटीस द्यावी लागते. त्यानंतरही ते स्वत:हून हटले नाही जबरीने अतिक्रमण काढता येते. पण सायंकाळी ६ वाजताच्या नंतर राहत्या घराचे अतिक्रमण हटविता येत नाही. असे असताना या प्रकरणात रात्री ११ वाजता कारवाई करून गोरगरीब कुटुंबांना बेघर कसे केले? असा प्रश्न तक्रारकर्त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी विमल बोरडे, पुष्पा रामटेके, राणी बन्सोड, शालू मेश्राम, विणा मेश्राम, तारा मडावी, विमल कनोजिया, कल्पना भोयर, सुशिला गजभिये, अन्वरी अंसारी, कनिजा शेख आदी अनेक महिला व पुरूषांनी केली आहे.