शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीच्या अधिवासात गेल्याने हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:43 IST

५ एप्रिल ते १३ मे २०१७ या कालावधीत वडसा व आरमोरी वनपरिक्षेत्रातील रवी, कोंढाळा येथील दोन व्यक्तींवर वाघीनीने हल्ला करून ठार मारल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही घटना सदर मृतक व्यक्ती वाघीनीच्या अधिवासात ....

ठळक मुद्देरवी, कोंढाळातील घटना : राष्टÑीय व्याघ्र संवर्धन समितीचा प्रमाणभूत निष्कर्ष

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : ५ एप्रिल ते १३ मे २०१७ या कालावधीत वडसा व आरमोरी वनपरिक्षेत्रातील रवी, कोंढाळा येथील दोन व्यक्तींवर वाघीनीने हल्ला करून ठार मारल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही घटना सदर मृतक व्यक्ती वाघीनीच्या अधिवासात गेल्याने घडल्या, असा प्रमाणभूत निष्कर्ष राष्टÑीय व्याघ्र संवर्धन समितीच्या सदस्यांनी काढला आहे.सदर घटनेतील कोंढाळा येथील मृत व्यक्ती हा मोहफूल गोळा करण्यासाठी सदर वाघीनीच्या अधिवासात गेला होता. तर दुसºया घटनेतील रवी गावातील एका शेतात उन्हाळी धान लावल्याने हा भाग एखाद्या गवती रमण्याप्रमाणे होता. शेतात मोटारपंप लावल्याने शेतात मुबलक पाणी होता. उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्त्रोत नष्ट होत असतात. तसेच हिरवळ वाढत नसल्याने अन्य प्राण्यांच्या पाण्याच्या हिरवळीच्या ठिकाणी वाघीनीचे वास्तव असते. त्यामुळे वाघासारख्या प्राण्याला मानवी चाहूल लागली तर आपल्याला धोका आहे, असे समजून भीतीपोटी वाघासारखे प्राणी मानवावर हल्ला करतात. मांजर वंशातील हे वन्यजीव हिंस्त्र असले तरी तेवढेच भितरे असतात. म्हणूनच या दोन्ही घटना आणि जनावरे ठार केल्याच्या घटना अशाच प्रकारातून घडल्या आहेत. त्यामुळे ती वाघीन नरभक्षक ठरविणे योग्य नसून हल्लेखोर होती, असा समितीचा निष्कर्ष अहवालात नमूद आहे.या मादी वाघीनीला १२ आॅगस्ट रोजी आरमोरी तालुक्याच्या रवी गावाजवळ बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. परिस्थिती तपासून सदर वाघीनीला गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूर येथे ठेवण्यात आले. तांत्रिक समितीने सर्व घटना व परिस्थिती तपासून सदर वाघीनीस सुरक्षित अधिवासात मुक्त करण्याच्या केलेल्या शिफारशिस राज्यस्तरीय समितीने सहमती दर्शविली आहे. जंगलव्याप्त क्षेत्र ही वन्यजीवाची निवासस्थाने असतात. जंगले मोठ्या प्रमाणात नष्ट झाली तर वन्यप्राणी मोकळ्या जागेत येतात. मानवाकडून त्यांचे निवारा व निवासस्थान हिसकविल्याने नाईलाजास्तव वन्यजीवांचे मानवावरील हल्ले वाढतात, अशीही तरतूद राष्टÑीय व्याघ्र संवर्धन समितीच्या अहवालात नमूद आहे. यापूर्वीही वन्यप्राण्यांचे निवासस्थान असलेल्या क्षेत्रात मानवाचे अधिवास वाढल्याने मानवावर हल्ले झाले आहेत.जनता व प्रसारमाध्यमांनी संयम बाळगावा- तांबटकरएखाद्या जंगलव्याप्त क्षेत्रात तडस, बिबट्या, वाघ या वन्यजीवांची चाहूल लागली तरी गैरसमजापोटी नागरिकांमध्ये विनाकरण भीतीचे वातावरण निर्माण होत असते. यावर कोणतीही शहानीशा न करून प्रसारमाध्यमांमार्फत त्याचे अवडंबर माजविले जाते. धोकादायक स्थिती असली तरी वनविभाग त्याची पूर्णत: दखल घेत असते. वर्तमानपत्रातून बातम्या प्रकाशित करताना पत्रकार व प्रसारमाध्यमांनी संयम बाळगावा, असे आवाहन आरमोरीचे वनपरिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांनी केले आहे.