शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

सुरजागड लोहप्रकल्पावरून वातावरण तापले

By admin | Updated: April 14, 2016 01:36 IST

सुरजागड लोहप्रकल्प हा एटापल्ली येथेच उभारण्यात यावा, खासगी कंपनी कच्या लोहखनिजाची वाहतूक करीत आहे.

आविसंचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण : बचाव समितीचे ३२ कार्यकर्ते दुसऱ्या दिवशीही साखळी उपोषणावरएटापल्ली : सुरजागड लोहप्रकल्प हा एटापल्ली येथेच उभारण्यात यावा, खासगी कंपनी कच्या लोहखनिजाची वाहतूक करीत आहे. ती बंद करून जनसुनावणी घेण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाचे नेतृत्व माजी आमदार दीपक आत्राम यांनी केले. या आंदोलनात जि.प. सभापती अजय कंकडालवार, जि.प. सदस्य कारू रापंजी, गीता हिचामी, मंदा शंकर, आविसंचे सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगम, रवी सल्लम, मंगेश हलामी, श्रीकांत चिप्पावार, रूनिता तलांडे, सरपंच हरिष पदा, रमेश वैरागडे, शंकर दासरवार, रवी खोब्रागडे, गुरूदेव पेंदाम व एटापल्ली तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एटापल्लीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात एटापल्ली तालुक्यात सुशिक्षीत बेरोजगारांना प्रशिक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे व प्रकल्प स्थळाचा विकास करावा, या भागात मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करावे, असे म्हटले आहे. तर सुरजागड बचाव संघर्ष समितीच्या वतीने १२ एप्रिलपासून बसस्थानकासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. शासनाने प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी व तोपर्यंत लोहखनिजाची वाहतूक बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बुधवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता. सुरेश बारसागडे यांच्या नेतृत्वात हे उपोषण सुरू असून उपोषण मंडपाला काँग्रेसच्या नेत्या सगुना तलांडी यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी यावेळी चर्चा केली. या उपोषणात ३२ कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.सुरजागड प्रकल्प जिल्ह्यातच व्हावा - नाना पटोले यांची मागणीदेसाईगंज : लोहखनिज प्रकल्प इतर जिल्ह्यात होणे ही अन्यायपूर्ण बाब असून तो प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातच झाला पाहिजे व येथेच लोहनिर्मितीची पूर्ण प्रक्रिया पार पडली पाहिजे. अन्यथा आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू व एकही लोह दगड येथून नेऊ देणार नाही, असा इशारा भंडारा, गोंदिया येथील खासदार नाना पटोले यांनी देसाईगंज येथे पत्रकारांशी बोलताना दिला. देसाईगंज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, २००६ मध्ये आमदार असताना सार्वजनिक उपक्रम समितीच्या दौऱ्यात गडचिरोली जिल्ह्यात आपण ही मागणी लावून धरली होती. जिल्ह्यातील जनतेला फक्त वेठबिगाराप्रमाणे लोहउत्खननाच्या कामासाठी वापरून प्रकल्प इतरत्र सुरू व्हावा, ही बाब उद्योगविरहित जिल्ह्यासाठी अन्यायकारक ठरेल. येथे लोह प्रकल्प सुरू झाल्यास जिल्ह्याचा चौफेर विकास होईल. ही बाब आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मांडणार आहो. जिल्ह्याबाहेर प्रकल्प नेण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन उभारू, असे ते म्हणाले. यावेळी जेसा मोटवानी उपस्थित होते.