शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

सुरजागड लोहप्रकल्पावरून वातावरण तापले

By admin | Updated: April 14, 2016 01:36 IST

सुरजागड लोहप्रकल्प हा एटापल्ली येथेच उभारण्यात यावा, खासगी कंपनी कच्या लोहखनिजाची वाहतूक करीत आहे.

आविसंचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण : बचाव समितीचे ३२ कार्यकर्ते दुसऱ्या दिवशीही साखळी उपोषणावरएटापल्ली : सुरजागड लोहप्रकल्प हा एटापल्ली येथेच उभारण्यात यावा, खासगी कंपनी कच्या लोहखनिजाची वाहतूक करीत आहे. ती बंद करून जनसुनावणी घेण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाचे नेतृत्व माजी आमदार दीपक आत्राम यांनी केले. या आंदोलनात जि.प. सभापती अजय कंकडालवार, जि.प. सदस्य कारू रापंजी, गीता हिचामी, मंदा शंकर, आविसंचे सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगम, रवी सल्लम, मंगेश हलामी, श्रीकांत चिप्पावार, रूनिता तलांडे, सरपंच हरिष पदा, रमेश वैरागडे, शंकर दासरवार, रवी खोब्रागडे, गुरूदेव पेंदाम व एटापल्ली तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एटापल्लीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात एटापल्ली तालुक्यात सुशिक्षीत बेरोजगारांना प्रशिक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे व प्रकल्प स्थळाचा विकास करावा, या भागात मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करावे, असे म्हटले आहे. तर सुरजागड बचाव संघर्ष समितीच्या वतीने १२ एप्रिलपासून बसस्थानकासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. शासनाने प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी व तोपर्यंत लोहखनिजाची वाहतूक बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बुधवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता. सुरेश बारसागडे यांच्या नेतृत्वात हे उपोषण सुरू असून उपोषण मंडपाला काँग्रेसच्या नेत्या सगुना तलांडी यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी यावेळी चर्चा केली. या उपोषणात ३२ कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.सुरजागड प्रकल्प जिल्ह्यातच व्हावा - नाना पटोले यांची मागणीदेसाईगंज : लोहखनिज प्रकल्प इतर जिल्ह्यात होणे ही अन्यायपूर्ण बाब असून तो प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातच झाला पाहिजे व येथेच लोहनिर्मितीची पूर्ण प्रक्रिया पार पडली पाहिजे. अन्यथा आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू व एकही लोह दगड येथून नेऊ देणार नाही, असा इशारा भंडारा, गोंदिया येथील खासदार नाना पटोले यांनी देसाईगंज येथे पत्रकारांशी बोलताना दिला. देसाईगंज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, २००६ मध्ये आमदार असताना सार्वजनिक उपक्रम समितीच्या दौऱ्यात गडचिरोली जिल्ह्यात आपण ही मागणी लावून धरली होती. जिल्ह्यातील जनतेला फक्त वेठबिगाराप्रमाणे लोहउत्खननाच्या कामासाठी वापरून प्रकल्प इतरत्र सुरू व्हावा, ही बाब उद्योगविरहित जिल्ह्यासाठी अन्यायकारक ठरेल. येथे लोह प्रकल्प सुरू झाल्यास जिल्ह्याचा चौफेर विकास होईल. ही बाब आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मांडणार आहो. जिल्ह्याबाहेर प्रकल्प नेण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन उभारू, असे ते म्हणाले. यावेळी जेसा मोटवानी उपस्थित होते.