शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जंगली हत्तींमुळे झालेल्या नुकसानीची मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2022 05:00 IST

प्रचलित शासन निर्णयामध्ये वन्यहत्तींमुळे इमारती/ घरांचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई देण्याच्या तरतुदींचा समावेश नव्हता. १७ जून राेजी काढलेल्या शासन निर्णयात मदत देण्याची तरतूद  करण्यात आली आहे.  हत्तींनी केलेल्या नुकसानीची तक्रार घटनेच्या तीन दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. वन्यहत्तींकडून ज्या मालमत्तेचे नुकसान झाले असेल अशी मालमत्ता, साहित्य जागेवरील वस्तुस्थितीचा पंचनामा होईपर्यंत घटनास्थळावरून हलविलेली नसावी.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्यात वन्यहत्तींचा अधिवास आढळून येत नाही. तथापि, इतर राज्यांतून येणाऱ्या वन्यहत्तींमुळे होणारे शेतपिकाचे नुकसान, तसेच इतर मालमत्तेच्या होणाऱ्या नुकसानीपोटी अर्थसाहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तथापि, प्रचलित शासन निर्णयामध्ये वन्यहत्तींमुळे इमारती/ घरांचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई देण्याच्या तरतुदींचा समावेश नव्हता. १७ जून राेजी काढलेल्या शासन निर्णयात मदत देण्याची तरतूद  करण्यात  आली  आहे. हत्तींनी केलेल्या नुकसानीची तक्रार घटनेच्या तीन दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. वन्यहत्तींकडून ज्या मालमत्तेचे नुकसान झाले असेल अशी मालमत्ता, साहित्य जागेवरील वस्तुस्थितीचा पंचनामा होईपर्यंत घटनास्थळावरून हलविलेली नसावी. प्रत्येकप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळावर जाऊन संबंधित  वनपरिक्षेत्र अधिकारी, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, तलाठी/ ग्रामसेवक या तीन सदस्यांच्या समितीमार्फत १४ दिवसांच्या आत पंचनामा करण्यात येईल व नुकसानीचे मूल्यमापन ठरवून अहवाल संबंधित सहायक वनसंरक्षक / विभागीय वन अधिकारी / उपवनसंरक्षक यांना सादर करतील. संबंधित सहायक वनसंरक्षक / विभागीय वन अधिकारी / उपवनसंरक्षकांनी आदेश काढल्यानंतर ३ कामाच्या दिवसांच्या आत किंवा घटनेची तक्रार प्राप्त झाल्यापासून २६ दिवसांच्या आत आर्थिक साहाय्याची रक्कम बाधित व्यक्तीच्या खात्यात जमा केला जाईल किंवा रेखांकित धनादेश हस्तांतरित केला जाईल, असे निर्णयात म्हटले आहे.

यांना नाही मिळणार लाभ    वनजमिनीवर अतिक्रमणाद्वारे शेती करण्यात येत असेल, तर संबंधितास अर्थसाहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.     भारतीय वन अधिनियम, १९२७ किंवा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये ज्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला गेला आहे, अशा व्यक्तीस सदरचा लाभ देय राहणार नाही.     ज्या कुटुंबाची चारपेक्षा अधिक गुरे मुक्त चराईसाठी जंगलात जातात त्यांना अर्थसाहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.

...अशी मिळणार मदत 

शेती अवजारे व उपकरणे, बैलगाडीचे नुकसान झाल्यास नुकसानीची रक्कम मात्र जास्तीत जास्त पाच हजार रुपये, संरक्षक भिंत किंवा कुंपणाचे नुकसान झाल्यास जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल. काैलारू घराचे नुकसान झाल्यास ५० हजार व स्लॅबच्या घराचे नुकसान झाल्यास एक लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग