शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल १९४ कोटींचे धान उघड्यावर, अवकाळीचे सावट

By दिलीप दहेलकर | Updated: May 17, 2024 22:59 IST

आजच्या तारखेस महामंडळाच्या जिल्हयात तब्बल १९४ कोटी रूपयाचे एकूण ८ लाख ९४ हजार क्विंटल धान केंद्राच्या परिसरात ताडपत्री झाकुन उघडयावर ठेवण्यात आले आहेत.

गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आविका संस्थामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामात आधारभूत किमंत खरेदी योजनेअंतर्गत माेठया प्रमाणात धानाची खरेदी करण्यात आली. मात्र मिलर्संकडून अजुनही धानाची उचल व भरडाई न झाल्याने कोट्यवधींचे धान उघडयावर आहे. आजच्या तारखेस महामंडळाच्या जिल्हयात तब्बल १९४ कोटी रूपयाचे एकूण ८ लाख ९४ हजार क्विंटल धान केंद्राच्या परिसरात ताडपत्री झाकुन उघडयावर ठेवण्यात आले आहेत.

आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत चालू वर्षातील खरीप हंगामात तब्बल ५० केंद्रांवरून धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी अजुनही १०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचे धान्य ताडपत्री झाकून उघड्यावर ठेवण्यात आले आहे. उर्वरित धान गोदाम व शेडमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्यास्थितीत गडचिरोली कार्यालयांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या एकूण धानापैकी ४ लाख ८५ हजार क्विंटल धान उघड्यावर आहे.

महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत एकूण ८ लाख ५५ हजार रूपयाचे धान खरीप हंगामात आविका संस्थांच्या मार्फतीने खरेदी करण्यात आले आहे. यापैकी १ लाख ७१ हजार धान शेडमध्ये तसेच काही धान गोदामामध्ये साठवून ठेवण्यात आले आहे. या अहेरी उपविभागातही तब्बल ४ लाख ९ हजार क्विंटल धान सध्यास्थितीत उघड्यावर आहे. याबाबत गडचिरोलीच्या कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक बावणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बराच वेळ व्यस्त दाखवत हाेता. त्यामुळे यात त्यांची प्रतिक्रीया जाणून घेता आली नाही.

वाहतूक व मिलिंग दर जुनाचशासनाच्या वतीने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून राईस मिल व्यावसायिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप होत आहे. धान वाहतूक व मिलिंगचे दर प्रति क्विंटल १० रूपये मिलिंग दर शासनाच्या वतीने देण्यात येतो. अलिकडे महागाई प्रचंड वाढली असून डिझेलचे भाव वाढले आहेत. विद्युत बिलाचे दर वाढल्याने राईस मिलर्सना अडचणी येतात. त्यामुळे शासनाने मिलिंग व वाहतुकीचा दर वाढवावा, अशी मागणी मिलर्स असाेसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

उचलसाठी २० जुनपर्यंत मुदतखरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाची उचल पावसाळ्यापूर्वी २० जून २०२४ पर्यंत शासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र मिलर्सने असहकार आंदोलन पुकारल्यामुळे यंदा केंद्राच्या परिसरातून महामंडळाच्या धानाची उचल झाली नाही. भरडाईची प्रक्रिया अजुनही सुरू झाली नाही.

नुकसानीस जबाबदार कोण?महामंडळाच्या ताडपत्री झाकून उघड्यावर ठेवण्यात आलेल्या धानाला अवकाळी पासवाचा फटका बसत आहे. पुन्हा जुन महिन्यांपासून पावसाने जोरदार झोडपल्यास नुकसानीला जबाबदार काेण राहणार? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. शासन, प्रशासन की वरीष्ठ अधिकारी हे सध्यातरी अनुत्तरीत आहे.

स्थानिक स्तरावर उचल करण्यासाठी राईस मिलर्सची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र महागाईच्या काळात जुन्या दरानुसार मिलिंग व वाहतूक करणे परवडत नसल्याने त्यांचा उचल करण्यास नकार आहे. हा प्रश्न शासनस्तरावर प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आला असून याबाबत निर्णय व्हायचा आहे.- बी. एस. बरकमकर, उपप्रादेशिक व्यवस्थापक, अहेरी. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली