शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल १९४ कोटींचे धान उघड्यावर, अवकाळीचे सावट

By दिलीप दहेलकर | Updated: May 17, 2024 22:59 IST

आजच्या तारखेस महामंडळाच्या जिल्हयात तब्बल १९४ कोटी रूपयाचे एकूण ८ लाख ९४ हजार क्विंटल धान केंद्राच्या परिसरात ताडपत्री झाकुन उघडयावर ठेवण्यात आले आहेत.

गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आविका संस्थामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामात आधारभूत किमंत खरेदी योजनेअंतर्गत माेठया प्रमाणात धानाची खरेदी करण्यात आली. मात्र मिलर्संकडून अजुनही धानाची उचल व भरडाई न झाल्याने कोट्यवधींचे धान उघडयावर आहे. आजच्या तारखेस महामंडळाच्या जिल्हयात तब्बल १९४ कोटी रूपयाचे एकूण ८ लाख ९४ हजार क्विंटल धान केंद्राच्या परिसरात ताडपत्री झाकुन उघडयावर ठेवण्यात आले आहेत.

आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत चालू वर्षातील खरीप हंगामात तब्बल ५० केंद्रांवरून धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी अजुनही १०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचे धान्य ताडपत्री झाकून उघड्यावर ठेवण्यात आले आहे. उर्वरित धान गोदाम व शेडमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्यास्थितीत गडचिरोली कार्यालयांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या एकूण धानापैकी ४ लाख ८५ हजार क्विंटल धान उघड्यावर आहे.

महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत एकूण ८ लाख ५५ हजार रूपयाचे धान खरीप हंगामात आविका संस्थांच्या मार्फतीने खरेदी करण्यात आले आहे. यापैकी १ लाख ७१ हजार धान शेडमध्ये तसेच काही धान गोदामामध्ये साठवून ठेवण्यात आले आहे. या अहेरी उपविभागातही तब्बल ४ लाख ९ हजार क्विंटल धान सध्यास्थितीत उघड्यावर आहे. याबाबत गडचिरोलीच्या कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक बावणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बराच वेळ व्यस्त दाखवत हाेता. त्यामुळे यात त्यांची प्रतिक्रीया जाणून घेता आली नाही.

वाहतूक व मिलिंग दर जुनाचशासनाच्या वतीने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून राईस मिल व्यावसायिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप होत आहे. धान वाहतूक व मिलिंगचे दर प्रति क्विंटल १० रूपये मिलिंग दर शासनाच्या वतीने देण्यात येतो. अलिकडे महागाई प्रचंड वाढली असून डिझेलचे भाव वाढले आहेत. विद्युत बिलाचे दर वाढल्याने राईस मिलर्सना अडचणी येतात. त्यामुळे शासनाने मिलिंग व वाहतुकीचा दर वाढवावा, अशी मागणी मिलर्स असाेसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

उचलसाठी २० जुनपर्यंत मुदतखरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाची उचल पावसाळ्यापूर्वी २० जून २०२४ पर्यंत शासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र मिलर्सने असहकार आंदोलन पुकारल्यामुळे यंदा केंद्राच्या परिसरातून महामंडळाच्या धानाची उचल झाली नाही. भरडाईची प्रक्रिया अजुनही सुरू झाली नाही.

नुकसानीस जबाबदार कोण?महामंडळाच्या ताडपत्री झाकून उघड्यावर ठेवण्यात आलेल्या धानाला अवकाळी पासवाचा फटका बसत आहे. पुन्हा जुन महिन्यांपासून पावसाने जोरदार झोडपल्यास नुकसानीला जबाबदार काेण राहणार? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. शासन, प्रशासन की वरीष्ठ अधिकारी हे सध्यातरी अनुत्तरीत आहे.

स्थानिक स्तरावर उचल करण्यासाठी राईस मिलर्सची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र महागाईच्या काळात जुन्या दरानुसार मिलिंग व वाहतूक करणे परवडत नसल्याने त्यांचा उचल करण्यास नकार आहे. हा प्रश्न शासनस्तरावर प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आला असून याबाबत निर्णय व्हायचा आहे.- बी. एस. बरकमकर, उपप्रादेशिक व्यवस्थापक, अहेरी. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली