शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

म्हशींच्या मृत्यू प्रकरणातील इतरही आरोपींना अटक करा

By admin | Updated: April 26, 2015 01:59 IST

चामोर्शी तालुक्यातील नवेगाव रै. येथील शेतकरी गणपत सातपुते यांनी शेतासभोवताल लावलेल्या कुंपणाला विद्युत प्रवाह लावून ठेवल्याने दोन म्हशींचा मृत्यू झाला.

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील नवेगाव रै. येथील शेतकरी गणपत सातपुते यांनी शेतासभोवताल लावलेल्या कुंपणाला विद्युत प्रवाह लावून ठेवल्याने दोन म्हशींचा मृत्यू झाला. या प्रकरणात इतरही आरोपींचा समावेश असून त्यानाही अटक करावी, अशी मागणी म्हशींचे मालक गोपाळा बुरांडे यांनी केली आहे.गणपत सातपुते यांनी शेतासभोवताल लावलेल्या कुंपनाने दोन म्हशींचा मृत्यू झाला. म्हशी मरण पावल्यानंतर सदर म्हशी काही दुर अंतरावर नेऊन सातपुते यांच्याच शेतात सातपुते व त्यांच्या साथीदारांनी पुरल्या. प्रत्येक म्हशीचे वजन जवळपास दोन ते तीन क्विंटल एवढे होते. एवढया मोठ्या वजनाच्या म्हशी एकटाच नेऊन पुरू शकत नाही. त्यासाठी किमान पाच ते सहा नागरिकांची गरज भासते. यावरून या प्रकरणात आणखी पाच आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता आहे. या संशयीत आरोपींची नावे सुचवून त्याना अटक करण्याबाबत चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असता सदर तक्रार स्वीकारण्यास पोलिसांनी नकार दिला. असाही आरोप बुरांडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या प्रकरणात सहभाग असलेल्या इतर पाच आरोपींना अटक करावी अशी मागणी बुरांडे यांनी केली आहे.सातपुते यांच्या शेतात जंगली रानडूकराचे अवशेष आढळून आले आहेत. सविस्तर चौकशी केल्यास या ठिकाणी इतरही वन्य प्राण्यांचे अवेशष आढळून येतील. मात्र वनविभागाचे कर्मचारीही या प्रकरणाकडे कानाडोळा करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी बुरांडे यांनी केली आहे. यावेळी नेताजी गोपाळा बुरांडे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)