शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा

By admin | Updated: May 14, 2017 01:46 IST

रवी येथील शेतकरी वामन दशरथ मरापे यांच्यावर सकाळी १० वाजताच्या सुमारास शेतावर वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले.

आरमोरीत पत्रकार परिषद : वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याची आमदारांची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : रवी येथील शेतकरी वामन दशरथ मरापे यांच्यावर सकाळी १० वाजताच्या सुमारास शेतावर वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. त्यामुळे या परिसरातील कोंढाळा, अरसोडा येथील शेतकरी धास्तावले आहेत. वन विभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा, असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती आ. कृष्णा गजबे यांनी शनिवारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दीड महिन्यापूर्वी कोंढाळा येथील एका इसमावर याच नरभक्षक वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. सदर इसम मोहफूल गोळा करण्याकरिता गेला होता. त्याच्यावर वाघाने अचानक हल्ला केला होता. त्याचीच पुनरावृत्ती शनिवारी घडली. वाघाने वामन मरापे यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. सध्या उन्हाळी धानपीक व अन्य भाजीपाला पीक तालुका परिसरात लावण्यात आले आहेत. परंतु नरभक्ष्यक वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी धास्तावले आहेत. शेतावर जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी देसाईगंजचे उपवनसंरक्षक विवेक हौशिंग तसेच मुख्य वनसंरक्षक एडबाँड यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली, अशी माहितीही आ. कृष्णा गजबे यांनी दिली. नरभक्ष्यक वाघाच्या हल्ल्यात शेतकरी व शेतमजूर ठार झाल्यास त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी मिळावी, यासाठी आपण विधानसभेत मागणी करणार असल्याचे आ. कृष्णा गजबे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकाध्यक्ष नंदू पेटेवार, युवा मोर्चाचे अध्यक्ष पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, स्वप्नील धात्रक, सचिन बेहरे, युगल सामृतवार, गोलू वाघरे व कार्यकर्ते हजर होते. दरम्यान पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वनही केले. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी चर्चा कोंढाळा व रवी जंगल परिसरातील नरभक्ष्यक वाघाचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आरमोरी येथील काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी तांबटकर यांच्याकडे शनिवारी चर्चेदरम्यान केली. माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉ. रामकृष्ण मडावी व कार्यकर्त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी तांबटकर यांची भेट घेऊन नरभक्ष्यक वाघाचा बंदोबस्त करण्याबाबत चर्चा केली. वनविभागाचे दुर्लक्ष व लोकप्रतिनिधी यांच्या निष्काळजीपणामुळे सदर घटना घडली, अशी टीकाही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली. देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा जंगल परिसरात काही दिवसांपूर्वी एका नागरिकाला वाघाने भक्ष्य बनविले होते. शनिवारी पुन्हा आरमोरी तालुक्यातील रवी येथे आपल्या शेतात सकाळच्या सुमारास धानपिकाला पाणी देत असताना वामन मरापे या शेतकऱ्यावर वाघाने अचानक हल्ला करून त्याला जागीच ठार केले. त्यामुळे या भागातील शेतकरी दहशतीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी धानाची लागवड केलेली आहे. सध्या धानपीक जोमात असून दररोज शेतकऱ्यांना शेतावर जावे लागते. वाघाच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे वनविभागाने या नरभक्ष्यक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करून मरापे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी आ. आनंदराव गेडाम, डॉ. रामकृष्ण मडावी, सुभाष सपाटे यांनी केली आहे. दरम्यान आनंदराव गेडाम यांनी उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच पदाधिकाऱ्यांनी पीडित मरापे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आ. गेडाम यांच्या समवेत जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर, अशोक भोयर हजर होते.