शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा

By admin | Updated: May 14, 2017 01:46 IST

रवी येथील शेतकरी वामन दशरथ मरापे यांच्यावर सकाळी १० वाजताच्या सुमारास शेतावर वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले.

आरमोरीत पत्रकार परिषद : वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याची आमदारांची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : रवी येथील शेतकरी वामन दशरथ मरापे यांच्यावर सकाळी १० वाजताच्या सुमारास शेतावर वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. त्यामुळे या परिसरातील कोंढाळा, अरसोडा येथील शेतकरी धास्तावले आहेत. वन विभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा, असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती आ. कृष्णा गजबे यांनी शनिवारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दीड महिन्यापूर्वी कोंढाळा येथील एका इसमावर याच नरभक्षक वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. सदर इसम मोहफूल गोळा करण्याकरिता गेला होता. त्याच्यावर वाघाने अचानक हल्ला केला होता. त्याचीच पुनरावृत्ती शनिवारी घडली. वाघाने वामन मरापे यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. सध्या उन्हाळी धानपीक व अन्य भाजीपाला पीक तालुका परिसरात लावण्यात आले आहेत. परंतु नरभक्ष्यक वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी धास्तावले आहेत. शेतावर जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी देसाईगंजचे उपवनसंरक्षक विवेक हौशिंग तसेच मुख्य वनसंरक्षक एडबाँड यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली, अशी माहितीही आ. कृष्णा गजबे यांनी दिली. नरभक्ष्यक वाघाच्या हल्ल्यात शेतकरी व शेतमजूर ठार झाल्यास त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी मिळावी, यासाठी आपण विधानसभेत मागणी करणार असल्याचे आ. कृष्णा गजबे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकाध्यक्ष नंदू पेटेवार, युवा मोर्चाचे अध्यक्ष पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, स्वप्नील धात्रक, सचिन बेहरे, युगल सामृतवार, गोलू वाघरे व कार्यकर्ते हजर होते. दरम्यान पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वनही केले. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी चर्चा कोंढाळा व रवी जंगल परिसरातील नरभक्ष्यक वाघाचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आरमोरी येथील काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी तांबटकर यांच्याकडे शनिवारी चर्चेदरम्यान केली. माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉ. रामकृष्ण मडावी व कार्यकर्त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी तांबटकर यांची भेट घेऊन नरभक्ष्यक वाघाचा बंदोबस्त करण्याबाबत चर्चा केली. वनविभागाचे दुर्लक्ष व लोकप्रतिनिधी यांच्या निष्काळजीपणामुळे सदर घटना घडली, अशी टीकाही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली. देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा जंगल परिसरात काही दिवसांपूर्वी एका नागरिकाला वाघाने भक्ष्य बनविले होते. शनिवारी पुन्हा आरमोरी तालुक्यातील रवी येथे आपल्या शेतात सकाळच्या सुमारास धानपिकाला पाणी देत असताना वामन मरापे या शेतकऱ्यावर वाघाने अचानक हल्ला करून त्याला जागीच ठार केले. त्यामुळे या भागातील शेतकरी दहशतीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी धानाची लागवड केलेली आहे. सध्या धानपीक जोमात असून दररोज शेतकऱ्यांना शेतावर जावे लागते. वाघाच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे वनविभागाने या नरभक्ष्यक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करून मरापे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी आ. आनंदराव गेडाम, डॉ. रामकृष्ण मडावी, सुभाष सपाटे यांनी केली आहे. दरम्यान आनंदराव गेडाम यांनी उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच पदाधिकाऱ्यांनी पीडित मरापे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आ. गेडाम यांच्या समवेत जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर, अशोक भोयर हजर होते.