शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

कोरचीत १५ जोडपी विवाहबद्ध

By admin | Updated: April 29, 2015 01:41 IST

स्थानिक राजीव भवनात सोमवारी आदिवासी कंवर समाज सेवा संस्था खडकाघाट यांच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५ जोडपी विवाहबद्ध झाली.

कोरची : स्थानिक राजीव भवनात सोमवारी आदिवासी कंवर समाज सेवा संस्था खडकाघाट यांच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५ जोडपी विवाहबद्ध झाली. सामूहिक विवाह सोहळ्याचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. मेघराज कपूर होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. क्रिष्णा गजबे होते. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, जि. प. सदस्य पद्माकर मानकर, पंचायत समिती सभापती अवधराम बागमुळ, नाना नाकाडे, आनंद चौबे, नसरूद्दीन भामानी, कमलनारायण खंडेलवार, अशोक गावतुरे उपस्थित होते. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे वधू- वर पित्याच्या आर्थिक खर्चात बचत होते. सध्या महागाई वाढल्याने वस्तूंचे नियोजन करतांना वधूपिता हतबल होतो. नियोजनातही हजारो रूपयांचा खर्च होतो. त्यामुळे सामूहिक विवाह सोहळे पैशाच्या बचतीकरिता उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले. सामूहिक विवाह सोहळे मागील चार ते पाच वर्षांपासून कंवर समाजाच्या वतीने राबविले जात आहेत. त्यामुळे समाजातील वधू- वरांच्या खर्चात बचत होत आहे. यापुढेही सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता समाजबांधवांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. मेघराज कपूर यांनी केले. विवाह सोहळ्यात अनावश्यक खर्च मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे सामूहिक विवाह सोहळ्यांना भर देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शामराव जनकातन, प्रास्ताविक बख्खर यांनी केले. यशस्वीतेसाठी आदिवासी कंवर समाज सेवा संस्थेच्या सदस्य पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)