शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

आरमोरी, गडचिरोलीचे राजकीय महत्त्व झाले कमी

By admin | Updated: November 25, 2014 22:54 IST

विधानसभा निवडणुकीने गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणावर व्यापक परिणाम केला आहे. पूर्वी राजकारणाचे सत्ताकेंद्र असलेले गडचिरोली व आरमोरी या दोनही गावांचा राजकीयदृष्ट्या

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीने गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणावर व्यापक परिणाम केला आहे. पूर्वी राजकारणाचे सत्ताकेंद्र असलेले गडचिरोली व आरमोरी या दोनही गावांचा राजकीयदृष्ट्या महत्त्व कमी होऊन चामोर्शी व देसाईगंज या गावांचा महत्त्व वाढले आहे. गडचिरोली विधानसभा मतदार संघातून यावेळी निवडून आलेले डॉ. देवराव होळी हे सध्या चामोर्शीचे रहिवासी आहे. चामोर्शी गावात त्यांचे दुमजली घर आहे. त्यामुळे चामोर्शी गावाचे राजकीय महत्त्व आमदार मिळाल्यामुळे वाढले आहे. निवडणूक आटोपून महिना, दोन महिने होत आले. परंतु अद्याप त्यांनी गडचिरोली शहरात संपर्क कार्यालयही उघडलेले नाही. विविध शासकीय अधिकाऱ्यांना तसेच त्यांच्याकडे काम असणाऱ्या नागरिकांना चामोर्शी येथे हजेरी लावावी लागत आहे. यापूर्वी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून विशेषत: गडचिरोलीत वास्तव्याला असलेलेच लोकप्रतिनिधी निवडून आलेत. त्यांचे गडचिरोली हेच मुख्यालय होते. १५ वर्ष आमदार राहिलेले मारोतराव कोवासे यांचे गडचिरोली शहरातच घर होते. हिरामन वरखडे धानोरा तालुक्यात राहणारे होते. अशोक नेतेही गडचिरोली मुख्यालयातलेच असल्याने लोकांना त्यांचा कायम संपर्क होता. डॉ. उसेंडी यांचेही मुख्यालय गडचिरोलीचे होते. पहिल्यांदाच असा प्रकार झाला आहे. त्यामुळे गडचिरोलीचे राजकीय महत्त्व कमी झाल्याची भावना जनमाणसामध्ये दिसत आहे. अशीच परिस्थिती आरमोरी विधानसभा क्षेत्राचीही आहे. आरमोरी गाव सहकार क्षेत्राचेही मुख्यालय होते. आरमोरीवरून जिल्ह्याचे राजकारण चालते, असे अनेक लोक म्हणत. परंतु यावर्षीच्या निवडणुकीने आरमोरीच्या राजकीय मोठेपणाला ग्रहण लावले आहे. या मतदार संघातून यावेळी देसाईगंज तालुक्याचा रहिवासी असलेला व्यक्ती आमदार म्हणून निवडून आला आहे. आरमोरीचा आमदार म्हणजे, आरमोरी मुख्यालयातला हा पायंडा मोडीत निघाला आहे. बाबुरावजी मडावी हे देसाईगंज तालुक्यातील रहिवासी असताना आमदार झाले होते. त्यानंतर मात्र या मतदार संघात हरिराम वरखडे, डॉ. रामकृष्ण मडावी, आनंदराव गंगाराम गेडाम हे सारे लोकप्रतिनिधी आरमोरीचे रहिवासी होते. आरमोरीवरूनच त्यांचा कारभार चालायचा. यावेळी मात्र क्रिष्णा गजबे भाजपच्या तिकीटावर आमदार झाले. ते देसाईगंज तालुक्यातील पोटगावचे रहिवासी आहे. त्यांच्या विजयामुळे देसाईगंजचे राजकीय वर्चस्व वाढले आहे. देसाईगंज शहरात त्यांनी आता संपर्क कार्यालय सुरू करण्याचा प्रयत्न चालविला आहे. आरमोरी भागातील जनतेला आपले प्रश्न घेऊन आता देसाईगंज गाठावे लागणार आहे. पूर्वी मागील १० वर्ष आरमोरीचा वाडा आमदाराच्या सत्तेचे केंद्र होता. केंद्रातील राजकीय मुसद्दी भाजपात असले तरी आमदार मात्र त्यांच्यापासून १६ किमी अंतरावर राहणार आहे. त्यामुळे आरमोरीचा राजकीय वजन आता जुन्यासारखे राहणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. अहेरी विधानसभा मतदार संघ मात्र याला अपवाद राहिले आहे. अहेरीतून आमदार होणारे बहुतांशी लोकप्रतिनिधी हे अहेरी गावातील असतात. यंदा फक्त जागा बदलली आहे. रूख्मीणी महल सत्तेचे निर्णय केंद्र झाले आहे. तसेच यापूर्वी आमदारांवर राहणारे रिमोंट कंट्रोलही आता दुसऱ्या व्यक्तींच्या हातात गेले आहे, अशी चर्चा जनमाणसात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)