शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी नगर पंचायतीचे भिजत घोंगडे कायमच

By admin | Updated: January 30, 2017 03:36 IST

शासनाच्या निर्णयानुसार दीड वर्षापूर्वी आरमोरी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाले. त्यानंतर आरमोरी

विकासकामांना बसली खीळ : नगर पंचायत की नगर परिषद? निर्मितीचा चेंडू कोर्टात महेंद्र रामटेके ल्ल आरमोरी शासनाच्या निर्णयानुसार दीड वर्षापूर्वी आरमोरी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाले. त्यानंतर आरमोरी येथील जिल्हा परिषदेचे एक व पंचायत समितीचे दोन असे तीन क्षेत्र गोठविण्यात आले. ऐन नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर आरमोरी नगर पंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी आरमोरी शहरातील काही राजकीय मंडळींनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून नगर पंचायतीच्या निवडणुकीला स्थगिती आणली. तेव्हापासून आरमोरी नगर परिषद होणार की नगर पंचायत राहणार याबाबतचा चेंडू कोर्टात लटकलेला आहे. नगर पंचायतीची निवडणूक न झाल्याने आरमोरी नगर पंचायतीची विकास कामे ठप्प झाली असून ही नगर पंचायत सध्या वांझोटी झाली आहे. एक तर नगर पंचायतीची निवडणूक नाही आणि दुसरीकडे जि.प.चे एक व पं.स.चे दोन क्षेत्र गोठविण्यात आले. मागील निवडणुकीच्या आठवणी ताज्या होऊन मतदान करता येणार नसल्याचे शल्य आरमोरीकरांच्या मनात बोचत आहे. शिवाय आरमोरी शहर हे विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची खाण आहे. अशा स्थितीत स्थानिक नगर पंचायत क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या जि.प. क्षेत्रातून निवडणुका लढविता येत नसल्याचे दुखही पदाधिकाऱ्यांच्या मनात सतावत आहे. आरमोरी ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा मिळाला तेव्हापासून शहरात विविध मूलभूत सुविधांचा डोंगर निर्माण झाला आहे. नगर पंचायतीची निवडणूक न झाल्यामुळे नगर पंचायतीचा कारभार सांभाळण्यासाठी तहसीलदारांकडे प्रशासकाचा कार्यभार सोपविण्यात आला. पाच-सहा महिन्यापूर्वी नगर पंचायतीला मुख्याधिकारी देण्यात आला. मात्र शहर विकासासाठी नगर पंचायतीला येणारा निधी योग्य व पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने विकास कामाला मोठ्या प्रमाणात खिळ बसली आहे. राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून आरमोरीची ओळख जिल्ह्यात सर्वत्र आहे. आरमोरी नगर पंचायत होण्यापूर्वी जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून आरमोरीकडे पाहिले जात होते. मात्र आरमोरी शहराच्या विकासासाठी असलेला जि.प. व पं.स. क्षेत्र गोठविण्यात आल्याने तसेच नगर पंचायत होऊनही निवडणूक न झाल्याने दुसऱ्या क्षेत्राच्या निवडणुका पाहणे तसेच चर्चा करण्यापलिकडे काहीच न करण्याची पाळी येथील राजकीय पदाधिकाऱ्यांवर आली आहे. हे आरमोरीकरांचे दुदैवच म्हणावे लागेल. आरमोरी नगर परिषद निर्मितीमध्ये लोकसंख्येचा अडथळा निर्माण होत आहे. नगरसेवकांअभावी जनता झाली पोरकी ४आरमोरी शहरात रस्ते, वीज, स्वच्छता व पाणी यासह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रशासकांना वेळ मिळत नाही व मुख्याधिकारी प्रत्येक गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नाही. निवडणुका झाल्या असत्या तर त्या-त्या प्रभागातील नगरसेवक आपल्या वार्डातील मूलभूत सुविधा मांडून त्या निकाली काढण्याचा प्रयत्न झाला असता. मात्र वार्डातील समस्या कोणाला सांगाव्या, अशी स्थिती आरमोरीकरांची झाली आहे.