शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना नियुक्ती द्या

By admin | Updated: February 5, 2017 01:38 IST

जिल्ह्यातील ८३९ हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देऊन त्यांचे शासन सेवेत समायोजन करावे,

अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी पेरमिली : जिल्ह्यातील ८३९ हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देऊन त्यांचे शासन सेवेत समायोजन करावे, अशी मागणी जिल्ह्यातील हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यात हिवतापाच्या नियंत्रणासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने फेब्रुवारी २०१६ मध्ये निवड प्रक्रिया राबवून ८३९ हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांची निवड केली. हंगामी क्षेत्र कर्मचारी संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी मलेरिया नियंत्रणाच्या कामावर कार्यरत असून प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. हिवताप नियंत्रणाच्या कामासह आरोग्य विभागातील क्षयरोग, कुष्ठरोग तपासणी, पाणी नमूने तपासणी, हत्ती रोगाच्या गोळ्या वाटप करणे, गरोदर मातांना रुग्णांलयात भरती करणे, कुटुंब नियोजन कार्यक्रम आदी कामे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. परंतु कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात आल्या नाही. हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना २०१७ मध्ये नियुक्ती आदेश द्यावे, ३७६ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर प्रत्येकी दोन हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून सर्व ८३९ हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे, प्रत्येक सत्रात ११ महिन्यांचा निरंतर नियुक्ती आदेश द्यावा, सेवा ज्येष्ठता यादीत हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांचे नाव समाविष्ट करावे, वैध अनुभव प्रमाणपत्र तत्काळ देण्यात यावे, मासिक मानधन प्रत्येक महिन्याच्या निश्चित तारखेला द्यावे तसेच प्रत्येक महिन्यात सलग २९ दिवसांचे आदेश द्यावे, कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण समस्या तत्काळ मार्गी लावाव्या, अशी मागणी हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या वतीने संकेत येगलोपवार व इतर कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. आरोग्य अधिकारी, आरोग्य संचालक, उपसंचालक यांच्याकडे केली आहे.