शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचाजवळ आणखी एक पूल

By admin | Updated: November 18, 2015 01:43 IST

प्राणहिता नदीवर अहेरी-गुड्डेम पुलाचे बांधकाम करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असतानाच सिरोंचाजवळील धर्मपूरी गावाजवळून प्राणहिता नदीवर..

तेलंगणाला जोडणारा तिसरा पूल : धर्मपुरी-रापनपल्ली गावादरम्यान पूल होणारगडचिरोली : प्राणहिता नदीवर अहेरी-गुड्डेम पुलाचे बांधकाम करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असतानाच सिरोंचाजवळील धर्मपूरी गावाजवळून प्राणहिता नदीवर आणखी एक पूल बांधला जाणार आहे. या पुलाच्या कामाचे भूमीपूजन सोमवारी करण्यात आले आहे. या पुलांमुळे तेलंगणा व महाराष्ट्र यांच्यामधील नाते आणखी घट्ट होण्यास फार मोठी मदत होणार आहे. तेलंगणा राज्य व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा प्राणहिता तसेच गोदावरी नदीने विभागले आहेत. सिरोंचा, अहेरी हे दोन तालुके प्राणहिता व गोदावरी नदीच्या काठालगत असल्याने या दोन्ही तालुक्यातील नागरिकांचे ऋणानुबंध तेलंगणा राज्यातील नागरिकांसोबत जोडले आहेत. मात्र महाराष्ट्र व तेलंगणा या दोनपैकी कोणतेच राज्य सरकार पूल बांधकामाबाबत पुढाकार घेत नसल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांना आवागमन करताना फार मोठी अडचण जाणवत होती. महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकारातून गोदावरी नदीवर सिरोंचा-कालेश्वर पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. या पुलाचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. आठ दिवसांपूर्वी तेलंगणा राज्यातील कागजनगरचे आमदार कोनेरू कोनप्पा यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची भेट घेऊन अहेरी (वांगेपल्ली)-गुडेम दरम्यान प्राणहिता नदीवर पूल बांधले जाईल. या पुलाच्या कामाचा शुभारंभ डिसेंबर महिन्यात करण्यात येईल. अशीही माहिती दिली होती. हे दोन पूल होण्याची शाश्वती असतानाच सिरोंचाजवळच धर्मपुरी, रापनपल्ली गावाच्या मध्यभागी सिरोंचापासून दोन किमी अंतरावर प्राणहिता नदीवर आणखी एक पूल बांधले जाणार आहे. या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ सोमवारी पूल बांधणाऱ्या कंपनीचे कार्यकारी संचालक राजू यांच्या हस्ते करण्यात आला. या पुलाच्या बांधकामासाठी १२० कोटी रूपयांचा खर्च येणार असून हा सर्व खर्च तेलंगणा सरकार उचलणार आहे. या पुलाला २१ पिलर राहणार आहेत. वर्षभरात या पुलाचे बांधकाम सुरू होईल, अशी माहिती पूल बांधणाऱ्या कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. तेलंगणा राज्याला जोडणारा गडचिरोली जिल्ह्यातील हा तिसरा पूल होणार आहे. त्यामुळे गडचिरोलीवासीय व तेलंगणा राज्यातील नागरिक यांच्यातील नातेसंबंध, व्यवहार आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे. छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या इंद्रावती नदीवर पातागुडमजवळ पुलाचे काम सुरू आहे. या पुलामुळे छत्तीसगड व गडचिरोलीवासीय यांना आवागमनासाठी सुकर होणार आहे. विशेष म्हणजे सदर पूल राष्ट्रीय महामार्ग १६ जोडणार आहे. सदर मार्ग मुंबईवरून छत्तीसगडमधील जगदलपूरकडे निघते. राष्ट्रीय महामार्ग १६ चे काम बंद पडून आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाल्यास गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला आणखी गती मिळण्यास मदत होणार आहे. नवीन भाजपा सरकार या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरूवात करेल, अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)