शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

सिरोंचाजवळ आणखी एक पूल

By admin | Updated: November 18, 2015 01:43 IST

प्राणहिता नदीवर अहेरी-गुड्डेम पुलाचे बांधकाम करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असतानाच सिरोंचाजवळील धर्मपूरी गावाजवळून प्राणहिता नदीवर..

तेलंगणाला जोडणारा तिसरा पूल : धर्मपुरी-रापनपल्ली गावादरम्यान पूल होणारगडचिरोली : प्राणहिता नदीवर अहेरी-गुड्डेम पुलाचे बांधकाम करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असतानाच सिरोंचाजवळील धर्मपूरी गावाजवळून प्राणहिता नदीवर आणखी एक पूल बांधला जाणार आहे. या पुलाच्या कामाचे भूमीपूजन सोमवारी करण्यात आले आहे. या पुलांमुळे तेलंगणा व महाराष्ट्र यांच्यामधील नाते आणखी घट्ट होण्यास फार मोठी मदत होणार आहे. तेलंगणा राज्य व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा प्राणहिता तसेच गोदावरी नदीने विभागले आहेत. सिरोंचा, अहेरी हे दोन तालुके प्राणहिता व गोदावरी नदीच्या काठालगत असल्याने या दोन्ही तालुक्यातील नागरिकांचे ऋणानुबंध तेलंगणा राज्यातील नागरिकांसोबत जोडले आहेत. मात्र महाराष्ट्र व तेलंगणा या दोनपैकी कोणतेच राज्य सरकार पूल बांधकामाबाबत पुढाकार घेत नसल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांना आवागमन करताना फार मोठी अडचण जाणवत होती. महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकारातून गोदावरी नदीवर सिरोंचा-कालेश्वर पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. या पुलाचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. आठ दिवसांपूर्वी तेलंगणा राज्यातील कागजनगरचे आमदार कोनेरू कोनप्पा यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची भेट घेऊन अहेरी (वांगेपल्ली)-गुडेम दरम्यान प्राणहिता नदीवर पूल बांधले जाईल. या पुलाच्या कामाचा शुभारंभ डिसेंबर महिन्यात करण्यात येईल. अशीही माहिती दिली होती. हे दोन पूल होण्याची शाश्वती असतानाच सिरोंचाजवळच धर्मपुरी, रापनपल्ली गावाच्या मध्यभागी सिरोंचापासून दोन किमी अंतरावर प्राणहिता नदीवर आणखी एक पूल बांधले जाणार आहे. या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ सोमवारी पूल बांधणाऱ्या कंपनीचे कार्यकारी संचालक राजू यांच्या हस्ते करण्यात आला. या पुलाच्या बांधकामासाठी १२० कोटी रूपयांचा खर्च येणार असून हा सर्व खर्च तेलंगणा सरकार उचलणार आहे. या पुलाला २१ पिलर राहणार आहेत. वर्षभरात या पुलाचे बांधकाम सुरू होईल, अशी माहिती पूल बांधणाऱ्या कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. तेलंगणा राज्याला जोडणारा गडचिरोली जिल्ह्यातील हा तिसरा पूल होणार आहे. त्यामुळे गडचिरोलीवासीय व तेलंगणा राज्यातील नागरिक यांच्यातील नातेसंबंध, व्यवहार आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे. छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या इंद्रावती नदीवर पातागुडमजवळ पुलाचे काम सुरू आहे. या पुलामुळे छत्तीसगड व गडचिरोलीवासीय यांना आवागमनासाठी सुकर होणार आहे. विशेष म्हणजे सदर पूल राष्ट्रीय महामार्ग १६ जोडणार आहे. सदर मार्ग मुंबईवरून छत्तीसगडमधील जगदलपूरकडे निघते. राष्ट्रीय महामार्ग १६ चे काम बंद पडून आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाल्यास गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला आणखी गती मिळण्यास मदत होणार आहे. नवीन भाजपा सरकार या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरूवात करेल, अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)