शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

सिरोंचाजवळ आणखी एक पूल

By admin | Updated: November 18, 2015 01:43 IST

प्राणहिता नदीवर अहेरी-गुड्डेम पुलाचे बांधकाम करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असतानाच सिरोंचाजवळील धर्मपूरी गावाजवळून प्राणहिता नदीवर..

तेलंगणाला जोडणारा तिसरा पूल : धर्मपुरी-रापनपल्ली गावादरम्यान पूल होणारगडचिरोली : प्राणहिता नदीवर अहेरी-गुड्डेम पुलाचे बांधकाम करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असतानाच सिरोंचाजवळील धर्मपूरी गावाजवळून प्राणहिता नदीवर आणखी एक पूल बांधला जाणार आहे. या पुलाच्या कामाचे भूमीपूजन सोमवारी करण्यात आले आहे. या पुलांमुळे तेलंगणा व महाराष्ट्र यांच्यामधील नाते आणखी घट्ट होण्यास फार मोठी मदत होणार आहे. तेलंगणा राज्य व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा प्राणहिता तसेच गोदावरी नदीने विभागले आहेत. सिरोंचा, अहेरी हे दोन तालुके प्राणहिता व गोदावरी नदीच्या काठालगत असल्याने या दोन्ही तालुक्यातील नागरिकांचे ऋणानुबंध तेलंगणा राज्यातील नागरिकांसोबत जोडले आहेत. मात्र महाराष्ट्र व तेलंगणा या दोनपैकी कोणतेच राज्य सरकार पूल बांधकामाबाबत पुढाकार घेत नसल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांना आवागमन करताना फार मोठी अडचण जाणवत होती. महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकारातून गोदावरी नदीवर सिरोंचा-कालेश्वर पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. या पुलाचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. आठ दिवसांपूर्वी तेलंगणा राज्यातील कागजनगरचे आमदार कोनेरू कोनप्पा यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची भेट घेऊन अहेरी (वांगेपल्ली)-गुडेम दरम्यान प्राणहिता नदीवर पूल बांधले जाईल. या पुलाच्या कामाचा शुभारंभ डिसेंबर महिन्यात करण्यात येईल. अशीही माहिती दिली होती. हे दोन पूल होण्याची शाश्वती असतानाच सिरोंचाजवळच धर्मपुरी, रापनपल्ली गावाच्या मध्यभागी सिरोंचापासून दोन किमी अंतरावर प्राणहिता नदीवर आणखी एक पूल बांधले जाणार आहे. या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ सोमवारी पूल बांधणाऱ्या कंपनीचे कार्यकारी संचालक राजू यांच्या हस्ते करण्यात आला. या पुलाच्या बांधकामासाठी १२० कोटी रूपयांचा खर्च येणार असून हा सर्व खर्च तेलंगणा सरकार उचलणार आहे. या पुलाला २१ पिलर राहणार आहेत. वर्षभरात या पुलाचे बांधकाम सुरू होईल, अशी माहिती पूल बांधणाऱ्या कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. तेलंगणा राज्याला जोडणारा गडचिरोली जिल्ह्यातील हा तिसरा पूल होणार आहे. त्यामुळे गडचिरोलीवासीय व तेलंगणा राज्यातील नागरिक यांच्यातील नातेसंबंध, व्यवहार आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे. छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या इंद्रावती नदीवर पातागुडमजवळ पुलाचे काम सुरू आहे. या पुलामुळे छत्तीसगड व गडचिरोलीवासीय यांना आवागमनासाठी सुकर होणार आहे. विशेष म्हणजे सदर पूल राष्ट्रीय महामार्ग १६ जोडणार आहे. सदर मार्ग मुंबईवरून छत्तीसगडमधील जगदलपूरकडे निघते. राष्ट्रीय महामार्ग १६ चे काम बंद पडून आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाल्यास गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला आणखी गती मिळण्यास मदत होणार आहे. नवीन भाजपा सरकार या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरूवात करेल, अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)