शहरं
Join us  
Trending Stories
1
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
2
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
3
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
4
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
5
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
6
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
7
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
8
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
9
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
10
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
11
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
12
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
13
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
14
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
15
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
16
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
17
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
18
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
19
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
20
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

विदर्भवाद्यांकडून मुख्यमंत्र्यांवर निवेदनांचा वर्षाव

By admin | Updated: November 26, 2014 23:06 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २४ आॅक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर पहिल्यांदा आले असताना त्यांना विदर्भवादी कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटना व राजकीय

गडचिरोली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २४ आॅक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर पहिल्यांदा आले असताना त्यांना विदर्भवादी कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांतर्फे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे, या विषयावर शेकडो निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा विदर्भवाद्यांच्या निवेदनानीही चर्चेचा विषय ठरला.भारतीय जनता पक्ष छोट्या राज्याच्या निर्मितीचे समर्थन करणार आहे. यापूर्वीही भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्य केले, असे ठोस आश्वासन जनतेला दिले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपने स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट केला नाही. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे भाजप विदर्भ राज्याच्या निर्मितीपासून फारकत घेत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळेच पहिल्यांदा गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्री आले असताना या जिल्ह्यातील तमाम विदर्भवादी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलीत. यात स्वतंत्र विदर्भ राज्य तातडीने निर्माण करावे, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच अहेरी हा स्वतंत्र जिल्हाही निर्माण करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. भारतीय जनता पक्षाने नाग विदर्भ आंदोलन समितीसोबत लोकसभा निवडणुकीतच आघाडी केली. भाजपच्या तिकीटावर नाविसचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव महाराज आमदार म्हणून निवडून आलेत. महाराष्ट्र राज्यात गडचिरोलीच्या विकासाकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. स्वतंत्र विदर्भ झाल्यास आपल्या भागाला न्याय मिळेल, अशी येथील जनतेची धारणा आहे. त्यामुळेच विदर्भवाद्यांनी मुख्यमंत्र्यांवर निवेदनाचा पाऊस पाडला. अखेरीस मुख्यमंत्र्यांना भारतीय जनता पक्ष स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी कटिबध्द असल्याचे स्पष्ट केले. विभाजन करून राज्य निर्मिती होत नाही. तर स्वतंत्र राज्य निर्माण करावे लागते, असेही मुख्यमंत्री फडणवीस पत्रकारांशी बोलताना गडचिरोलीत म्हणाले. विदर्भ राज्य निश्चितपणे होईल, असा विश्वास त्यांनी दिला. एकूणच मुख्यमंत्र्यांचा हा दौरा विदर्भवाद्यांच्या निवेदनानेच चर्चेत राहिला. (जिल्हा प्रतिनिधी)