शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

विदर्भवाद्यांकडून मुख्यमंत्र्यांवर निवेदनांचा वर्षाव

By admin | Updated: November 26, 2014 23:06 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २४ आॅक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर पहिल्यांदा आले असताना त्यांना विदर्भवादी कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटना व राजकीय

गडचिरोली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २४ आॅक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर पहिल्यांदा आले असताना त्यांना विदर्भवादी कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांतर्फे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे, या विषयावर शेकडो निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा विदर्भवाद्यांच्या निवेदनानीही चर्चेचा विषय ठरला.भारतीय जनता पक्ष छोट्या राज्याच्या निर्मितीचे समर्थन करणार आहे. यापूर्वीही भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्य केले, असे ठोस आश्वासन जनतेला दिले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपने स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट केला नाही. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे भाजप विदर्भ राज्याच्या निर्मितीपासून फारकत घेत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळेच पहिल्यांदा गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्री आले असताना या जिल्ह्यातील तमाम विदर्भवादी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलीत. यात स्वतंत्र विदर्भ राज्य तातडीने निर्माण करावे, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच अहेरी हा स्वतंत्र जिल्हाही निर्माण करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. भारतीय जनता पक्षाने नाग विदर्भ आंदोलन समितीसोबत लोकसभा निवडणुकीतच आघाडी केली. भाजपच्या तिकीटावर नाविसचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव महाराज आमदार म्हणून निवडून आलेत. महाराष्ट्र राज्यात गडचिरोलीच्या विकासाकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. स्वतंत्र विदर्भ झाल्यास आपल्या भागाला न्याय मिळेल, अशी येथील जनतेची धारणा आहे. त्यामुळेच विदर्भवाद्यांनी मुख्यमंत्र्यांवर निवेदनाचा पाऊस पाडला. अखेरीस मुख्यमंत्र्यांना भारतीय जनता पक्ष स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी कटिबध्द असल्याचे स्पष्ट केले. विभाजन करून राज्य निर्मिती होत नाही. तर स्वतंत्र राज्य निर्माण करावे लागते, असेही मुख्यमंत्री फडणवीस पत्रकारांशी बोलताना गडचिरोलीत म्हणाले. विदर्भ राज्य निश्चितपणे होईल, असा विश्वास त्यांनी दिला. एकूणच मुख्यमंत्र्यांचा हा दौरा विदर्भवाद्यांच्या निवेदनानेच चर्चेत राहिला. (जिल्हा प्रतिनिधी)