शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी जिल्हा घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 23:52 IST

अहेरी जिल्हा घोषित करावा, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने अपर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्हा निर्मिती झाली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन : दुर्गम व ग्रामीण भागाचा विकास रखडला

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी जिल्हा घोषित करावा, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने अपर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्हा निर्मिती झाली. मात्र गडचिरोली जिल्हा विस्ताराने फार मोठा आहे. सिरोंचा, भामरागड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नागरिकांना गडचिरोली जिल्हा मुख्यालयी पोहोचणे अशक्य होते. अहेरी उपविभागातील तालुक्यांवर नेहमीच अन्याय होत आला आहे. ग्रामीण व दुर्गम भाग अजूनही विकासाच्या प्रतीक्षेतच आहे. अहेरी जिल्ह्याची निर्मिती करून नवीन तालुके सुद्धा निर्माण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.अहेरी जिल्ह्याची निर्मिती झाल्यास विकासाला चालना मिळेल, सूरजागड येथे लोहप्रकल्प, देवलमरी सिमेंट प्रकल्प स्थापन होऊ शकतो. तर आलापल्ली येथे कागद कारखाना तयार करण्यास मोठा वाव आहे. कमलापूर तलाव, जितम, पातानिल, त्रिवेणी संगम, व्यंकटापूर, लख्खामेंढा, बिनागुंडा ही ठिकाणे पर्यटन स्थळे म्हणून विकसित करता येतील. बारमाही वाहणाऱ्या नद्या असल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. एकंदरीतच अहेरी जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे. त्यामुळे जिल्हा निर्मिती करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ तलांडे, विलास रापर्तीवार, रवींद्र भांदककर, श्रीनिवास भंडारी, नागसेन मेश्राम उपस्थित होते.