शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अहेरी जिल्हा घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 23:52 IST

अहेरी जिल्हा घोषित करावा, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने अपर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्हा निर्मिती झाली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन : दुर्गम व ग्रामीण भागाचा विकास रखडला

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी जिल्हा घोषित करावा, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने अपर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्हा निर्मिती झाली. मात्र गडचिरोली जिल्हा विस्ताराने फार मोठा आहे. सिरोंचा, भामरागड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नागरिकांना गडचिरोली जिल्हा मुख्यालयी पोहोचणे अशक्य होते. अहेरी उपविभागातील तालुक्यांवर नेहमीच अन्याय होत आला आहे. ग्रामीण व दुर्गम भाग अजूनही विकासाच्या प्रतीक्षेतच आहे. अहेरी जिल्ह्याची निर्मिती करून नवीन तालुके सुद्धा निर्माण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.अहेरी जिल्ह्याची निर्मिती झाल्यास विकासाला चालना मिळेल, सूरजागड येथे लोहप्रकल्प, देवलमरी सिमेंट प्रकल्प स्थापन होऊ शकतो. तर आलापल्ली येथे कागद कारखाना तयार करण्यास मोठा वाव आहे. कमलापूर तलाव, जितम, पातानिल, त्रिवेणी संगम, व्यंकटापूर, लख्खामेंढा, बिनागुंडा ही ठिकाणे पर्यटन स्थळे म्हणून विकसित करता येतील. बारमाही वाहणाऱ्या नद्या असल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. एकंदरीतच अहेरी जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे. त्यामुळे जिल्हा निर्मिती करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ तलांडे, विलास रापर्तीवार, रवींद्र भांदककर, श्रीनिवास भंडारी, नागसेन मेश्राम उपस्थित होते.