शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

इमारतीअभावी चिमुकल्यांची अंगणवाडी मैदानातच!

By admin | Updated: November 6, 2014 22:55 IST

पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या सुभाषग्राम येथील अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम मागील पाच वर्षांपासून रखडले असल्याने गावातील चिमुकल्यांना इमारतीअभावी अंगणातच उन्ह, वारा, पावसात

गुंडापल्ली : पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या सुभाषग्राम येथील अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम मागील पाच वर्षांपासून रखडले असल्याने गावातील चिमुकल्यांना इमारतीअभावी अंगणातच उन्ह, वारा, पावसात बसावे लागत आहे. प्रशासनाचे अंगणवाडीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. सुभाषग्राम येथील लोकसंख्या तीन ते साडेतीन हजारच्या आसपास आहे. गावातील बहुसंख्य लोकसंख्या बंगालीबहूल आहेत. गावात ८० च्या आसपास बालक अंगणवाडीत दाखल करण्यात आले आहेत. गावातील बालकांसाठी अंगणवाडीची व्यवस्था व्हावी म्हणून २००९ मध्ये अंगणवाडी केंद्राच्या बांधकामास ८ लाख ८४ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला व सदर अंगणवाडी केंद्राचे बांधकाम सुरू करण्यात आले. सुभाषग्राममध्ये गटग्रामपंचायत असल्याने सदर अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाचे कंत्राट एका कंत्राटदाराला देण्यात आले. परंतु बांधकामातील मजुरांची मजुरी न दिल्याने कंत्राटदाराने अंगणवाडी केंद्राचे बांधकाम अर्धवट सोडून दिले. तेव्हापासून अंगणवाडी केंद्राचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. संबंधीत अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी पंचायत समिती तथा जिल्हा परिषदकडे अनेकदा करण्यात आली. शिवाय ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही अंगणवाडीचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. परंतु याकडे संबंधित विभागाने पूर्णत: दुर्लक्ष केले. त्यामुळेच गावातील ८० विद्यार्थ्यांना उन्ह, वारा, पावसात अंगणात बसावे लागत आहे. बालकांसाठी पोषण आहार शिजविण्याचे कामही अंगणातच केले जात असल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. (वार्ताहर)