शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी जनावरे दगावली

By admin | Updated: June 19, 2014 23:48 IST

भामरागड तालुक्यात अनेक गावाजवळून नदी व नाला वाहत नाही. अशा गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या बिकटच आहे. अशा गावातील नागरिकांनी आपली जनावरे जगविण्यासाठी जंगलात उन्हाळ्याच्या दरम्यान सोडून दिली होती.

प्रशासन अनभिज्ञ : भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातरमेश मारगोनवार - भामरागडभामरागड तालुक्यात अनेक गावाजवळून नदी व नाला वाहत नाही. अशा गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या बिकटच आहे. अशा गावातील नागरिकांनी आपली जनावरे जगविण्यासाठी जंगलात उन्हाळ्याच्या दरम्यान सोडून दिली होती. यातील शेकडो जनावरे जंगलातच मरून पडली आहे. आता पाऊस पडल्यानंतर नागरिक हे जनावरे आणण्यासाठी जंगलात फेरफटका मारत आहे. त्यामुळे ही भीषण परिस्थिती उजेडात आली आहे. १२८ गाव असलेल्या भामरागड तालुक्यात पामुलगौतम, पर्लकोटा, इंद्रावती या प्रमुख नद्या वाहतात. गावालगत नालेही आहेत. परंतु तालुक्यात नदी व नाल्यांच्या किनाऱ्यावर न वसलेली ५० ते ६० च्या संख्येत गाव आहेत. अशा गावांमधील नागरिकांचा प्रमुुख व्यवसाय शेती व पशुपालन आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात अशा गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या बिकट स्वरूपात जाणवते. या गावामंध्ये पाण्याची व्यवस्था म्हणून बोअरवेल आहेत. नागरिक पिण्यासाठी या बोअरवेलचे पाणी वापरतात. मात्र जनावरांना पिण्यासाठी पाणी पाजणे शक्य होत नाही. गावात शेकडोच्या संख्येत जनावरे आहे. त्यांना बोअरवेलचे पाणी काढून पाजतो म्हटले तरी अतिशय कठीण बाब ठरते. त्यामुळे उन्हाळा लागण्याच्यापूर्वी या गावातील नागरिक आपले जनावरे वाचविण्यासाठी जंगलात सोडून देतात. जंगलात पाणवठ्यावर ही जनावरे जगतील, अशी या मागची भूमिका असते. यंदा मात्र कडक उष्णतामानामुळे ही जनावरे जंगलातच मरून गेली आहे. भामरागड तालुक्यात वटेली, बिसामुंडी, गुरूनूर, खंडी नयनवाडी, कुचेर, मरदूर, कोईनार या गावात अशी परिस्थिती असल्याचे लोकमत प्रतिनिधीने या भागाचा दौरा केल्यावर दिसून आले. अनेक नागरिकांनी याबाबत माहिती दिली. आता पाऊस आल्यानंतर जनावरे आणण्यासाठी जंगल परिसरात व सोडलेल्या भागात नागरिक जात आहे. तर जंगलात अनेक जनावरांचे सांगाडे असल्याचे दिसून आले आहे. तालुका प्रशासन मात्र या प्रकाराबाबत पूर्णत: अनभिज्ञ असून याबाबत प्रशासनाला काहीही माहिती नसल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाचे अधिकारी दुर्गम भागात दौरेच करीत नाही. त्यामुळे त्यांना याची जाणीव नाही.