शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

पाण्याअभावी जनावरे दगावली

By admin | Updated: June 19, 2014 23:48 IST

भामरागड तालुक्यात अनेक गावाजवळून नदी व नाला वाहत नाही. अशा गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या बिकटच आहे. अशा गावातील नागरिकांनी आपली जनावरे जगविण्यासाठी जंगलात उन्हाळ्याच्या दरम्यान सोडून दिली होती.

प्रशासन अनभिज्ञ : भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातरमेश मारगोनवार - भामरागडभामरागड तालुक्यात अनेक गावाजवळून नदी व नाला वाहत नाही. अशा गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या बिकटच आहे. अशा गावातील नागरिकांनी आपली जनावरे जगविण्यासाठी जंगलात उन्हाळ्याच्या दरम्यान सोडून दिली होती. यातील शेकडो जनावरे जंगलातच मरून पडली आहे. आता पाऊस पडल्यानंतर नागरिक हे जनावरे आणण्यासाठी जंगलात फेरफटका मारत आहे. त्यामुळे ही भीषण परिस्थिती उजेडात आली आहे. १२८ गाव असलेल्या भामरागड तालुक्यात पामुलगौतम, पर्लकोटा, इंद्रावती या प्रमुख नद्या वाहतात. गावालगत नालेही आहेत. परंतु तालुक्यात नदी व नाल्यांच्या किनाऱ्यावर न वसलेली ५० ते ६० च्या संख्येत गाव आहेत. अशा गावांमधील नागरिकांचा प्रमुुख व्यवसाय शेती व पशुपालन आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात अशा गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या बिकट स्वरूपात जाणवते. या गावामंध्ये पाण्याची व्यवस्था म्हणून बोअरवेल आहेत. नागरिक पिण्यासाठी या बोअरवेलचे पाणी वापरतात. मात्र जनावरांना पिण्यासाठी पाणी पाजणे शक्य होत नाही. गावात शेकडोच्या संख्येत जनावरे आहे. त्यांना बोअरवेलचे पाणी काढून पाजतो म्हटले तरी अतिशय कठीण बाब ठरते. त्यामुळे उन्हाळा लागण्याच्यापूर्वी या गावातील नागरिक आपले जनावरे वाचविण्यासाठी जंगलात सोडून देतात. जंगलात पाणवठ्यावर ही जनावरे जगतील, अशी या मागची भूमिका असते. यंदा मात्र कडक उष्णतामानामुळे ही जनावरे जंगलातच मरून गेली आहे. भामरागड तालुक्यात वटेली, बिसामुंडी, गुरूनूर, खंडी नयनवाडी, कुचेर, मरदूर, कोईनार या गावात अशी परिस्थिती असल्याचे लोकमत प्रतिनिधीने या भागाचा दौरा केल्यावर दिसून आले. अनेक नागरिकांनी याबाबत माहिती दिली. आता पाऊस आल्यानंतर जनावरे आणण्यासाठी जंगल परिसरात व सोडलेल्या भागात नागरिक जात आहे. तर जंगलात अनेक जनावरांचे सांगाडे असल्याचे दिसून आले आहे. तालुका प्रशासन मात्र या प्रकाराबाबत पूर्णत: अनभिज्ञ असून याबाबत प्रशासनाला काहीही माहिती नसल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाचे अधिकारी दुर्गम भागात दौरेच करीत नाही. त्यामुळे त्यांना याची जाणीव नाही.