शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

अंगणवाडी कर्मचारी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 22:52 IST

राज्य सरकारने ज्या अंगणवाडी केंद्रात कमीत कमी २५ मुले नाहीत अशी अंगणवाडी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेत तसा आदेश निर्गमित केला आहे.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीसमोर ठिय्या : केंद्र बंद करण्याचा निर्णय मागे घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारने ज्या अंगणवाडी केंद्रात कमीत कमी २५ मुले नाहीत अशी अंगणवाडी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेत तसा आदेश निर्गमित केला आहे. सदर आदेश अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचा ठपका ठेवत तो तात्काळ मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाकचेरीसमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व शालेय पोषण आहार देणाऱ्या महिलांना प्रतिदिवस ३५० रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय गटप्रवर्तकांना ४५० रुपये प्रतिदिवस मानधन देण्याचेही आश्वासन दिले होते. परंतु, या आश्वासनाची पूर्तता अद्यापही त्यांनी केली नाही. सदर आश्वासनाची पूर्तता तात्काळ करण्यात यावी, या मागणीसह विविध मागण्याही निवेदनातून करण्यात आला आहेत. शिवाय ज्या अंगणवाडी केंद्रात २५ पेक्षा कमी मुले नाहीत अशा अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा, अशी मागणीही या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिवसभर असलेल्या ढगाळी वातावरणाची तमा न बाळगता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्धा जिल्हा आयटक अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्त्वात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. सदर आंदोलनाचे नेतृत्त्व आयटकचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हा संघटक असलम पठान, विजया पावडे, मैना उईके, मंगला इंगोले, ज्ञानेश्वरी डंबारे, शोभा तिवारी यांनी केले. आंदोलनात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Morchaमोर्चा