शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अंगणवाडीचे बांधकाम अपूर्ण

By admin | Updated: July 3, 2014 23:35 IST

चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे २००८-०९ मध्ये अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. मात्र गेल्या चार वर्षापासून सदर बांधकाम अर्धवटच आहे. यामुळे अंगणवाडी केंद्रातील

चार वर्ष लोटले : सुभाषग्राम येथील अंगणवाडी भरते घरातमुलचेरा : चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे २००८-०९ मध्ये अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. मात्र गेल्या चार वर्षापासून सदर बांधकाम अर्धवटच आहे. यामुळे अंगणवाडी केंद्रातील बालकांना एका घरात बसून पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे. सुभाषग्राम येथील अपूर्ण असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्राप्त माहितीनुसार सदर बांधकाम लाख रूपयाचा आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या बांधकामाचे कंत्राट जवळच्या एका कंत्राटदाराला दिले होते. संबंधित कंत्राटदाराला पैसा न मिळाल्यामुळे सदर बांधकाम अर्धवट ठेवून संबंधित कंत्राटदार पसार झाल्याची माहिती आहे. सुभाषग्राम हे चामोर्शी तालुक्यातील सर्वात मोठा गाव आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास अडीच ते तीन हजार आहे. या गावामध्ये एकमेव अंगणवाडी आहे. लोकसंख्येचा विचार करून सुभाषग्राम येथे आणखी एक अंगणवाडी केंद्र मंजूर करण्यात आले. मात्र सदर अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम अर्धवट आहे. यामुळे या अंगणवाडी केंद्रातील मुले एका घरी बसून पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. या संदर्भात ग्रामसेवकांना विचारणा केली असता ग्रामपंचायतीच्या फंडामध्ये पैसा उपलब्ध नाही. त्यामुळे या अंगणवाडी केंद्राचे बांधकाम कसे पूर्ण करावे, असा प्रश्न ग्रा.पं. समोर निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)