शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

...अन् संतप्त रोहयो मजुरांनी केले कामबंद आंदोलन

By admin | Updated: June 13, 2017 00:39 IST

दिवसभर घाम गाळूनही अत्यल्प मजुरी मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर संतप्त झालेल्या बेलगाव येथील तलाव खोलीकरणाच्या कामावरील रोहयो मजुरांनी काम बंद पाडले.

बेलगाव येथील प्रकार : अभियंत्याच्या चुकीमुळे मिळत होती कमी मजुरी, मजुरांच्या अपरोक्ष कामाचे मोजमाप केल्याचा आरोपलोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : दिवसभर घाम गाळूनही अत्यल्प मजुरी मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर संतप्त झालेल्या बेलगाव येथील तलाव खोलीकरणाच्या कामावरील रोहयो मजुरांनी काम बंद पाडले. तालुक्यातील बेलगाव येथे जिल्हा परिषद सिंचाई विभागाच्या मार्फत रोजगार हमी योजनेंतर्गत तलाव खोलीकरणाचे काम करण्यात येत आहे. या कामावर गावातील ३०० पेक्षा अधिक मजूर कामावर आहेत. मागील एक आठवड्यापासून हे काम सुरू आहे. ११ जून रोजी सायंकाळी ७ वाजता सिंचन विभागाचे शाखा अभियंता कुंभारे यांनी कामाला भेट देऊन कामाचे मोजमाप केले. यावेळी मोजकेच मजूर उपस्थित होते. मोजमापानंतर प्रत्येक मजुराला दिवसाची केवळ ७० ते ९० रूपये मजुरी पडत असल्याचे मजुरांच्या लक्षात आले. ही बाब मजुरांना माहित होताच ते संतप्त झाले. जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे, पं.स. सदस्य संध्या नैताम यांच्या नेतृत्वात रोहयो मजुरांनी सोमवारी सकाळीच कामबंद आंदोलन केले. पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून आंदोलनाची माहिती पं.स. सभापती गिरीधारी तितराम, सिंचन विभागाचे उपअभियंता राऊत, शाखा अभियंता कुंभारे यांना देऊन रोहयो कामावर पाचारण केले. यावेळी मजुरांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. मजुरांचा संताप लक्षात घेऊन मानवी दृष्टीकोनातून जेवढी मदत शक्य आहे, तेवढी मदत करण्याचे आश्वासन अभियंत्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले व मजूर कामावर परतले. नेमकी किती मजुरी पडणार आहे, याचे पत्ते मात्र सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे उघडले नाही.उन्हाळ्यात मातीचे खोदकाम त्रासदायकसिंचन विभागाच्या मार्फत मे, जून महिन्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली जातात. या कालावधीत जमिनीतील ओलावा पूर्णपणे संपला राहतो. त्यामुळे जमीन कडक येते. परिणामी खंती व इतर अवजारांच्या सहाय्याने खोदकाम करणे कठीण होते. ही बाब अधिकारी वर्गाला माहित नाही. मातीची कामे डिसेंबर, जानेवारी महिन्यातच सुरू करणे आवश्यक आहे. या कालावधीत मातीत ओलावा राहत असल्याने खोदकाम करणे कमी त्रासाचे होते. कमिशनच्या लालसेपोटी सिंचन विभागाचे अभियंते यंत्राच्या माध्यमातूनच रोहयोची कामे करण्यास अधिक पसंती दर्शवितात. मात्र मजुरांकडून कामे होत नसल्याने शासनाकडून दबाव वाढतो. शासनाला केवळ देखावा म्हणून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सिंचन विभाग रोहयो कामांना सुरूवात करते, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे यांनी केला आहे.