शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

...अन् संतप्त रोहयो मजुरांनी केले कामबंद आंदोलन

By admin | Updated: June 13, 2017 00:39 IST

दिवसभर घाम गाळूनही अत्यल्प मजुरी मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर संतप्त झालेल्या बेलगाव येथील तलाव खोलीकरणाच्या कामावरील रोहयो मजुरांनी काम बंद पाडले.

बेलगाव येथील प्रकार : अभियंत्याच्या चुकीमुळे मिळत होती कमी मजुरी, मजुरांच्या अपरोक्ष कामाचे मोजमाप केल्याचा आरोपलोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : दिवसभर घाम गाळूनही अत्यल्प मजुरी मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर संतप्त झालेल्या बेलगाव येथील तलाव खोलीकरणाच्या कामावरील रोहयो मजुरांनी काम बंद पाडले. तालुक्यातील बेलगाव येथे जिल्हा परिषद सिंचाई विभागाच्या मार्फत रोजगार हमी योजनेंतर्गत तलाव खोलीकरणाचे काम करण्यात येत आहे. या कामावर गावातील ३०० पेक्षा अधिक मजूर कामावर आहेत. मागील एक आठवड्यापासून हे काम सुरू आहे. ११ जून रोजी सायंकाळी ७ वाजता सिंचन विभागाचे शाखा अभियंता कुंभारे यांनी कामाला भेट देऊन कामाचे मोजमाप केले. यावेळी मोजकेच मजूर उपस्थित होते. मोजमापानंतर प्रत्येक मजुराला दिवसाची केवळ ७० ते ९० रूपये मजुरी पडत असल्याचे मजुरांच्या लक्षात आले. ही बाब मजुरांना माहित होताच ते संतप्त झाले. जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे, पं.स. सदस्य संध्या नैताम यांच्या नेतृत्वात रोहयो मजुरांनी सोमवारी सकाळीच कामबंद आंदोलन केले. पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून आंदोलनाची माहिती पं.स. सभापती गिरीधारी तितराम, सिंचन विभागाचे उपअभियंता राऊत, शाखा अभियंता कुंभारे यांना देऊन रोहयो कामावर पाचारण केले. यावेळी मजुरांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. मजुरांचा संताप लक्षात घेऊन मानवी दृष्टीकोनातून जेवढी मदत शक्य आहे, तेवढी मदत करण्याचे आश्वासन अभियंत्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले व मजूर कामावर परतले. नेमकी किती मजुरी पडणार आहे, याचे पत्ते मात्र सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे उघडले नाही.उन्हाळ्यात मातीचे खोदकाम त्रासदायकसिंचन विभागाच्या मार्फत मे, जून महिन्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली जातात. या कालावधीत जमिनीतील ओलावा पूर्णपणे संपला राहतो. त्यामुळे जमीन कडक येते. परिणामी खंती व इतर अवजारांच्या सहाय्याने खोदकाम करणे कठीण होते. ही बाब अधिकारी वर्गाला माहित नाही. मातीची कामे डिसेंबर, जानेवारी महिन्यातच सुरू करणे आवश्यक आहे. या कालावधीत मातीत ओलावा राहत असल्याने खोदकाम करणे कमी त्रासाचे होते. कमिशनच्या लालसेपोटी सिंचन विभागाचे अभियंते यंत्राच्या माध्यमातूनच रोहयोची कामे करण्यास अधिक पसंती दर्शवितात. मात्र मजुरांकडून कामे होत नसल्याने शासनाकडून दबाव वाढतो. शासनाला केवळ देखावा म्हणून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सिंचन विभाग रोहयो कामांना सुरूवात करते, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे यांनी केला आहे.