शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

रूग्णवाहिका तिपटीने महागली

By admin | Updated: May 19, 2016 01:14 IST

शासकीय रूग्णवाहिकेचे दर शासनाने तिपटीने वाढविल्याने याचा फटका दुर्गम भागातील गरीब रूग्णांना बसत आहे.

तीन पट वाहतूक दर वाढले : खासगी वाहनांचा घ्यावा लागत आहे आधारप्रतीक मुधोळकर अहेरीशासकीय रूग्णवाहिकेचे दर शासनाने तिपटीने वाढविल्याने याचा फटका दुर्गम भागातील गरीब रूग्णांना बसत आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी विशेष सुट देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्रामीण भागातील रूग्णांना तालुकास्थळावरील ग्रामीण रूग्णालयात भरती करणे व ग्रामीण तसेच उपजिल्हा रूग्णालयात गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णांना गडचिरोली, चंद्रपूर किंवा नागपूर येथे हलविण्यात रूग्णवाहिका अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडते. रूग्णवाहिकेचे आजपर्यंतचे दर सर्वसामान्य व गरीब नागरिकांच्या आवाक्यामधील होते. प्रती किलोमीटर पाच रूपये एवढा दर आकारला जात होता. मात्र २८ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार आरोग्य सुविधांच्या शुल्कामध्ये वाढ केली आहे. यामध्ये रूग्णवाहिकेचा दर्जा प्रती किमी पाच रूपयांवरून १५ रूपये एवढा केला आहे. त्यामुळे रूग्णांना अधिकचे पैसे मापावे लागत आहेत. त्यामुळे अनेक रूग्णांचे नातेवाईक रूग्णाला रूग्णवाहिकेतून नेण्याचे टाळत असल्याचे चित्र दिसून येते. सद्यस्थितीत फक्त गरोदर मातांनाच मोफत रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाते. त्यामुळे काही रूग्णालयातील डॉक्टर या गरोदर मातेसोबतच रूग्णाला पाठवित आहेत. मात्र गरोदर माता न मिळाल्यास पैसे मोजण्याशिवाय पर्याय राहत नाही. रूग्णाला रूग्णालयामध्ये पोहोचविल्याबरोबर रूग्णवाहिकेचे बिल नगदी स्वरूपात देणे आवश्यक आहे. अन्यथा विलंब शुल्क आकारण्यात येते. या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. तासाला ७५ रूपये शुल्क आकारण्यात येत आहे. या वाढीव शुल्कामुळे रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासाठी शुल्कामध्ये कपात करण्यात यावी, अशी मागणी आहे. रेपर टू गडचिरोली रूग्णांची संख्या अधिकमोठ्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र तालुकास्थळावर ग्रामीण रूग्णालय तसेच आरमोरी, कुरखेडा व अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालय असले तरी या रूग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरविनाच चालविली जात आहेत. ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयात निम्म्यापेक्षा अधिक डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अत्याधुनिक साधनेही उपलब्ध नाही. त्यामुळे या रूग्णालयामध्ये भरती होणाऱ्या बहुतांश रूग्णांना गडचिरोली येथे रेफर करण्याचा सल्ला दिला जातो. अर्ध्यापेक्षा अधिक रूग्ण रेफर केले जातात. या रूग्णांना रूग्णवाहिकेचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे रूग्णवाहिकेचे वाढलेले दर नातेवाईकांसाठी अडचणीचे झाले आहेत.