शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णवाहिका तिपटीने महागली

By admin | Updated: May 19, 2016 01:14 IST

शासकीय रूग्णवाहिकेचे दर शासनाने तिपटीने वाढविल्याने याचा फटका दुर्गम भागातील गरीब रूग्णांना बसत आहे.

तीन पट वाहतूक दर वाढले : खासगी वाहनांचा घ्यावा लागत आहे आधारप्रतीक मुधोळकर अहेरीशासकीय रूग्णवाहिकेचे दर शासनाने तिपटीने वाढविल्याने याचा फटका दुर्गम भागातील गरीब रूग्णांना बसत आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी विशेष सुट देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्रामीण भागातील रूग्णांना तालुकास्थळावरील ग्रामीण रूग्णालयात भरती करणे व ग्रामीण तसेच उपजिल्हा रूग्णालयात गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णांना गडचिरोली, चंद्रपूर किंवा नागपूर येथे हलविण्यात रूग्णवाहिका अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडते. रूग्णवाहिकेचे आजपर्यंतचे दर सर्वसामान्य व गरीब नागरिकांच्या आवाक्यामधील होते. प्रती किलोमीटर पाच रूपये एवढा दर आकारला जात होता. मात्र २८ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार आरोग्य सुविधांच्या शुल्कामध्ये वाढ केली आहे. यामध्ये रूग्णवाहिकेचा दर्जा प्रती किमी पाच रूपयांवरून १५ रूपये एवढा केला आहे. त्यामुळे रूग्णांना अधिकचे पैसे मापावे लागत आहेत. त्यामुळे अनेक रूग्णांचे नातेवाईक रूग्णाला रूग्णवाहिकेतून नेण्याचे टाळत असल्याचे चित्र दिसून येते. सद्यस्थितीत फक्त गरोदर मातांनाच मोफत रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाते. त्यामुळे काही रूग्णालयातील डॉक्टर या गरोदर मातेसोबतच रूग्णाला पाठवित आहेत. मात्र गरोदर माता न मिळाल्यास पैसे मोजण्याशिवाय पर्याय राहत नाही. रूग्णाला रूग्णालयामध्ये पोहोचविल्याबरोबर रूग्णवाहिकेचे बिल नगदी स्वरूपात देणे आवश्यक आहे. अन्यथा विलंब शुल्क आकारण्यात येते. या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. तासाला ७५ रूपये शुल्क आकारण्यात येत आहे. या वाढीव शुल्कामुळे रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासाठी शुल्कामध्ये कपात करण्यात यावी, अशी मागणी आहे. रेपर टू गडचिरोली रूग्णांची संख्या अधिकमोठ्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र तालुकास्थळावर ग्रामीण रूग्णालय तसेच आरमोरी, कुरखेडा व अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालय असले तरी या रूग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरविनाच चालविली जात आहेत. ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयात निम्म्यापेक्षा अधिक डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अत्याधुनिक साधनेही उपलब्ध नाही. त्यामुळे या रूग्णालयामध्ये भरती होणाऱ्या बहुतांश रूग्णांना गडचिरोली येथे रेफर करण्याचा सल्ला दिला जातो. अर्ध्यापेक्षा अधिक रूग्ण रेफर केले जातात. या रूग्णांना रूग्णवाहिकेचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे रूग्णवाहिकेचे वाढलेले दर नातेवाईकांसाठी अडचणीचे झाले आहेत.