शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

आंबेडकरी चळवळ राज्यात रूजविणार - सुरेश माने

By admin | Updated: August 28, 2015 00:10 IST

आंबेडकरी चळवळ राजकारणात यशस्वी होऊ नये म्हणून काही लोक प्रयत्न करीत आहेत.

आरमोरीत आंबेडकरी युवा संमेलन : शेकडो युवकांची उपस्थितीआरमोरी : आंबेडकरी चळवळ राजकारणात यशस्वी होऊ नये म्हणून काही लोक प्रयत्न करीत आहेत. राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील युवकांचा कार्यकर्त्यांचा वापर विविध पक्ष करीत आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रात ही चळवळ यशस्वी झाली नाही. भूतकाळात झालेल्या चुका भविष्यात होऊ नये याची खबरदारी घेणे ही आजची गरज आहे. येणाऱ्या पाच वर्षात सक्रीय युवकांना चळवळीत घेऊन आंबेडकरी चळवळ राज्यात रूजविली जाईल, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत तथा संविधानतज्ज्ञ अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी केले.बहुजन रिपब्लिकन आंबेडकर राईट्स मुव्हमेंटच्या वतीने आरमोरी येथील साई सभागृहात बिरसा मुंडा, फुले, शाहू, आंबेडकरी युवा संमेलन, डॉ. बाबासाहेबानंतर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक व राजकीय स्तरावर अपयश का? आजचा तरूण आंबेडकरी चळवळीपासून का दुरावतोय? कारणे व उपाय या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये होते. संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दशरथ मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. भुपेन रायपुरे, नंदू नरोटे, संजय मंगर, विजय ठवरे, सर्वजीत बन्सोडे, संजय सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी किशोर गजभिये यांनी मार्गदर्शन करताना आजच्या युवा पिढीवर भविष्याची जबाबदारी आहे. त्यामुळे व्यवस्थेला आव्हान देऊन लढण्याची ताकद युवकांमध्ये निर्माण करण्याचे काम आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्यांनी केले पाहिजे. काही लोक दलित, आदिवासी व बहुजन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे. जुने विचार डोक्यातून काढून नवीन विचारांची साठवणूक करा, असे आवाहन त्यांनी युवकांना केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. कैलाश नगराळे, खिरेंद्र बांबोळे, राज बन्सोड, बाळू टेंभुर्णे, मोरेश्वर बारसागडे, यशवंत जांभुळकर, क्षिरसागर शेंडे, किशोर सहारे, अनिल ठवरे, जयकुमार शेंडे, देवा बनकर, हिरा राऊत, गणपत तावाडे यांनी सहकार्य केले.