शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

विहिरीसाठी आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2017 01:36 IST

गत ६०- ७० वर्षांपासून खुली असलेली विहीर लोकसहभागातून ग्रामपंचायतीने चांगली बांधली.

लोकमत न्यूज नेटवर्क घोसरी : गत ६०- ७० वर्षांपासून खुली असलेली विहीर लोकसहभागातून ग्रामपंचायतीने चांगली बांधली. त्यानंतर त्या विहिरीतील पाण्याचा वापर गावकरी करीत होते. दरम्यान, काही जणांनी अतिक्रमण करून पाणी बंद केल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत संबंधितांना निवेदने देवूनसुध्दा दखल घेतली नसल्याने तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारोती तिवाडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मूल तालुक्यातील मौजा नवेगाव (भू) येथील वार्ड नं. १ मधील बेलाची विहीर गत ६० ते ७० वर्षांपासून खुली असून गावकरी पिण्याच्या पाण्याचा वापर करीत आहे. त्यामुळे लोकसहभागातून ग्रामपंचायतीने या विहिरींचे चांगले बांधकामसुध्दा केले. दरम्यान, विनायक बालाजी देशमुख यांनी अतिक्रमण करून विहिरीला काटेरी कुंपण लावून गावकऱ्यांचे पाणी बंद केलेले आहे. सदर बाब तंटामुक्ती समितीसमोर आल्याने अतिक्रमण हटविण्यासाठी सर्वसंमतीने ठराव पारित केला. परंतु विनायक देशमुख यांनी विहिरीवर हक्क दाखविणे सुरू केले. त्यामुळे गावकऱ्यांनी संबंधिताकडे निवेदने देवून विहीर खुली करण्याची मागणी केली. परंतु याची संबंधितांकडून दखल घेण्यात आली नाही. परिणामी गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची अधिक गरज पडते. मात्र याचवेळी पाणी टंचाईदेखील मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. तरीही या विहिरीकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे २५ मेपासून तंमुस अध्यक्ष मारोती ऋषी तिवाडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. तप्त उन्हात ते तीन दिवसांपासून उपोषण करीत असून त्यांची प्रकृती खालावत आहे. मात्र अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.