शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

३ हजार २०० किमीच्या रस्त्यांचा अनुशेष कायमच

By admin | Updated: February 25, 2015 01:39 IST

गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात जिल्हा अंतर्गत ग्रामीण रस्त्यांची प्रचंड दूरावस्था झाली असून जिल्ह्यात अद्याप ३ हजार २०३ किमी लांबीच्या रस्त्यांचा अनुशेष कायमच आहे.

लोकमत विशेषगडचिरोली : गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात जिल्हा अंतर्गत ग्रामीण रस्त्यांची प्रचंड दूरावस्था झाली असून जिल्ह्यात अद्याप ३ हजार २०३ किमी लांबीच्या रस्त्यांचा अनुशेष कायमच आहे. ते रस्ते निर्माण करण्यासाठी ६०० कोटी रूपयांची गरज असल्याचे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने राज्य सरकारला कळविले आहे. प्रती वर्षी १०० कोटी रूपयें मिळाल्यास सहा वर्षांत हा अनुशेष भरून काढता येईल, असेही जिल्हा परिषदेने राज्य शासनाला सूचविले आहे. गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा असून या जिल्ह्यात वनाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे पर्जन्यमान अधिक प्रमाणात होते. यामुळे सध्या असलेल्या रस्त्यांची ही बिकट अवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेकडे जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते येतात. जिल्हा परिषदजवळ या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठीही अडचण आहे. शिवाय जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या भागात नवे रस्ते निर्माण करण्याचे कामही निधी अभावी रखडलेले आहे. त्यामुळे याचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. २००१ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात १३७५ किमी रस्ते विकासाचे उद्दीष्ट होते. तर २०२१ पर्यंत ५००९ किमी रस्ते निर्मितीचे उद्दीष्ट जिल्हा परिषदेने निश्चित केले आहे. यापैकी २००१ पर्यंत केवळ ८८८ किमी व २०१५ पर्यंत २ हजार २९३ किमी लांबींच्या रस्त्याची निर्मिती करण्यात आली. अद्यापही जिल्ह्यात ४८७ किमी लांबीचे इतर जिल्हा मार्ग २ हजार ७१६ किमी लांबीचे ग्रामीण रस्ते व्हायचे आहेत, असे दोन्ही मिळून ३ हजार २०३ किमी लांबीचे रस्ते बांधावे लागणार आहे. यासाठी २० लक्ष प्रती किमी प्रमाणे ३ हजार २०० किमीच्या रस्ते निर्मितीसाठी ६०० कोटी रूपयांची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेने राज्य सरकारला हा संपूर्ण आराखडा सादर केला आहे. राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे हा आराखडा देण्यात आला आहे. राज्य सरकारने प्रती वर्षी १०० कोटी रूपयें जिल्हा परिषदेला दिल्यास सहा वर्षांत रस्ते कामाचा हा अनुशेष पूर्ण होईल, असे जिल्हा परिषदेने म्हटले आहे. (नगर प्रतिनिधी)