शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण वाढत असले तरी शहरात येणाऱ्या प्रवाशांचा ओघ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:54 IST

गडचिराेली : गडचिराेली शहरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली असली तरी ग्रामीण भागातून जिल्हास्थळी येणाऱ्या प्रवाशांचा ओघ कायम ...

गडचिराेली : गडचिराेली शहरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली असली तरी ग्रामीण भागातून जिल्हास्थळी येणाऱ्या प्रवाशांचा ओघ कायम असल्याचे बसस्थानकातील गर्दीवरून दिसून येते.

गडचिराेली जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या १७ एवढी कमी झाली हाेती. त्यानंतर मात्र मागील आठ दिवसांत सातत्याने काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, उपचार सुरू असलेल्या एकूण ६४ रुग्णांपैकी ५० रुग्ण गडचिराेली शहर व तालुक्यातील आहेत. त्यामुळे काेराेनाचा धाेका शहरातच अधिक आहे. काेराेना रुग्णांची संख्या गडचिराेली शहरात वाढत असल्याने शहरात येणाऱ्या प्रवाशांचा ओघ कमी हाेईल, असा अंदाज हाेता. मात्र विविध प्रशासकीय कामे, बँका व गडचिराेलीवरून इतर गावांना जाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक गडचिराेली शहरात येत असल्याचे दिसून येत आहे. साेमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सकाळपासूनच बसस्थानक परिसरात गर्दी हाेती. दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसमध्येसुद्धा प्रवाशांची गर्दी दिसून आली.

बाॅक्स...

ना मास्क, ना डिस्टन्सिंग

जिल्ह्यात काेराेनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी याेग्य ती काळजी घेण्याचे आवाहन एसटीमार्फत केले जात आहे. बसस्थानकात असलेल्या ध्वनिक्षेपकावरून संदेश दिला जात आहे. काही नागरिकांनी नियमांचे पालन करीत ताेंडाला मास्क लावल्याचे दिसून येत हाेते. मात्र, काही नागरिक बसमध्ये बिनधास्त बसल्याचे दिसून येत हाेते. त्यामुळे काेराेनाचे हे संकट पुन्हा शहरी भागातून ग्रामीण भागापर्यंत पाेहाेचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाॅक्स...

चालक-वाहकांच्याही ताेंडाला मास्क नाही

काेराेनापासून प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येक चालक व वाहकाने मास्क घालणे आवश्यक केले आहे. मास्कशिवाय प्रवाशांना बसमध्ये प्रवेश दिला जाऊ नये. तसेच मास्क घालण्याविषयीच्या सूचना प्रवाशांना द्याव्यात, असे निर्देश एसटीमार्फत चालक व वाहकांना देण्यात आले असले तरी फार कमी चालक व वाहक या नियमांचे पालन करीत असल्याचे दिसून येत हाेते. चालक व वाहकांच्याच ताेंडाला मास्क नसल्याने त्यांनी इतरांना मार्गदर्शन न केलेलेच बरे.

बाॅक्स...

शनिवारी व रविवारी काही फेऱ्या बंद

शनिवारी व रविवारी शासकीय कार्यालयांना सुटी राहत असल्याने ग्रामीण भागातून नागरिक शहरात येत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसला फारसे प्रवास मिळत नाहीत. त्यामुळे शनिवारी व रविवारी ग्रामीण भागात चालणाऱ्या काही बसफेऱ्या बंद ठेवल्या जात आहेत.