शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
3
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
4
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
5
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
6
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
7
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
8
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
9
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
10
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
11
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
12
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
13
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
14
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
15
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
16
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
17
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
18
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
19
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच

रुग्ण वाढत असले तरी शहरात येणाऱ्या प्रवाशांचा ओघ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:54 IST

गडचिराेली : गडचिराेली शहरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली असली तरी ग्रामीण भागातून जिल्हास्थळी येणाऱ्या प्रवाशांचा ओघ कायम ...

गडचिराेली : गडचिराेली शहरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली असली तरी ग्रामीण भागातून जिल्हास्थळी येणाऱ्या प्रवाशांचा ओघ कायम असल्याचे बसस्थानकातील गर्दीवरून दिसून येते.

गडचिराेली जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या १७ एवढी कमी झाली हाेती. त्यानंतर मात्र मागील आठ दिवसांत सातत्याने काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, उपचार सुरू असलेल्या एकूण ६४ रुग्णांपैकी ५० रुग्ण गडचिराेली शहर व तालुक्यातील आहेत. त्यामुळे काेराेनाचा धाेका शहरातच अधिक आहे. काेराेना रुग्णांची संख्या गडचिराेली शहरात वाढत असल्याने शहरात येणाऱ्या प्रवाशांचा ओघ कमी हाेईल, असा अंदाज हाेता. मात्र विविध प्रशासकीय कामे, बँका व गडचिराेलीवरून इतर गावांना जाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक गडचिराेली शहरात येत असल्याचे दिसून येत आहे. साेमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सकाळपासूनच बसस्थानक परिसरात गर्दी हाेती. दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसमध्येसुद्धा प्रवाशांची गर्दी दिसून आली.

बाॅक्स...

ना मास्क, ना डिस्टन्सिंग

जिल्ह्यात काेराेनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी याेग्य ती काळजी घेण्याचे आवाहन एसटीमार्फत केले जात आहे. बसस्थानकात असलेल्या ध्वनिक्षेपकावरून संदेश दिला जात आहे. काही नागरिकांनी नियमांचे पालन करीत ताेंडाला मास्क लावल्याचे दिसून येत हाेते. मात्र, काही नागरिक बसमध्ये बिनधास्त बसल्याचे दिसून येत हाेते. त्यामुळे काेराेनाचे हे संकट पुन्हा शहरी भागातून ग्रामीण भागापर्यंत पाेहाेचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाॅक्स...

चालक-वाहकांच्याही ताेंडाला मास्क नाही

काेराेनापासून प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येक चालक व वाहकाने मास्क घालणे आवश्यक केले आहे. मास्कशिवाय प्रवाशांना बसमध्ये प्रवेश दिला जाऊ नये. तसेच मास्क घालण्याविषयीच्या सूचना प्रवाशांना द्याव्यात, असे निर्देश एसटीमार्फत चालक व वाहकांना देण्यात आले असले तरी फार कमी चालक व वाहक या नियमांचे पालन करीत असल्याचे दिसून येत हाेते. चालक व वाहकांच्याच ताेंडाला मास्क नसल्याने त्यांनी इतरांना मार्गदर्शन न केलेलेच बरे.

बाॅक्स...

शनिवारी व रविवारी काही फेऱ्या बंद

शनिवारी व रविवारी शासकीय कार्यालयांना सुटी राहत असल्याने ग्रामीण भागातून नागरिक शहरात येत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसला फारसे प्रवास मिळत नाहीत. त्यामुळे शनिवारी व रविवारी ग्रामीण भागात चालणाऱ्या काही बसफेऱ्या बंद ठेवल्या जात आहेत.