शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

पाचवी ते आठवीचे वर्ग भरविण्यासाठी लगबग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : काेराेनाच्या संकटावर मात करीत नववी ते बारावीचे वर्ग जिल्ह्यात सुरू झाले आहेत. त्यानंतर आता ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : काेराेनाच्या संकटावर मात करीत नववी ते बारावीचे वर्ग जिल्ह्यात सुरू झाले आहेत. त्यानंतर आता राज्य शासनाच्या निर्णयानुसार पाचवी ते आठवीचेही वर्ग सुरू केले जाणार आहेत. यासंदर्भात जि.प.च्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने पूर्वतयारी सुरू केली असून साेमवारी सर्व शाळांना याबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव सादर केला हाेता. ताे मान्य झाला असून २७ जानेवारीपासून हे वर्ग सुरू करण्याचे आदेश निघाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जि.प.प्रशासनाने या वर्गाच्या शाळा उघडण्यासाठी पूर्व तयारी सुरू केली आहे.

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा झाल्यानंतर २७ जानेवारीपासून जिल्हा परिषदेसह नगरपालिका, खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, विनाअनुदानित तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमधील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी आर.पी.निकम यांनी लाेकमतशी बाेलताना दिली. माध्यमिक शाळांसाठी जसी व्यवस्था केली तशीच प्राथमिकमध्ये करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

९ ते १२ वी वर्गात ५५ टक्के विद्यार्थी उपस्थिती

गडचिराेली जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग दीड महिन्यापूर्वी सुरू झाले. या वर्गात सर्व शाळा मिळून जिल्हाभरात एकूण ४६ हजार ९१२ विद्यार्थी आहेत. सद्य:स्थितीत २३ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची शाळांमध्ये उपस्थिती असून या उपस्थितीची टक्केवारी ५५ इतकी आहे. सुरुवातीला या माध्यमिक वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी हाेती. शाळा सुरू झाल्यानंतर १५ दिवस २० ते २५ टक्केच विद्यार्थी हजर राहत हाेते. मात्र दर हप्त्याला उपस्थित विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली. प्राथमिक वर्ग सुरू झाल्यानंतर माध्यमिक वर्गातील विद्यार्थी उपस्थिती आणखी वाढणार आहे.

काेट...

काय म्हणतात पालक...

ऑनलाईन शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष शाळेतील शिक्षण कधीही चांगले आहे. फक्त शाळांनी काेराेनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे.

- भाऊराव मुनघाटे

महिनाभरापूर्वी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. शाळा व प्रशासनाने काेराेनाबाबत याेग्य खबरदारी घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे पाचवी ते आठवीचे वर्गही उत्तमरीत्या सुरू राहू शकतात.

- चंद्रकांत वाघरे

शाळा बंद असल्याने बहुतांश मुले, मुली, खाेडकर झाली आहेत. ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू असले तरी त्यात फरक आहे. मुलांमध्ये बेशिस्तपणा आला आहे.

- प्रकाश शेंडे

काेट...

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सदर वर्ग सुरू हाेणाऱ्या प्रत्येक शाळेत हॅन्डवाॅश स्टेशन, सॅनिटायझर आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे. जि.प.शाळांमध्ये व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीवर आहे. न.प.शाळेत नगर पालिका प्रशासन तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये संबंधित संस्थेवर ही व्यवस्था करण्याची जबाबदारी आहे.

- आर.पी.निकम, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प.गडचिराेली