शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घर बांधकामासाठी रेतीची परवानगी द्या!

By admin | Updated: February 14, 2017 00:47 IST

केंद्र व राज्य सरकारकडून गरजूंना घरकूल व शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे.

पालकमंत्र्यांना निवेदन : महागाव (बु.), महागाव (खु.) व खमनचेरू येथील नागरिकांची मागणीअहेरी : केंद्र व राज्य सरकारकडून गरजूंना घरकूल व शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे. ग्रामीण भागात सर्वसामान्य जनतेला रेती घाटांवरून खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. शिवाय अनेक घाटांचे लिलावही झाले नाही. त्यामुळे घरकूल व शौचालय बांधकामासाठी वन विभागाकडून रेती पुरवठा करण्याची परवानगी मिळवून द्यावी, अशी मागणी महागाव बू., महागाव खू., खमनचेरू ग्राम पंचायतीच्या वतीने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तिन्ही गावालगत प्राणहिता नदीचे १०० ते १५० मीटर अंतरावर नदीपात्र आहे. परंतु यंदा रेतीघाटाचे लिलाव झाले नाही. सध्या रेती घाट आलापल्ली वन विभागाच्या अधिनस्त आहेत. त्यांच्याकडून रेतीघाटाचे लिलाव होऊ शकत नाही. जवळपास एका घरकुलासाठी १० ते १५ ब्रास रेती वापरावी लागते. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी एक ब्रास रेती नेण्यास मनाई करीत आहेत. चिंचगुंडी रेतीघाटाचा लिलाव झाला आहे. त्या रेतीघाटावरून परवानाकृत रेती आणून घरकुलाचे बांधकाम करावे, असे अधिकारी सांगत आहेत. चिंचगुंडी रेतीघाटावर एका परवान्यासाठी तीन हजार रूपये लागतात. हे गरिबांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. या रेतीघाटावर १ हजार ४०० परवाने उपलब्ध असून संपूर्ण अहेरी तालुक्यात इतरत्र कुठेही रेती घाटाचे लिलाव झालेले नाही. उपलब्ध परवान्यातून शासनाची विकास कामे व शासनाच्या योजनांतून होणारे बांधकाम याकरिता रेतीचा उपयोग करणे आवश्यक असते. परवानाकृत रेती परवडणारी नाही. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत घरकूल व शौचालयाचे बांधकाम पूर्ण करायचे असून याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा. शासनाने दिलेल्या घरकूल व शौचालय बांधकाम योजनेसाठी परवानाकृती रेती घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. शासनाने ठरवून दिलेला निधी कमी पडतो. त्यामुळे अतिरिक्त परवाने उपलब्ध करून द्यावे, आलापल्ली वन विभागाकडून गरिबांना रेती वाहतूक करण्यास परवानगी मिळवून द्यावी, अशी मागणी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय अलोणे, भीमराव कांबळे, राजेश्वर रामटेके, भीमन्ना बदीवार, सत्यम गर्गम, विनोद गर्गम, वासुदेव गोंगले, राजाराम गर्गम, शिवराम गर्गम, अशोक दुर्गे, विठ्ठल दुर्गे, रवी रामटेके, छत्रपती अलोणे, शिवराम टेकुल, शंकर पानेम, सत्यनारायण पानेम, बाबुराव मोहर्ले, स्वामी आत्राम, प्रेमकुमार ओंडरे, आनंदराव गोंगले, दौलत गोंगले, शिवकुमार जनगम, गौतम बाला, शंकर मुंजमकर, मनोहर मंजुमकर, पुंडलिक अलोणे, मनोहर अलोणे, शिवकुमार पानेम, श्रावण पानेम, लचमा वेलादी यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. (प्रतिनिधी)