शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

घर बांधकामासाठी रेतीची परवानगी द्या!

By admin | Updated: February 14, 2017 00:47 IST

केंद्र व राज्य सरकारकडून गरजूंना घरकूल व शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे.

पालकमंत्र्यांना निवेदन : महागाव (बु.), महागाव (खु.) व खमनचेरू येथील नागरिकांची मागणीअहेरी : केंद्र व राज्य सरकारकडून गरजूंना घरकूल व शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे. ग्रामीण भागात सर्वसामान्य जनतेला रेती घाटांवरून खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. शिवाय अनेक घाटांचे लिलावही झाले नाही. त्यामुळे घरकूल व शौचालय बांधकामासाठी वन विभागाकडून रेती पुरवठा करण्याची परवानगी मिळवून द्यावी, अशी मागणी महागाव बू., महागाव खू., खमनचेरू ग्राम पंचायतीच्या वतीने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तिन्ही गावालगत प्राणहिता नदीचे १०० ते १५० मीटर अंतरावर नदीपात्र आहे. परंतु यंदा रेतीघाटाचे लिलाव झाले नाही. सध्या रेती घाट आलापल्ली वन विभागाच्या अधिनस्त आहेत. त्यांच्याकडून रेतीघाटाचे लिलाव होऊ शकत नाही. जवळपास एका घरकुलासाठी १० ते १५ ब्रास रेती वापरावी लागते. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी एक ब्रास रेती नेण्यास मनाई करीत आहेत. चिंचगुंडी रेतीघाटाचा लिलाव झाला आहे. त्या रेतीघाटावरून परवानाकृत रेती आणून घरकुलाचे बांधकाम करावे, असे अधिकारी सांगत आहेत. चिंचगुंडी रेतीघाटावर एका परवान्यासाठी तीन हजार रूपये लागतात. हे गरिबांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. या रेतीघाटावर १ हजार ४०० परवाने उपलब्ध असून संपूर्ण अहेरी तालुक्यात इतरत्र कुठेही रेती घाटाचे लिलाव झालेले नाही. उपलब्ध परवान्यातून शासनाची विकास कामे व शासनाच्या योजनांतून होणारे बांधकाम याकरिता रेतीचा उपयोग करणे आवश्यक असते. परवानाकृत रेती परवडणारी नाही. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत घरकूल व शौचालयाचे बांधकाम पूर्ण करायचे असून याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा. शासनाने दिलेल्या घरकूल व शौचालय बांधकाम योजनेसाठी परवानाकृती रेती घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. शासनाने ठरवून दिलेला निधी कमी पडतो. त्यामुळे अतिरिक्त परवाने उपलब्ध करून द्यावे, आलापल्ली वन विभागाकडून गरिबांना रेती वाहतूक करण्यास परवानगी मिळवून द्यावी, अशी मागणी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय अलोणे, भीमराव कांबळे, राजेश्वर रामटेके, भीमन्ना बदीवार, सत्यम गर्गम, विनोद गर्गम, वासुदेव गोंगले, राजाराम गर्गम, शिवराम गर्गम, अशोक दुर्गे, विठ्ठल दुर्गे, रवी रामटेके, छत्रपती अलोणे, शिवराम टेकुल, शंकर पानेम, सत्यनारायण पानेम, बाबुराव मोहर्ले, स्वामी आत्राम, प्रेमकुमार ओंडरे, आनंदराव गोंगले, दौलत गोंगले, शिवकुमार जनगम, गौतम बाला, शंकर मुंजमकर, मनोहर मंजुमकर, पुंडलिक अलोणे, मनोहर अलोणे, शिवकुमार पानेम, श्रावण पानेम, लचमा वेलादी यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. (प्रतिनिधी)