शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

७६ कोटींचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:03 IST

खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील १८ हजार ५१३ शेतकऱ्यांना ७६ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज बँकांनी वितरित केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या ४८ टक्के कर्जाचे वितरण झाले आहे. शेतीसाठी यंत्रांचा वापर केला जातो. तसेच खते, कीटकनाशके, बियाणे सुद्धा खरेदी करावे लागतात.

ठळक मुद्देखरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची धावपळ : दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ४८ टक्के वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील १८ हजार ५१३ शेतकऱ्यांना ७६ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज बँकांनी वितरित केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या ४८ टक्के कर्जाचे वितरण झाले आहे.शेतीसाठी यंत्रांचा वापर केला जातो. तसेच खते, कीटकनाशके, बियाणे सुद्धा खरेदी करावे लागतात. या सर्व बाबींवर हजारो रुपयांचा खर्च होतो. एवढा पैसा शेतकºयाकडे राहत नसल्याने सावकाराकडून कर्ज काढावे लागत होते. सावकाराकडून मागितलेल्या कर्जावर मोठ्या प्रमाणात व्याजदर आकारला जात असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येत होता. कधीकधी कर्जापाई आत्महत्याही करावी लागत होती. शेतकºयाला सावकाराच्या पाशातून बाहेर काढण्यासाठी शासनाने पीक कर्ज ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकºयांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. बँकांनी शेतकºयांना कर्ज द्यावे, यासाठी प्रत्येक बँकेला कर्ज देण्याची सक्ती करण्यात आली आहे.२०१९ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील बँकांनी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट दिले होते. काही शेतकºयांनी खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच कर्जाची उचल केली आहे तर काही शेतकरी अजूनही कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत. २२ जुलैपर्यंत १८ हजार ५१३ शेतकºयांना बँकांनी ७६ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या ४८.३३ कोटी रुपये कर्जाचे वितरण झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत बँकांची संख्या कमी आहे. काही गावांना बँकेपर्यंत पोहोचण्यासाठी ५० किमी अंतर गाठावे लागते. कर्जाची केस मंजूर करण्यासाठी आठ दिवस फेºया झाल्यास शेतकºयाचे हजारो रुपये खर्च होतात. तसेच ये-जा करण्याची सुविधा नसल्याने शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. परिणामी दुर्गम व नक्षलग्रस्त भागात वास्तव्यास असलेले शेतकरी कर्ज घेण्यास तयार होत नाही. परिणामी बँकांना दिलेल्या उद्दिष्टाएवढे कधीच कर्ज वितरण होत नाही.कर्जमाफीअभावी नवीन कर्जाची उचल थांबलीदोन वर्षांपूर्वी शासनाने कर्जमाफी केली. याचा लाभ अजूनही काही शेतकºयांना मिळाला नाही. जुने कर्ज कायम असल्याने नवीन कर्ज बँका देण्यास तयार होत नाही. कर्ज माफ होईल, या अपेक्षेने शेतकरी सुद्धा कर्ज भरत नाही. परिणामी मागील दोन वर्षांपासून कर्ज उचलणाºया शेतकºयांची संख्या घटली आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत, त्याच शेतकºयांनी कर्जाची उचल केली आहे. दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश बँकांना असले तरी बँकाही फारसा पुढाकार घेत नाही.सहकारी बँकेतर्फे ४४ कोटींचे कर्ज वितरणकर्ज वितरणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आघाडी घेतली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हाभरात ५० पेक्षा अधिक शाखा आहेत. यातील बहुतांश शाखा ग्रामीण व दुर्गम भागात आहेत. त्यामुळे शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेण्यास प्राधान्य देतात. सहकारी बँकेला यावर्षीच्या खरीप हंगामात ५५ कोटी ७५ लाख रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ४४ कोटी ५५ लाख रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. बँकेला दिलेल्या उद्दिष्टाच्या ७९.९१ टक्के कर्ज वितरण झाले आहे. पुन्हा कर्ज वाटप वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज