शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
2
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
3
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
4
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
5
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
6
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
7
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
8
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
9
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
10
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
11
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
12
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
13
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
14
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
15
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
16
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
17
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
18
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
19
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
20
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

पावसामुळे सारेचजण सुखावले

By admin | Updated: October 7, 2014 23:33 IST

यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेपासून जिल्ह्यात पावसाने कायमची दांडी मारली होती. पावसाअभावी जिल्ह्यातील हलक्याप्रतीचे शेवटच्या घटका मोजत होते.

गडचिरोली : यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेपासून जिल्ह्यात पावसाने कायमची दांडी मारली होती. पावसाअभावी जिल्ह्यातील हलक्याप्रतीचे शेवटच्या घटका मोजत होते. जड धानपीकाची शेती कडक आली होती. त्यामुळे धानपीकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची सर्वत्र धडपड सुरू झाली होती. मात्र आज ७ आॅक्टोबर रोजी बऱ्यापैकी पाऊस आल्याने धानपीकाला पाणी पुरवठा झाला आहे. आजच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सारेचजण सुखावले आहे. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नाही. या कालावधीत सुर्यही कोपत होता. यामुळे धानपीकाला फटका बसत होता. प्रचंड तापमानामुळे नागरिकही हैराण झाले होते. यामुळे अनेक नागरिकांनी आपल्या घरातील कुलर सुरू केले होते. मात्र महिनाभराच्या कालावधीनंतर पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आरमोरी तालुक्यातील कासवी व वैरागड परिसरातील शेतकऱ्यांची पाऊस होत नसल्यामुळे सिंचाई विभागाच्या विरोधात ओरड होत होती. घोट परिसरातील रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी १४ गावापर्यंतच्या शेतींना पोहोचत नसल्याने या गावातील नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. पाऊस झाल्यामुळे घोट परिसरातील १४ गावातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)