शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
3
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
4
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
5
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
6
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
7
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
8
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
9
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
10
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
11
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
12
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
13
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
14
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
15
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
16
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
17
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
18
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
19
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
20
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम

नव्या वर्षात सारे संकल्प सिद्धीस जावोत!

By admin | Updated: January 1, 2016 02:05 IST

गडचिरोली जिल्ह्यात मागील १५ वर्षांपासून शासनाच्या ७९ आस्थापनांमध्ये २४०० वर अधीक पदे रिक्त आहेत. यामध्ये वर्ग १, २,

गडचिरोली जिल्ह्यात मागील १५ वर्षांपासून शासनाच्या ७९ आस्थापनांमध्ये २४०० वर अधीक पदे रिक्त आहेत. यामध्ये वर्ग १, २, ३, ४ च्या पदांचा समावेश आहे. ही पदे भरल्या न गेल्याने प्रशासकीय यंत्रणा आॅक्सिजनवरच आहे. संपूर्ण जिल्ह्याचा कारभार पाहणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकाऱ्यांची चार ते पाच पदे रिक्त आहेत. येथे अधिकारी दिले जातात. मात्र ते गडचिरोलीत रूजू होण्यासाठी येत नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांची १०० वर अधिक पदे रिक्त आहेत. नव्या महिला व बाल रुग्णालयाला नवीन दीडशे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी लागणार आहेत. त्याची पदमान्यता मिळालेली नाही. नवीन वर्षात रिक्त पदांचा हा भार कमी करण्यासाठी शासनाने कडक उपाययोजना करून गडचिरोली जिल्ह्याचे प्रशासन गतिमान करावे, अशी अपेक्षा आहे.अहेरी जिल्हा निर्मितीचे स्वप्न ४गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात यावा, अशी मागणी गेल्या ३० वर्षांपासूनची आहे. या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला तसा अहवालही मागितला आहे. २०१६ या वर्षात नव्या अहेरी जिल्ह्याच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली जावो, असा संकल्प अनेकांनी केला आहे. हा संकल्प सिद्धीस नेण्याचे मोठे आव्हान सरकार समोर राहणार आहे.सूरजागडच्या निर्मितीची आस४२०१५ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून ‘मेक इन इंडिया’चा नारा देण्यात आला. या अभियानात गडचिरोलीही कनेक्ट आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सूरजागड प्रकल्पासह औद्योगिक विकासाबाबत आॅगस्ट महिन्यात दिल्ली येथे बैठक झाली. अनेक मोठ्या उद्योगपतींना येथे उद्योग लावण्यासाठी आंमत्रण देण्यात आले. सरकारकडून प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे. औद्योगिक विकासाचे हे स्वप्न यंदा साकार होवो, अशी अनेकांची इच्छा आहे. त्या दृष्टीने कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनाही सज्ज व्हावे लागणार आहे.सिंचनाचा अनुशेष दूर होवो४१९८० च्या वनकायद्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात एकही सिंचन प्रकल्प उभा राहू शकला नाही. वन कायद्यामुळे जवळजवळ १० मोठे व १५ मध्यम लघु प्रकल्प रखडलेले आहेत. याची किंमतही आता पाच ते सहा पटीने वाढलेली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सिंचन विकासाचा अनुशेष २०१६ मध्ये कमी होण्याच्या दृष्टीने शासनस्तरावरून प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तेव्हाच शेतकऱ्याला अच्छे दिन येतील.गडचिरोलीत रेल्वे येण्याचे स्वप्न४वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाला केंद्र व राज्य सरकारकडून हिरवी झेंडी मिळाली. राज्य सरकारने आपल्या वाट्याची रक्कम देण्यास मंजुरीही दिली आहे. २०१६ या वर्षात रेल्वे मार्गाचे काम सुरू होऊन या जिल्हावासींचे रेल्वेचे स्वप्न यंदा पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच जिल्ह्यातून चार राष्ट्रीय महामार्गही मंजूर झालेत. त्याचे काम यावर्षात सुरू होईल, अशी अपेक्षा वावगी ठरून नये. तसेच सर्व रस्त्यांवरचे खड्डे बुजविले जावे.