शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

चकमकीत ठार झालेले सर्व इसम नक्षली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:10 IST

२२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्याच्या कसनासूर जंगलात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत ३४ नक्षलवादी ठार झाले. सदर घटनेबाबत सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी सोमवारी पत्र परिषद घेऊन ही चकमक बनावट असल्याचा आरोप केला होता.

ठळक मुद्देमानवाधिकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा दावा : सत्यशोधन समितीचे आरोप ठरविले निराधार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्याच्या कसनासूर जंगलात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत ३४ नक्षलवादी ठार झाले. सदर घटनेबाबत सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी सोमवारी पत्र परिषद घेऊन ही चकमक बनावट असल्याचा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर मानवाधिकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्र परिषद घेऊन सत्यशोधन समितीचे सर्व आरोप फेटाळले. तसेच कसनासूर चकमकीत ठार झालेले सर्व इसम नक्षलवादी आहेत. झालेली ही चकमक १०० टक्के खरी असून या चकमकीत निरपराध लोकांचा बळी गेला नाही, असा दावा भारतीय मानवाधिकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी गडचिरोली येथे पत्र परिषद घेऊन केला.पत्र परिषदेला मानवाधिकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्र डोमळे, प्रदेश निरिक्षक पुरूषोत्तम ठाकरे, विभागीय अध्यक्ष शशिकांत मोकासे, विलास झोडगे, मंगेश कामडी, निखील सुंदरकर, रेवती रेभनकर, दिनेश चुधरी, माधवी कुळमेथे, संजय रामटेके आदी उपस्थित होते.यावेळी पुरूषोत्तम ठाकरे व गजेंद्र डोमळे यांनी सांगितले की, मानवाधिकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश मोकाशी यांनी कसनासूर जंगलात झालेल्या नक्षल चकमकीची दखल घेऊन चौकशी समिती तयार केली. या समितीतील सहा पदाधिकाºयांनी ६ मे रोजी कसनासूर व बोरीया गावाला प्रत्यक्ष भेट देऊन या घटनेची सत्यता स्थानिकांकडून जाणून घेतली. सदर चकमक खोटी नसून सत्य आहे, असे चौकशीअंती कळले, असे डोमळे व ठाकरे यावेळी म्हणाले. भारतीय मानवाधिकार परिषद ही नक्षल समर्थक अथवा नक्षलविरोधी नाही. तसेच पोलीस समर्थक अथवा पोलीस विरोधीही नाही, असे स्पष्ट करीत कसनासूर चकमकीबाबत ज्या संस्था व व्यक्तींनी नक्षल समर्थनाची भूमिका घेतली आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच केंद्रीय व राज्य मानवाधिकार आयोगाकडून सदर नक्षल चकमकीची नि:पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी