शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

उद्योगाचे उद्दिष्ट आले, मात्र निधी अपुरा

By admin | Updated: September 4, 2015 01:15 IST

जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने बेरोजगार युवकांना उद्योग स्थापन करण्यासाठी व्याज सवलतीवर कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

२२ अर्ज प्रलंबित : १६ लाख ७० हजारांचे उद्दिष्ट; जिल्हा उघोग केंद्रातील परिस्थितीगडचिरोली : जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने बेरोजगार युवकांना उद्योग स्थापन करण्यासाठी व्याज सवलतीवर कर्ज उपलब्ध करून दिले जाते. २०१५-१६ या आर्थिक वर्षात २८ लाभार्थ्यांना जिल्हा उद्योग केंद्राचा १६ लाख ७० हजार रूपयांचे बिज भांडवल ठेवून कर्जाचे वितरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही केवळ ४ लाख ९३ हजार एवढाच निधी उपलब्ध झाला आहे. बेरोजगार युवकांचे अर्ज कार्यालयात पडून आहेत. मात्र निधीअभावी सदर अर्ज मंजूर करण्यास विलंब होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. कोणताही उद्योग स्थापन करण्यासाठी भांडवल असणे फार महत्त्वाचे आहे. बरेच होतकरू तरूण उद्योग व व्यवसाय करू इच्छितात. मात्र त्यासाठी आवश्यक असलेले भांडवल कुठून उभारावे, असा प्रश्न उपस्थित होतो. भांडवल नसल्याने अनेक तरूण उद्योग करणेही सोडून देतात. ही बाब तरूणांवर येऊ नये, यासाठी त्यांना जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात भांडवल उपलब्ध करून दिले जाते. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून सुधारीत बिज भांडवल योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना या प्रामुख्याने दोन योजना राबविल्या जातात. सुधारीत बिज भांडवल योजनेंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना १५ टक्के व अनुसूचित जातीजमाती अपंग, विमुक्त भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना २० टक्के बिज भांडवल उपलब्ध करून दिले जाते. यावर केवळ सहा टक्के व्याज आकारल्या जाते. २०१४-१५ मध्ये ३८ लाभार्थ्यांना २७ हजार ७०० रूपये एवढे बिज भांडवल व १ कोटी ७० लाख ७३ हजार एवढे बँकेचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने १४ लाभार्थ्यांना २२ लाख ७० हजार रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले. यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राचा हिस्सा ५२ हजार ४०० रूपये एवढा आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून कर्ज घेतल्यास काही कर्ज बिज भांडवल म्हणून जिल्हा उद्योग केंद्र उपलब्ध करून देते. त्यावर असलेला व्याज अत्यंत कमी आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार युवक जिल्हा उद्योग केंद्राकडे कर्ज स्थापनेबाबत अर्ज करतात. यावर्षी २२ अर्ज प्राप्त झाले आहेत. बिज भांडवल किती राहिल, याचेही उद्दिष्ट शासनाने दिले आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेला निधी अजुनपर्यंत पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिला नाही. १६ लाख ७० हजाराचे उद्दिष्ट असताना केवळ ४ लाख ९३ हजार रूपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांच्या कर्जावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. शासनाच्या लेटलतीफ धोरणामुळे बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधीपासून वंचित राहावे लागत आहे. (नगर प्रतिनिधी)कसे होणार मेक इन इंडिया?केंद्रातील भाजपा सरकारने मेक इन इंडिया व राज्य शासनाने मेक इन महाराष्ट्रचा नारा देत उद्योग स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वच बाबी उपलब्ध करून देण्याचे धोरण जाहीर केले आहे. मात्र ज्या बेरोजगार, होतकरू तरूणांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे कर्जासाठी निधीची मागणी केली. त्यांचे अर्ज मात्र निधीअभावी प्रलंबित आहेत. ही परिस्थिती केवळ गडचिरोली जिल्ह्यातीलच नसून संपूर्ण महाराष्ट्रात आहे. त्यामुळे विद्यमान सरकार केवळ घोषणा करण्यात पटाईत असून प्रत्यक्ष कृती मात्र शुन्य असल्याची टीका बेरोजगार युवकांनी केली आहे. सप्टेंबरपूर्वीच अर्जांवर निर्णय आवश्यकसर्वसाधारणपणे आॅक्टोबरनंतर बँका कर्ज वितरणास सुरुवात करतात. या कालावधीत कर्जाची मागणी वाढते. त्यामुळे बँका ऐपत असलेल्यानाच जास्तीजास्त कर्जाचे वितरण करतात. मात्र नवख्या उद्योजकाला कर्ज देण्यास तयार होत नाही. सप्टेंबरपूर्वी कर्जाची मागणी कमी राहाते. या कालावधीत कर्जाची प्रकरणे आल्यास ती तत्काळ मंजूर केली जातात. त्यामुळे जिल्हा उद्योग केंद्राकडचे अर्ज सप्टेंबर महिन्यापूर्वीच सादर होणे आवश्यक होते, अशी माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.कर्ज योजनेसाठी आवश्यक बाबीसुधारीत बीज भांडवल योजनेसाठी अर्जदार किमान सातवा वर्ग उत्तीर्ण असावा, तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, सदर लाभार्थ्याला २५ लाख रूपयांपर्यंतची कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. जिल्हा उद्योग केंद्र १५ ते २० टक्के बिज भांडवल भरेल. त्यावर केवळ सहा टक्के व्याजदर आकारेल. उर्वरित कर्ज बँकेकडून दिले जाणार असल्याने त्या कर्जावर बँक जो दर ठरवेल, तो व्याजदर द्यावा लागेल. बिज भांडवालाची परतफेड सात वर्षांमध्ये करावी लागेल. त्यामध्ये तीन वर्षांचा विलंब कालावधी समाविष्ट राहिल. विहीत मुदतीत परतफेड न केल्यास एक टक्का व्याज दंडनिय व्याज म्हणून आकारण्यात येईल.जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेसाठी वय व शिक्षणाची अट नाही. लाभार्थ्याला उद्योग व सेवा उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये दोन लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सर्वसाधारण प्रवर्गातील गटाला २० टक्के व मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना ३० टक्के भांडवल उद्योग केंद्राच्या वतीने दिले जाते. त्यावर चार टक्के व्याज दर आकारल्या जातो. सदर कर्ज सहा टक्के वार्षिक परतफेड करावे लागते.