शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

यावर्षी १ कोटी ९ लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:17 IST

येत्या पावसाळ्यात राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात १ कोटी ९ लाख रोपट्यांच्या लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. त्यासाठी वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग जोमाने तयारीला लागला आहे. दोन्ही विभाग मिळून ८२ हजार रोपे तयार आहेत.

ठळक मुद्दे८२ लाख रोपटे तयार : सागवानासह विविध फळ आणि फुलझाडांच्या रोपट्यांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या पावसाळ्यात राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात १ कोटी ९ लाख रोपट्यांच्या लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. त्यासाठी वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग जोमाने तयारीला लागला आहे. दोन्ही विभाग मिळून ८२ हजार रोपे तयार आहेत. आणखी काही रोपांची निर्मिती केली जाणार आहे.येत्या १ जुलैपासून शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत रोपट्यांची लागवड सुरू होणार आहे. १ कोटी ९ लाखांच्या उद्दीष्टापैकी सर्वाधिक ५७ लाख रोपटे लागवडीचे उद्दिष्ट वनविभागाला आहे. महाराष्टÑ वनविकास महामंडळाला २४ लाख ७४ हजार, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना १४ लाख ५९ हजार, सामाजिक वनीकरण विभागाला ६ लाख तर शासनाच्या इतर विभागांना ७ लाख २६ हजार वृक्षारोपण करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.सदर वृक्षारोपण मोहिमेसाठी ग्रामपंचायतींना मोफत रोपे दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे रोपे ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचवून देण्याचा खर्चही वनविभाग करणार आहे. यावर्षी वृक्षारोपण केल्या जाणाऱ्या भागाला तारांचे कुंपण लावले जाणार आहे. त्यामुळे खर्चात ४ ते ५ पटींनी वाढ झाली आहे. सध्या वृक्षारोपणासाठी वनविभागाकडे जवळपास ७५ लाख रोपे तर सामाजिक वनीकरण विभागाकडे ७ लाख ४० हजार रोपे तयार आहेत. त्यात सागवान, जांभूळ, सीताफळ, बांबू, फणस, गुलमोहर, पेरू, निलगिरी अशा रोपट्यांचा समावेश आहे. रोपे तयार करण्याची सुरूवात नोव्हेंबर महिन्यातच होते. त्यामुळे कोणत्या विभागाला कोणत्या झाडांची रोपे हवी त्याची मागणी तेव्हाच कळली तर तशी रोपे तयार करणे शक्य होते, पण ती माहिती आधी कळविली जात नसल्याची खंत विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.नैसर्गिकरीत्या उगवणाºया ३६ लाख झाडांचे संगोपन करणारवनविभागाला यावर्षी ५७ लाख रोपटे लागवडीचे उद्दिष्ट असले तरी या विभागाकडे तेवढी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे प्रत्यक्षात ३० लाख खड्डे करून रोपटे लावली जातील. उद्दिष्टातील उर्वरित २७ लाख झाडे नैसर्गिकरीत्या उगवणाºया रोपट्यांच्या संगोपनातून विकसित केली जाणार आहेत. वनविकास महामंडळाला २३.७४ लाख रोपटे लागवडीचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात १५ ते १६ लाख खड्डे केले जाणार असून उर्वरित झाडे नैसर्गिकरित्या उगवणाºया रोपट्यांमधील विकसित केली जाणार आहेत. त्यामुळे वृक्षारोपणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्यक्षात ७३ लाख रोपांचीच गरज भासणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग