शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

यावर्षी १ कोटी ९ लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:17 IST

येत्या पावसाळ्यात राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात १ कोटी ९ लाख रोपट्यांच्या लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. त्यासाठी वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग जोमाने तयारीला लागला आहे. दोन्ही विभाग मिळून ८२ हजार रोपे तयार आहेत.

ठळक मुद्दे८२ लाख रोपटे तयार : सागवानासह विविध फळ आणि फुलझाडांच्या रोपट्यांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या पावसाळ्यात राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात १ कोटी ९ लाख रोपट्यांच्या लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. त्यासाठी वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग जोमाने तयारीला लागला आहे. दोन्ही विभाग मिळून ८२ हजार रोपे तयार आहेत. आणखी काही रोपांची निर्मिती केली जाणार आहे.येत्या १ जुलैपासून शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत रोपट्यांची लागवड सुरू होणार आहे. १ कोटी ९ लाखांच्या उद्दीष्टापैकी सर्वाधिक ५७ लाख रोपटे लागवडीचे उद्दिष्ट वनविभागाला आहे. महाराष्टÑ वनविकास महामंडळाला २४ लाख ७४ हजार, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना १४ लाख ५९ हजार, सामाजिक वनीकरण विभागाला ६ लाख तर शासनाच्या इतर विभागांना ७ लाख २६ हजार वृक्षारोपण करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.सदर वृक्षारोपण मोहिमेसाठी ग्रामपंचायतींना मोफत रोपे दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे रोपे ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचवून देण्याचा खर्चही वनविभाग करणार आहे. यावर्षी वृक्षारोपण केल्या जाणाऱ्या भागाला तारांचे कुंपण लावले जाणार आहे. त्यामुळे खर्चात ४ ते ५ पटींनी वाढ झाली आहे. सध्या वृक्षारोपणासाठी वनविभागाकडे जवळपास ७५ लाख रोपे तर सामाजिक वनीकरण विभागाकडे ७ लाख ४० हजार रोपे तयार आहेत. त्यात सागवान, जांभूळ, सीताफळ, बांबू, फणस, गुलमोहर, पेरू, निलगिरी अशा रोपट्यांचा समावेश आहे. रोपे तयार करण्याची सुरूवात नोव्हेंबर महिन्यातच होते. त्यामुळे कोणत्या विभागाला कोणत्या झाडांची रोपे हवी त्याची मागणी तेव्हाच कळली तर तशी रोपे तयार करणे शक्य होते, पण ती माहिती आधी कळविली जात नसल्याची खंत विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.नैसर्गिकरीत्या उगवणाºया ३६ लाख झाडांचे संगोपन करणारवनविभागाला यावर्षी ५७ लाख रोपटे लागवडीचे उद्दिष्ट असले तरी या विभागाकडे तेवढी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे प्रत्यक्षात ३० लाख खड्डे करून रोपटे लावली जातील. उद्दिष्टातील उर्वरित २७ लाख झाडे नैसर्गिकरीत्या उगवणाºया रोपट्यांच्या संगोपनातून विकसित केली जाणार आहेत. वनविकास महामंडळाला २३.७४ लाख रोपटे लागवडीचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात १५ ते १६ लाख खड्डे केले जाणार असून उर्वरित झाडे नैसर्गिकरित्या उगवणाºया रोपट्यांमधील विकसित केली जाणार आहेत. त्यामुळे वृक्षारोपणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्यक्षात ७३ लाख रोपांचीच गरज भासणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग