शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

रिक्तपदांमुळे अहेरीचा कृषी उपविभाग पांगळा

By admin | Updated: July 13, 2015 01:46 IST

जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या अहेरी उपविभागातील चारही तालुका कृषी कार्यालयात अर्धेअधिक पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.

तब्बल ७० पदे रिक्त : शासन, प्रशासनाचे दुर्लक्षरोमीत तोंबर्लावार आलापल्लीजिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या अहेरी उपविभागातील चारही तालुका कृषी कार्यालयात अर्धेअधिक पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल ७० पदे रिक्त असल्याने कृषी योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत आहे. रिक्तपदांमुळे अहेरी कृषी उपविभाग पांगळा झाला असल्याचे दिसून येते. अहेरी कृषी उपविभागाअंतर्गत अहेरी, सिरोंचा, भामरागड व एटापल्ली या चार तालुका कृषी कार्यालयांचा समावेश आहे. अहेरी तालुका कृषी कार्यालयात एकूण ३३ पदे मंजूर आहेत. यापैकी १६ पदे भरण्यात आले असून १७ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये तालुका कृषी अधिकारी वर्ग २, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आदी पदांचा समावेश आहे. सिरोंचा तालुका कृषी कार्यालयात एकूण ३३ पदे मंजूर आहेत. यापैकी १९ पदे भरण्यात आले असून १३ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. भामरागड तालुका कृषी कार्यालयात एकूण ३३ पदे मंजूर आहेत. यापैकी १५ पदे भरण्यात आली असून १८ पदे रिक्त आहेत. यामध्ये वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकारी पदांचा समावेश आहे. एटापल्ली तालुका कृषी कार्यालयात एकूण ५० पदे मंजूर आहेत. यापैकी ३० पदे भरण्यात आली असून २० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी वर्ग २, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक आदी पदांचा समावेश आहे. चारही तालुक्यातील तालुका कृषी कार्यालयात वर्ग १ च्या अधिकारीपदापासून लिपिक, शिपाई यासह सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यरत निम्म्याच कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. रिक्तपदे भरण्यासंदर्भात या भागातील नागरिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा शासन व प्रशासनाकडे मागणी केली. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तालुका कृषी कार्यालयातील पदे रिक्त आहेत. अहेरी कृषी उपविभागाअंतर्गत अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड या चारही तालुक्यातील कृषी कार्यालयात वर्ग २ च्या अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांची एकूण ७० पदे रिक्त असल्याची माहिती कृषी उपविभागाच्या वतीने शासन व विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांना दिली आहे. तालुका कृषी कार्यालयात रिक्तपदे असल्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याने सदर रिक्तपदे भरण्याची कार्यवाही करवी, असे कळविण्यात आल्याची माहिती कृषी उपविभाग कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.जिल्हास्तरावरील कृषी कार्यालयामार्फत बी-बियाणे, खते पुरवठा तसेच बैलबंडी वाटप, आॅईल इंजिन, सौरपंप, विद्युत पंप लाभाच्या योजना शेतकऱ्यांमार्फत राबविल्या जातात. उपविभाग व तालुकास्तरावर तालुका कृषी कार्यालयाच्या मार्फत सदर योजना राबविल्या जातात. मात्र अहेरी उपविभागातील चारही तालुका कृषी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची अर्धेअधिक पदे रिक्त असल्याने कृषी योजनांच्या अंमलबजावणीवर याचा परिणाम होत आहे. रिक्तपदांमुळे या भागातील शेतकऱ्यांना कृषी योजनांची माहिती मिळत नाही.