शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

रिक्तपदांमुळे अहेरीचा कृषी उपविभाग पांगळा

By admin | Updated: July 13, 2015 01:46 IST

जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या अहेरी उपविभागातील चारही तालुका कृषी कार्यालयात अर्धेअधिक पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.

तब्बल ७० पदे रिक्त : शासन, प्रशासनाचे दुर्लक्षरोमीत तोंबर्लावार आलापल्लीजिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या अहेरी उपविभागातील चारही तालुका कृषी कार्यालयात अर्धेअधिक पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल ७० पदे रिक्त असल्याने कृषी योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत आहे. रिक्तपदांमुळे अहेरी कृषी उपविभाग पांगळा झाला असल्याचे दिसून येते. अहेरी कृषी उपविभागाअंतर्गत अहेरी, सिरोंचा, भामरागड व एटापल्ली या चार तालुका कृषी कार्यालयांचा समावेश आहे. अहेरी तालुका कृषी कार्यालयात एकूण ३३ पदे मंजूर आहेत. यापैकी १६ पदे भरण्यात आले असून १७ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये तालुका कृषी अधिकारी वर्ग २, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आदी पदांचा समावेश आहे. सिरोंचा तालुका कृषी कार्यालयात एकूण ३३ पदे मंजूर आहेत. यापैकी १९ पदे भरण्यात आले असून १३ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. भामरागड तालुका कृषी कार्यालयात एकूण ३३ पदे मंजूर आहेत. यापैकी १५ पदे भरण्यात आली असून १८ पदे रिक्त आहेत. यामध्ये वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकारी पदांचा समावेश आहे. एटापल्ली तालुका कृषी कार्यालयात एकूण ५० पदे मंजूर आहेत. यापैकी ३० पदे भरण्यात आली असून २० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी वर्ग २, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक आदी पदांचा समावेश आहे. चारही तालुक्यातील तालुका कृषी कार्यालयात वर्ग १ च्या अधिकारीपदापासून लिपिक, शिपाई यासह सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यरत निम्म्याच कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. रिक्तपदे भरण्यासंदर्भात या भागातील नागरिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा शासन व प्रशासनाकडे मागणी केली. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तालुका कृषी कार्यालयातील पदे रिक्त आहेत. अहेरी कृषी उपविभागाअंतर्गत अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड या चारही तालुक्यातील कृषी कार्यालयात वर्ग २ च्या अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांची एकूण ७० पदे रिक्त असल्याची माहिती कृषी उपविभागाच्या वतीने शासन व विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांना दिली आहे. तालुका कृषी कार्यालयात रिक्तपदे असल्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याने सदर रिक्तपदे भरण्याची कार्यवाही करवी, असे कळविण्यात आल्याची माहिती कृषी उपविभाग कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.जिल्हास्तरावरील कृषी कार्यालयामार्फत बी-बियाणे, खते पुरवठा तसेच बैलबंडी वाटप, आॅईल इंजिन, सौरपंप, विद्युत पंप लाभाच्या योजना शेतकऱ्यांमार्फत राबविल्या जातात. उपविभाग व तालुकास्तरावर तालुका कृषी कार्यालयाच्या मार्फत सदर योजना राबविल्या जातात. मात्र अहेरी उपविभागातील चारही तालुका कृषी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची अर्धेअधिक पदे रिक्त असल्याने कृषी योजनांच्या अंमलबजावणीवर याचा परिणाम होत आहे. रिक्तपदांमुळे या भागातील शेतकऱ्यांना कृषी योजनांची माहिती मिळत नाही.