शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्तपदांमुळे अहेरीचा कृषी उपविभाग पांगळा

By admin | Updated: July 13, 2015 01:46 IST

जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या अहेरी उपविभागातील चारही तालुका कृषी कार्यालयात अर्धेअधिक पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.

तब्बल ७० पदे रिक्त : शासन, प्रशासनाचे दुर्लक्षरोमीत तोंबर्लावार आलापल्लीजिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या अहेरी उपविभागातील चारही तालुका कृषी कार्यालयात अर्धेअधिक पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल ७० पदे रिक्त असल्याने कृषी योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत आहे. रिक्तपदांमुळे अहेरी कृषी उपविभाग पांगळा झाला असल्याचे दिसून येते. अहेरी कृषी उपविभागाअंतर्गत अहेरी, सिरोंचा, भामरागड व एटापल्ली या चार तालुका कृषी कार्यालयांचा समावेश आहे. अहेरी तालुका कृषी कार्यालयात एकूण ३३ पदे मंजूर आहेत. यापैकी १६ पदे भरण्यात आले असून १७ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये तालुका कृषी अधिकारी वर्ग २, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आदी पदांचा समावेश आहे. सिरोंचा तालुका कृषी कार्यालयात एकूण ३३ पदे मंजूर आहेत. यापैकी १९ पदे भरण्यात आले असून १३ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. भामरागड तालुका कृषी कार्यालयात एकूण ३३ पदे मंजूर आहेत. यापैकी १५ पदे भरण्यात आली असून १८ पदे रिक्त आहेत. यामध्ये वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकारी पदांचा समावेश आहे. एटापल्ली तालुका कृषी कार्यालयात एकूण ५० पदे मंजूर आहेत. यापैकी ३० पदे भरण्यात आली असून २० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी वर्ग २, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक आदी पदांचा समावेश आहे. चारही तालुक्यातील तालुका कृषी कार्यालयात वर्ग १ च्या अधिकारीपदापासून लिपिक, शिपाई यासह सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यरत निम्म्याच कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. रिक्तपदे भरण्यासंदर्भात या भागातील नागरिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा शासन व प्रशासनाकडे मागणी केली. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तालुका कृषी कार्यालयातील पदे रिक्त आहेत. अहेरी कृषी उपविभागाअंतर्गत अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड या चारही तालुक्यातील कृषी कार्यालयात वर्ग २ च्या अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांची एकूण ७० पदे रिक्त असल्याची माहिती कृषी उपविभागाच्या वतीने शासन व विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांना दिली आहे. तालुका कृषी कार्यालयात रिक्तपदे असल्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याने सदर रिक्तपदे भरण्याची कार्यवाही करवी, असे कळविण्यात आल्याची माहिती कृषी उपविभाग कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.जिल्हास्तरावरील कृषी कार्यालयामार्फत बी-बियाणे, खते पुरवठा तसेच बैलबंडी वाटप, आॅईल इंजिन, सौरपंप, विद्युत पंप लाभाच्या योजना शेतकऱ्यांमार्फत राबविल्या जातात. उपविभाग व तालुकास्तरावर तालुका कृषी कार्यालयाच्या मार्फत सदर योजना राबविल्या जातात. मात्र अहेरी उपविभागातील चारही तालुका कृषी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची अर्धेअधिक पदे रिक्त असल्याने कृषी योजनांच्या अंमलबजावणीवर याचा परिणाम होत आहे. रिक्तपदांमुळे या भागातील शेतकऱ्यांना कृषी योजनांची माहिती मिळत नाही.