शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

अहेरी होणार वायफाय राजनगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:16 IST

जिल्हा नियोजन व विकास समिती गडचिरोली च्या नाविन्यपूर्ण योजनेतून अहेरी नगरपंचायतीला वायफायची सुविधा उपलब्ध होणार असून यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती हाती आली आहे.

ठळक मुद्देतीन वर्षे मिळणार लाभ : दीड कोटी रूपयांतून मोफत इंटरनेट सेवा

विवेक बेझलवार।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : जिल्हा नियोजन व विकास समिती गडचिरोली च्या नाविन्यपूर्ण योजनेतून अहेरी नगरपंचायतीला वायफायची सुविधा उपलब्ध होणार असून यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे अहेरी राजनगरी ही वायफाय नगरी होणार असून यांचा लाभ शासकीय कार्यालये, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व सर्वसामान्य जनतेला होणार आहे. सदर योजना कार्यान्वित होणार असल्याने अहेरी राजनगरी ही वायफाय नगरी होणार आहे.अहेरी नगरी डिजिटल होण्याच्या मार्गावर असून या भागात पाहिजे त्या प्रमाणात इंटरनेट ची सेवा गतिमान नाही. तसेच ही सेवा महागडी असल्याने सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखे नाही. मात्र नगर पंचायतीच्या माध्यमातून शहरात वायफायची सुविधा निर्माण झाल्यास नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रमुख शासकीय कार्यालये, तसेच विद्यार्थी व नागरिकांना व्हिडिओ कॉन्फरन्स, टेलिमेडीसीन व जलद इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल. यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण तत्काळ करणे शक्य होईल. अहेरी शहरात तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय आदीसह विविध कार्यालये आहेत. बाहेर गावावरून येणाºया लोकांना वायफाय सुविधा निर्माण झाल्यानंतर आपली कामे गतिने आटोपता येणार आहे.नगरातील विविध कार्यालयातील समन्वय साधण्यासाठी एकाच वेळेस व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करणे शक्य होईल. जलद इंटरनेटमुळे सीएससी, महाआॅनलाइन आपले सरकार पोर्टलचे कामे सुद्धा गतीने होईल.सदर वायफाय योजना जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या प्रयत्नाने अहेरी नगर पंचायतीमध्ये मंजूर झाली आहे. अहेरी शहर डिजिटल होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. वायफाय सुविधेचा उपयोग विद्यार्थी, अधिकारी तसेच जनतेला होणार असून शासकीय कामांना वेग मिळणार आहे.- हर्षा ठाकरे , नगराध्यक्ष, नगरपंचायत, अहेरी