शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

प्रवाह वळविल्याने अहेरीला जलसंकटाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 22:18 IST

अहेरीजवळील प्राणहिता नदीवर वांगेपल्ली घाटावरून तेलंगणातील गुडेमपर्यंत पुलाचे बांधकाम केले जात आहे. कंत्राटदाराने नदीचा प्रवाह अगदी नदीच्या मधून वळविल्याने अहेरीच्या बाजुचा पाण्याचा प्रवाह कमी होऊन भविष्यात तीव्र जलसंकटाचा सामना अहेरी व या बाजुने असलेल्या गावांना...

ठळक मुद्देपाणी पातळी घटली : अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

विवेक बेझलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरीजवळील प्राणहिता नदीवर वांगेपल्ली घाटावरून तेलंगणातील गुडेमपर्यंत पुलाचे बांधकाम केले जात आहे. कंत्राटदाराने नदीचा प्रवाह अगदी नदीच्या मधून वळविल्याने अहेरीच्या बाजुचा पाण्याचा प्रवाह कमी होऊन भविष्यात तीव्र जलसंकटाचा सामना अहेरी व या बाजुने असलेल्या गावांना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.तेलंगणा सरकारच्यावतीने प्राणहिता नदीवर पुलाचे बांधकाम केले जात आहे. या पुलामुळे अहेरी व तेलंगणा राज्य थेट जोडले जाणार असल्याने नागरिकांसाठी सोयीचे होणार आहे. त्याचबरोबर व्यवसाय वृध्दिंगत होण्यासाठी फार मोठी मदत मिळणार आहे. यापूर्वी प्राणहिता नदीच्या पाण्याचा प्रवाह अहेरीच्या बाजुने आहे. त्यामुळे अहेरीसह परिसरातील अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना या नदीवर बांधण्यात आल्या आहेत. मात्र पुलाचे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराने नदीचा प्रवाह वळवून तो अगदी नदीच्या मधोमध गेला आहे. त्यामुळे नदीचे पाणी दोन्ही काठाला विभागत असल्याने अहेरीच्या बाजुने असलेला पाण्याचा प्रवाह आताच कमी झाला आहे.जानेवारी महिन्यानंतर प्राणहिता नदीची पाण्याची पातळी कमी होते. परिणामीया कालावधीत अहेरीची पाणी पुरवठा योजना कोरड्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजपर्यंत अहेरी शहराला कधीच पाण्याचा तुटवडा निर्माण झाला नाही. मात्र प्रवाह वळविल्याने जलसंकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कायमचा प्रवाह वळण्याची शक्यतासद्य:स्थितीत मध्यभागातून पाण्याचा पुरवठा होत आहे. या खोदकामामुळे पावसाळ्याच्या कालावधीत पाण्याचा प्रवाह तेलंगणाच्या बाजुने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकदा प्रवाह बदलला तर तो नंतर बदलविणे कठीण होते. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन संबंधित प्रवाह मूळच्या दिशेने राहिल, यासाठी बदललेला प्रवाह पूर्वीप्रमाणे करून देण्यासाठी कंत्राटदाराला सक्तीचे करावे, अशी मागणी होत आहे.