शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाह वळविल्याने अहेरीला जलसंकटाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 22:18 IST

अहेरीजवळील प्राणहिता नदीवर वांगेपल्ली घाटावरून तेलंगणातील गुडेमपर्यंत पुलाचे बांधकाम केले जात आहे. कंत्राटदाराने नदीचा प्रवाह अगदी नदीच्या मधून वळविल्याने अहेरीच्या बाजुचा पाण्याचा प्रवाह कमी होऊन भविष्यात तीव्र जलसंकटाचा सामना अहेरी व या बाजुने असलेल्या गावांना...

ठळक मुद्देपाणी पातळी घटली : अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

विवेक बेझलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरीजवळील प्राणहिता नदीवर वांगेपल्ली घाटावरून तेलंगणातील गुडेमपर्यंत पुलाचे बांधकाम केले जात आहे. कंत्राटदाराने नदीचा प्रवाह अगदी नदीच्या मधून वळविल्याने अहेरीच्या बाजुचा पाण्याचा प्रवाह कमी होऊन भविष्यात तीव्र जलसंकटाचा सामना अहेरी व या बाजुने असलेल्या गावांना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.तेलंगणा सरकारच्यावतीने प्राणहिता नदीवर पुलाचे बांधकाम केले जात आहे. या पुलामुळे अहेरी व तेलंगणा राज्य थेट जोडले जाणार असल्याने नागरिकांसाठी सोयीचे होणार आहे. त्याचबरोबर व्यवसाय वृध्दिंगत होण्यासाठी फार मोठी मदत मिळणार आहे. यापूर्वी प्राणहिता नदीच्या पाण्याचा प्रवाह अहेरीच्या बाजुने आहे. त्यामुळे अहेरीसह परिसरातील अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना या नदीवर बांधण्यात आल्या आहेत. मात्र पुलाचे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराने नदीचा प्रवाह वळवून तो अगदी नदीच्या मधोमध गेला आहे. त्यामुळे नदीचे पाणी दोन्ही काठाला विभागत असल्याने अहेरीच्या बाजुने असलेला पाण्याचा प्रवाह आताच कमी झाला आहे.जानेवारी महिन्यानंतर प्राणहिता नदीची पाण्याची पातळी कमी होते. परिणामीया कालावधीत अहेरीची पाणी पुरवठा योजना कोरड्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजपर्यंत अहेरी शहराला कधीच पाण्याचा तुटवडा निर्माण झाला नाही. मात्र प्रवाह वळविल्याने जलसंकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कायमचा प्रवाह वळण्याची शक्यतासद्य:स्थितीत मध्यभागातून पाण्याचा पुरवठा होत आहे. या खोदकामामुळे पावसाळ्याच्या कालावधीत पाण्याचा प्रवाह तेलंगणाच्या बाजुने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकदा प्रवाह बदलला तर तो नंतर बदलविणे कठीण होते. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन संबंधित प्रवाह मूळच्या दिशेने राहिल, यासाठी बदललेला प्रवाह पूर्वीप्रमाणे करून देण्यासाठी कंत्राटदाराला सक्तीचे करावे, अशी मागणी होत आहे.