शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

प्रवाह वळविल्याने अहेरीला जलसंकटाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 22:18 IST

अहेरीजवळील प्राणहिता नदीवर वांगेपल्ली घाटावरून तेलंगणातील गुडेमपर्यंत पुलाचे बांधकाम केले जात आहे. कंत्राटदाराने नदीचा प्रवाह अगदी नदीच्या मधून वळविल्याने अहेरीच्या बाजुचा पाण्याचा प्रवाह कमी होऊन भविष्यात तीव्र जलसंकटाचा सामना अहेरी व या बाजुने असलेल्या गावांना...

ठळक मुद्देपाणी पातळी घटली : अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

विवेक बेझलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरीजवळील प्राणहिता नदीवर वांगेपल्ली घाटावरून तेलंगणातील गुडेमपर्यंत पुलाचे बांधकाम केले जात आहे. कंत्राटदाराने नदीचा प्रवाह अगदी नदीच्या मधून वळविल्याने अहेरीच्या बाजुचा पाण्याचा प्रवाह कमी होऊन भविष्यात तीव्र जलसंकटाचा सामना अहेरी व या बाजुने असलेल्या गावांना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.तेलंगणा सरकारच्यावतीने प्राणहिता नदीवर पुलाचे बांधकाम केले जात आहे. या पुलामुळे अहेरी व तेलंगणा राज्य थेट जोडले जाणार असल्याने नागरिकांसाठी सोयीचे होणार आहे. त्याचबरोबर व्यवसाय वृध्दिंगत होण्यासाठी फार मोठी मदत मिळणार आहे. यापूर्वी प्राणहिता नदीच्या पाण्याचा प्रवाह अहेरीच्या बाजुने आहे. त्यामुळे अहेरीसह परिसरातील अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना या नदीवर बांधण्यात आल्या आहेत. मात्र पुलाचे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराने नदीचा प्रवाह वळवून तो अगदी नदीच्या मधोमध गेला आहे. त्यामुळे नदीचे पाणी दोन्ही काठाला विभागत असल्याने अहेरीच्या बाजुने असलेला पाण्याचा प्रवाह आताच कमी झाला आहे.जानेवारी महिन्यानंतर प्राणहिता नदीची पाण्याची पातळी कमी होते. परिणामीया कालावधीत अहेरीची पाणी पुरवठा योजना कोरड्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजपर्यंत अहेरी शहराला कधीच पाण्याचा तुटवडा निर्माण झाला नाही. मात्र प्रवाह वळविल्याने जलसंकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कायमचा प्रवाह वळण्याची शक्यतासद्य:स्थितीत मध्यभागातून पाण्याचा पुरवठा होत आहे. या खोदकामामुळे पावसाळ्याच्या कालावधीत पाण्याचा प्रवाह तेलंगणाच्या बाजुने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकदा प्रवाह बदलला तर तो नंतर बदलविणे कठीण होते. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन संबंधित प्रवाह मूळच्या दिशेने राहिल, यासाठी बदललेला प्रवाह पूर्वीप्रमाणे करून देण्यासाठी कंत्राटदाराला सक्तीचे करावे, अशी मागणी होत आहे.