शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

अहेरी न.पं.ला मिळणार बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:19 IST

केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छता मोहीमेंतर्गत प्रत्येक नगरपंचायत हागणदारी मुक्त करण्यासाठी शासनाने मोहीम राबवली होती. या अनुषंगाने करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय तपासणीत अहेरी नगरपंचायत पात्र झाली असून ती जिल्ह्यातील पहिलीच नगरपंचायत ठरली.

ठळक मुद्देकेंद्र स्तरावरील स्वच्छ संरक्षणात अव्वल : जिल्ह्यातील एकमेव नगर पंचायत ठरली पात्र

विवेक बेझलवार।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छता मोहीमेंतर्गत प्रत्येक नगरपंचायत हागणदारी मुक्त करण्यासाठी शासनाने मोहीम राबवली होती. या अनुषंगाने करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय तपासणीत अहेरी नगरपंचायत पात्र झाली असून ती जिल्ह्यातील पहिलीच नगरपंचायत ठरली. स्वच्छ सर्वेक्षणातून अहेरी नगर पंचायतीला आता जवळपास एक कोटी रूपयांचे बक्षीस केंद्र शासनाकडून मिळणार आहे.केंद्र शासनाने शहरी भागात वैयक्तिक शौचालय उभारणी व गावे हागणदारी मुक्तीची चळवळ गेल्या दोन वर्षांपासून सुरू केली आहे. त्या अनुषंगाने कामाची पाहणी अनुक्रमे जिल्हा, राज्य व केंद्र या तिनही स्तरावरून करण्यात आली. यात अहेरी नगरपंचायत तसेच इतर नगरपंचायत सुद्धा जिल्हा व राज्य स्तरावर पात्र झाल्या. मात्र केंद्रस्तरीय पथकाने केलेल्या निरीक्षणात अहेरी ही एकमेव नगरपंचायत पात्र झाली आहे. यापूर्वी केंद्रीय पथकाने आरमोरी नगर पंचायत व वडसा नगर पालिकेचे निरीक्षण केले आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या क्वालिटी कॉन्सिल आॅफ इंडियाची (क्यूसीआय) ची नेमणूक करण्यात आली. केंद्र स्तरावरून आलेल्या क्यूसीआयच्या चमूने डिसेंबर २९ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान चार दिवस अहेरी शहराचे सर्वेक्षण केले. वैैयक्तिक शौचालय व हागणदारी मुक्तीच्या मुद्यावर पाहणी करून प्रत्यक्षात माहिती घेतली.क्यूसीआयच्या चमूने प्रत्यक्ष दौरा करून शहरात तपासणी करीत अहेरी येथील लोकांचे, विद्यार्थ्यांचे, अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे मनोगत जाणून घेतले. त्यामध्ये अहेरी येथील जिल्हा परिषद शाळा, श्री शंकरराव बेझलवार महाविद्यालय तसेच विविध प्रभागातील शौचालय ठिकाणी जाऊन पाहणी केली. व्यापारी क्षेत्रात प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्वछता व आरोग्य विषयक चर्चा केली. तेथील शौचालय व इतर जागांची प्रत्यक्षात तपासणी करून व माहिती जाणून घेतली.अहेरी शहरासाठी ही गोड बातमी असून केंद्रीय पथकाद्वारे अहेरी नगरपंचायतीला केंद्रीय स्तरावर ओडीएफ दर्जा मिळाला. जिल्यातील पहिली नगर पंचायत आहे. न. पं. ला कर्मचाऱ्यांची ६४ पदे मंजूर असताना ६ नियमित व ३ रोजंदारी पद्धतीने कार्य करतात. अशा स्थितीत आमच्या कर्मचऱ्यांनी गुड मॉर्निंग पथक व इतर कामे चांगल्या पद्धतीने केल्याने हा मान आम्हाला मिळाला तसेच सर्व नगसेवकांच्या सहकार्याने हे शक्य झाले.- डॉ. कुलभूषण रामटेके, मुख्यधिकारी नगरपंचायत, अहेरी