शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अहेरीत कोया पुनेम पेरसापेन उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:23 IST

आदिवासी समाज संघटित असला तर या समाजाचा विकास कोणीच रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. अहेरी येथील धरमपूर वॉर्डात कोया पुनेम जय पेरसापेन, सल्ला गांगरा शक्ती व आदिवासी समाजाच्या सप्तरंगी झेंडाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देधर्मरावबाबांचे प्रतिपादन : संघटित आदिवासींचा विकास कुणीही रोखू शकणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आदिवासी समाज संघटित असला तर या समाजाचा विकास कोणीच रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. अहेरी येथील धरमपूर वॉर्डात कोया पुनेम जय पेरसापेन, सल्ला गांगरा शक्ती व आदिवासी समाजाच्या सप्तरंगी झेंडाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच गंगाराम कोडापे होते. याप्रसंगी जि. प. च्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, सांबय्या करपेत, जि. प. सदस्य ऋषी पोरतेट, सरपंच बालाजी गावडे, नगरसेवक शैलेश पटवर्धन, एम. बी. कुसनाके, मारोती आत्राम, लक्ष्मीबाई कुळमेथे, पुनेम प्रचारक शंकर आत्राम, प्रदीप सडमेक, बुधाजी सिडाम उपस्थित होते.पुढे बोलतांना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, आदिवासी समाज हा मूळनिवासी असून जल, जंगल, जमीनचे संवर्धन करूनही समाजाची आज दयनीय अवस्था आहे. पुढच्या पिढीकरिता ही धोक्याची घंटा आहे. अहेरी येथे क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांचा पुतळा उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. समाजासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिवीरांकडून प्रेरणा घेऊन त्या दिशेने प्रत्येकांनी वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.सभापती भाग्यश्री आत्राम यांनी आदिवासी समाजाचा एक फार मोठा इतिहास असून पूर्वजांची प्रेरणा घेऊन त्या दिशेने वाटचाल करावे व युवक आणि युवतींनी उच्च शिक्षण घेऊन स्वत:सह समाजाची प्रगती साधावी, असे आवाहन केले.कार्यक्रमाच्या सुरूवातीला आदिवासी परंपरा व संस्कृतीनुसार ढोल ताशांच्या निनादात रॅली काढण्यात आली. त्यानंतर कोया पुनेम पेरसापेन, सल्ला गांगरा शक्तीचे माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वज फडकविण्यात आला. तसेच सामूहिक पूजन करण्यात आले.कोया पुनेम पेरसापेन, सल्ला गांगरा शक्ती व आदिवासी समाजाच्या सप्तरंगी झेंड्यासाठी जागा दान केल्याबद्दल धरमपूर वॉर्डातील राजू कुसराम यांचा समाजाच्या वतीने धर्मरावबाबा आत्राम आणि भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक सत्यनारायण कोडापे, संचालन महेश मडावी तर आभार रुपेश गावडे यांनी मानले. यावेळी आदिवासीबांधव उपस्थित होते.