शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अहेरीला मिळाली सुसज्ज बाजारवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:15 IST

शहरवासीयांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे अहेरी शहरात सर्व सोयीयुक्त बाजारवाडी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याची तातडीने दखल घेत पालकमंत्री आत्राम यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत नगरोत्थान विकास योजनेतून अहेरी नगर पंचायतला १ कोटी ५० लक्ष रुपये सुसज्ज बाजारवाडीच्या बांधकामासाठी मंजूर केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण : दीड कोटी रूपयांचा निधी विकासकामांवर खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : शहरवासीयांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे अहेरी शहरात सर्व सोयीयुक्त बाजारवाडी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याची तातडीने दखल घेत पालकमंत्री आत्राम यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत नगरोत्थान विकास योजनेतून अहेरी नगर पंचायतला १ कोटी ५० लक्ष रुपये सुसज्ज बाजारवाडीच्या बांधकामासाठी मंजूर केले. या निधीतून अहेरी शहरातील बाजारवाडी मधील विविध विकासकामे पूर्ण झाले. त्या विकासकामांचे नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.१.५ कोटी रुपयांच्या निधीतून अहेरी शहरातील बाजारवाडीचे रूप पालटले असून बाजारवाडीत भाजीपाला व इतर विक्रेत्यांसाठी सुसज्ज ओटे बांधण्यात आले आहेत. तसेच बाजारवाडीत अंतर्गत सिमेंट रस्ते व नालीचेही बांधकाम करण्यात आले आहे. सर्व विक्रेत्यांना लाईटची व इतर सर्व प्रकारच्या सोयी याठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे विविध प्रकारच्या वस्तू विक्रेत्यांना व लोकांसाठी सोय होणार आहे.लोकार्पण कार्यक्रमाला जि. प. समाजकल्याण सभापती माधुरी उरेते, नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, उपाध्यक्ष कमल पडगेलवार, उपविभागीय अभियंता (बांधकाम) मेश्राम, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, भाजपा अहेरी शहराध्यक्ष मुकेश नामेवार, नगर पंचायत सभापती नारायण सिडाम, सुवर्णा येमुलवार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, पप्पू मद्दीवार, शंकर मगडीवार, सरफराज आलम, सचिन पेद्दापल्लीवार, गुड्डू ठाकरे, दिलीप पडगेलवार, संतोष येमुलवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.११ वॉर्डांमध्ये लागले हायमास्टअहेरी शहरातील अनेक प्रभागात अंधाराचे साम्राज्य होते. त्यामुळे त्याठिकाणी हायमास्ट लाईट लावण्याची लोकांची मागणी होती. याची दखल घेत अहेरी नगर पंचायततर्फे महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या नवीन नगरपंचायत सहाय्य योजनेतून ३० लक्ष रुपये खर्च करून शहरातील विविध प्रभागात ११ हायमास्ट लाईट लावण्यात आले होते. त्याचेही लोकार्पण पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यामुळे शहरातील अंधाराचे साम्राज्य संपुष्टात येणार असल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.