शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

अहेरी जिल्ह्याची मागणी रखडली

By admin | Updated: August 14, 2015 01:41 IST

गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात यावा, ही मागणी मागील अनेक वर्षांपासूनची आहे.

पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष : संघर्ष समितीचे तरुण कार्यकर्ते आक्रमकगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात यावा, ही मागणी मागील अनेक वर्षांपासूनची आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता विराजमान झाल्यानंतर आता या मागणीने पुन्हा उचल खालली असून अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने अहेरी जिल्हा निर्माण झालाच पाहिजे, या मागणीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. अनेक तरूण कार्यकर्ते या आंदोलनात आता सक्रीय झाले आहे.२६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. त्यावेळी अहेरी उपविभागातील अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा हे पाच तालुकेही गडचिरोली जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले. या पाच तालुक्याचे जिल्हा मुख्यालयापासूनचे अंतर हे २५० ते १५० किमीच्या परिघातील आहे. अनेक दुर्गम भागातून नागरिकांना जिल्हा मुख्यालयात कामासाठी यायचे झाल्यास दोन दिवस मोडतात. त्यांना आर्थिक व मानसिक भुर्दंडही पडतो. या पाच तालुक्यांच्या विकासाकडे गेल्या ३३ वर्षात कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. अहेरी विधानसभा क्षेत्राला राज्यमंत्री पद अनेकदा मिळूनही याभागात रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सोयीसुविधाही राज्यकर्त्यांना पोहोचविता आल्या नाही. अहेरी या राजनगरीच्या मुख्यालयात राजवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल भरून आहे. विकासापासून वंचित असलेल्या या भागाला विकासाकडे नेण्यासाठी अहेरी जिल्हा निर्मिती हाच एकमेव पर्याय आहे, असे या भागातील जनतेचे मत आहे. जनमताचा हा रेटा सातत्याने वाढत असून यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी अहेरी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय निर्माण करून नागरिकांचा रोष थोपविण्याचा प्रयत्न केला. तसेच काही नवे महसूली उपविभाग निर्माण केले. मात्र तरीही विकासाला गती मिळाली नाही. त्यामुळे आता अहेरी जिल्हा निर्माण झालाच पाहिजे, ही आग्रही मागणी घेऊन अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे यांनी युवकांची फळी निर्माण करून संघर्षाची भूमिका घेतली आहे. यापुढे तीव्र आंदोलन या प्रश्नावर उभे राहण्याची चिन्ह दिसत आहे. नाग विदर्भ आंदोलन समिती मात्र भाजपसोबत असल्याने या प्रश्नावर मौन बाळगून आहे. (जिल्हा प्रतिनिधी)