शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

अहेरी जिल्ह्याची मागणी रखडली

By admin | Updated: August 14, 2015 01:41 IST

गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात यावा, ही मागणी मागील अनेक वर्षांपासूनची आहे.

पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष : संघर्ष समितीचे तरुण कार्यकर्ते आक्रमकगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात यावा, ही मागणी मागील अनेक वर्षांपासूनची आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता विराजमान झाल्यानंतर आता या मागणीने पुन्हा उचल खालली असून अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने अहेरी जिल्हा निर्माण झालाच पाहिजे, या मागणीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. अनेक तरूण कार्यकर्ते या आंदोलनात आता सक्रीय झाले आहे.२६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. त्यावेळी अहेरी उपविभागातील अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा हे पाच तालुकेही गडचिरोली जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले. या पाच तालुक्याचे जिल्हा मुख्यालयापासूनचे अंतर हे २५० ते १५० किमीच्या परिघातील आहे. अनेक दुर्गम भागातून नागरिकांना जिल्हा मुख्यालयात कामासाठी यायचे झाल्यास दोन दिवस मोडतात. त्यांना आर्थिक व मानसिक भुर्दंडही पडतो. या पाच तालुक्यांच्या विकासाकडे गेल्या ३३ वर्षात कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. अहेरी विधानसभा क्षेत्राला राज्यमंत्री पद अनेकदा मिळूनही याभागात रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सोयीसुविधाही राज्यकर्त्यांना पोहोचविता आल्या नाही. अहेरी या राजनगरीच्या मुख्यालयात राजवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल भरून आहे. विकासापासून वंचित असलेल्या या भागाला विकासाकडे नेण्यासाठी अहेरी जिल्हा निर्मिती हाच एकमेव पर्याय आहे, असे या भागातील जनतेचे मत आहे. जनमताचा हा रेटा सातत्याने वाढत असून यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी अहेरी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय निर्माण करून नागरिकांचा रोष थोपविण्याचा प्रयत्न केला. तसेच काही नवे महसूली उपविभाग निर्माण केले. मात्र तरीही विकासाला गती मिळाली नाही. त्यामुळे आता अहेरी जिल्हा निर्माण झालाच पाहिजे, ही आग्रही मागणी घेऊन अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे यांनी युवकांची फळी निर्माण करून संघर्षाची भूमिका घेतली आहे. यापुढे तीव्र आंदोलन या प्रश्नावर उभे राहण्याची चिन्ह दिसत आहे. नाग विदर्भ आंदोलन समिती मात्र भाजपसोबत असल्याने या प्रश्नावर मौन बाळगून आहे. (जिल्हा प्रतिनिधी)