शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

‘श्री’ पद्धतीने धान लागवड करण्यावर कृषी विभागाचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2016 00:52 IST

‘श्री’ पद्धतीने धानाची लागवड केल्यास उत्पादनात ५५ टक्के वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी धानाची श्री पद्धतीनेच लागवड करावी,

पाच हेक्टरचे उद्दिष्ट : उत्पादनात होते ५५ टक्के वाढगडचिरोली : ‘श्री’ पद्धतीने धानाची लागवड केल्यास उत्पादनात ५५ टक्के वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी धानाची श्री पद्धतीनेच लागवड करावी, यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. २०१६ च्या खरीप हंगामात किमान पाच हजार हेक्टरवर ‘श्री’ पद्धतीने लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हाभरात खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. त्यापैकी एकट्या धानपिकाचा वाटा सुमारे दीड लाख हेक्टर आहे. शेतकरीवर्ग उत्पादन वाढीसाठी संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करीत असला तरी धान लागवडीची पद्धत मात्र पारंपरिक आहे. पारंपरिक पद्धतीने धानाची लागवड करताना अगदी जवळ लागवड केली जाते व त्यामध्ये रोपांची संख्या अधिक राहते. दाटीने धान लागवड झाल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न होत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी धानपिकाची लागवड ‘श्री’ पद्धतीने करावी, यासाठी राज्याच्या कृषी विभागाने प्रत्येक जिल्ह्याला निर्देश दिले आहेत. २०१५-१६ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत धान पिकासाठी प्रकल्प आधारित कार्यक्रम राबविण्यात आला होता. याअंतर्गत प्रत्येक कृषी सेवकाला निर्देश देऊन श्री पद्धतीने धानाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. त्यासाठी प्रत्येक मोठ्या गावी शिबिर घेऊन ‘श्री’ पद्धतीने धानाच्या लागवडीविषयी प्रसार, प्रचार करण्यात आला. परिणामी मागील वर्षी तीन हजार पेक्षा अधिक हेक्टरवर श्री पद्धतीने धानपिकाची लागवड करण्यात आली. यावर्षी पाच हजार पेक्षा अधिक हेक्टरवर श्री पद्धतीने धानपिकाची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषी विभाग कामाला लागला आहे. यांत्रिकीकरणामध्ये वाढ होत असल्याने श्री पद्धतीने धान लागवडीस प्रोत्साहन मिळत आहे. यावर्षीच्या हंगामात उद्दिष्ट गाठणे शक्य होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (नगर प्रतिनिधी)सिंचनाची सोय नसल्याने वाढली अडचणश्री पद्धतीने धानाची लागवड करताना प्रत्येक रोपटा एक ते दीड फूट अंतरावर लावला जातो. त्याचबरोबर या पद्धतीने रोवणी करताना धानाची रोवणी अगदी वेळेवर होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात फार कमी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. पाऊस लांबल्यास रोवणी लांबते. उशिरा रोवणी झाल्यास व श्री पद्धतीने लागवड झाल्यास पारंपरिक पद्धतीपेक्षाही उत्पादनात घट होण्याची शक्यता राहते. त्यामुळे श्री पद्धतीने उत्पादनात वाढ होते, हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असले तरी या पद्धतीने रोवणी करण्यास धजावत नाही.