शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
4
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
5
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
6
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
7
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
8
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
9
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
10
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
11
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
12
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
13
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
14
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
15
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
16
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
17
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
18
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
19
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
20
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  

‘श्री’ पद्धतीने धान लागवड करण्यावर कृषी विभागाचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2016 00:52 IST

‘श्री’ पद्धतीने धानाची लागवड केल्यास उत्पादनात ५५ टक्के वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी धानाची श्री पद्धतीनेच लागवड करावी,

पाच हेक्टरचे उद्दिष्ट : उत्पादनात होते ५५ टक्के वाढगडचिरोली : ‘श्री’ पद्धतीने धानाची लागवड केल्यास उत्पादनात ५५ टक्के वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी धानाची श्री पद्धतीनेच लागवड करावी, यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. २०१६ च्या खरीप हंगामात किमान पाच हजार हेक्टरवर ‘श्री’ पद्धतीने लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हाभरात खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. त्यापैकी एकट्या धानपिकाचा वाटा सुमारे दीड लाख हेक्टर आहे. शेतकरीवर्ग उत्पादन वाढीसाठी संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करीत असला तरी धान लागवडीची पद्धत मात्र पारंपरिक आहे. पारंपरिक पद्धतीने धानाची लागवड करताना अगदी जवळ लागवड केली जाते व त्यामध्ये रोपांची संख्या अधिक राहते. दाटीने धान लागवड झाल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न होत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी धानपिकाची लागवड ‘श्री’ पद्धतीने करावी, यासाठी राज्याच्या कृषी विभागाने प्रत्येक जिल्ह्याला निर्देश दिले आहेत. २०१५-१६ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत धान पिकासाठी प्रकल्प आधारित कार्यक्रम राबविण्यात आला होता. याअंतर्गत प्रत्येक कृषी सेवकाला निर्देश देऊन श्री पद्धतीने धानाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. त्यासाठी प्रत्येक मोठ्या गावी शिबिर घेऊन ‘श्री’ पद्धतीने धानाच्या लागवडीविषयी प्रसार, प्रचार करण्यात आला. परिणामी मागील वर्षी तीन हजार पेक्षा अधिक हेक्टरवर श्री पद्धतीने धानपिकाची लागवड करण्यात आली. यावर्षी पाच हजार पेक्षा अधिक हेक्टरवर श्री पद्धतीने धानपिकाची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषी विभाग कामाला लागला आहे. यांत्रिकीकरणामध्ये वाढ होत असल्याने श्री पद्धतीने धान लागवडीस प्रोत्साहन मिळत आहे. यावर्षीच्या हंगामात उद्दिष्ट गाठणे शक्य होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (नगर प्रतिनिधी)सिंचनाची सोय नसल्याने वाढली अडचणश्री पद्धतीने धानाची लागवड करताना प्रत्येक रोपटा एक ते दीड फूट अंतरावर लावला जातो. त्याचबरोबर या पद्धतीने रोवणी करताना धानाची रोवणी अगदी वेळेवर होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात फार कमी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. पाऊस लांबल्यास रोवणी लांबते. उशिरा रोवणी झाल्यास व श्री पद्धतीने लागवड झाल्यास पारंपरिक पद्धतीपेक्षाही उत्पादनात घट होण्याची शक्यता राहते. त्यामुळे श्री पद्धतीने उत्पादनात वाढ होते, हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असले तरी या पद्धतीने रोवणी करण्यास धजावत नाही.