शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कृषी केंद्राचे मालक बनले कृषी तज्ज्ञ

By admin | Updated: October 27, 2014 22:35 IST

मागील तीन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे धानपिकाला अनेक रोगांचां प्रादुर्भाव होत आहे. कृषी विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना औषध फवारणीबाबत

वैरागड : मागील तीन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे धानपिकाला अनेक रोगांचां प्रादुर्भाव होत आहे. कृषी विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना औषध फवारणीबाबत मार्गदर्शन करीत नसले तरी अनेक कृषी केंद्रावरील मालकच कृषितज्ज्ञ बनून शेतकऱ्यांना औषध फवारणीचा सल्ला देत आहेत. एका पंपाला दोन झाकण औषध वापरा, असे अनेक कृषी केंद्रधारकांकडून शेतकऱ्यांना सांगितले जात आहे.जिल्हा कृषी विभागाकडून विविध योजनांची मोठी प्रसिद्धी झाली. पण रासायनिक खत अनेकांच्या बांधावर पोहोचला नाही. त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या योजनाही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या नाही. रोवणीचे यंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचे वर्तमानपत्रातून दाखविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ झाला नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील धानपिकावर विविध रोगांचे सावट आहे. मात्र कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सल्ला मिळत नाही. मात्र कृषी केंद्रधारकच कृषितज्ज्ञ बनून शेतकऱ्यांना सल्ला देत आहेत. किडीचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी एका पंपाला दोन झाकण औषधी फवारा म्हणजे तुमच्या धानपिकावरील रोग लवकर नष्ट होईल, असा सल्ला ग्रामीण शेतकऱ्यांना दिला जात आहे. शेतकऱ्यांचाही कृषी केंद्रधारकांच्या सल्ल्याला प्रतिसाद आहे. (वार्ताहर)