शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

कृषीपंप वीज जोडणी थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:31 IST

ज्या शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केला आहे, अशा शेतकऱ्यांना तत्काळ वीज जोडणी मिळावी यासाठी महावितरणतर्फे उघडलेली विशेष मोहीम थंडबस्त्यात आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या चकरा वाढल्या : वर्षभरापासूनचे अर्ज कार्यालयात धूळखात

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : ज्या शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केला आहे, अशा शेतकऱ्यांना तत्काळ वीज जोडणी मिळावी यासाठी महावितरणतर्फे उघडलेली विशेष मोहीम थंडबस्त्यात आहे.शासनाकडून अनुदानावर विहीर उपलब्ध होत आहेत. विहिरीतील पाण्याचा उपसा करून पीक घेण्यासाठी शेतकरी इच्छुक आहेत. ज्या शेतकºयांना विहीर प्राप्त झाली आहे. त्या शेतकऱ्यांनी वीज जोडणी मिळावी, यासाठी अर्ज केला आहे. वीज जोडणीसाठी आवश्यक असलेले डिमांड सुध्दा भरले आहेत. वीज जोडणी देण्यासाठी महावितरणने वर्षभरापूर्वी मोहीम उघडली होती.मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही महावितरणने वीज जोडणी उपलब्ध करून दिली नाही. काही शेतकऱ्यांनी विहिरीचे खोदकाम झाल्यानंतर पंप खरेदी केले. मात्र वीज जोडणी झाली नसल्याने खरेदी केलेल्या पंपाचे पैसे शेतकऱ्यांच्या उरावर बसले आहेत. एकीकडे शासन सिंचनाची सुविधा वाढावी, यासाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे वीज विभागाच्या दुर्लक्षामुळे वीज जोडणी होण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. वैरागड परिसरात शेकडो शेतकऱ्यांनी विहिरी खोदल्या आहेत. या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केले आहेत. सदर अर्ज कार्यालयात पडून आहेत. वीज जोडणीसाठी वीज कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.मागेल त्याला वीज जोडणी अभियान फेलवीज वितरण कंपनीकडे पुरेशा प्रमाणात मीटर नसल्याने शेतकऱ्यांचे अर्ज वर्षनोवर्ष पडून राहत होते. एक महिन्यापूर्वी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनीकडे पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध आहेत. त्यामुळे मागणी होताच जुने मीटर बदलवून दिले जाईल. त्याचबरोबर नवीन मीटर लावून दिले जाईल, असे कळविले होते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात परिस्थिती भिन्न असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी व घरगुती ग्राहकांनी अर्ज करून सुध्दा वीज जोडणी दिली जात नसल्याचे दिसून येत आहे.वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकरी व घरगुती ग्राहकांची निकाली काढण्याची मागणी होत आहे.