शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जुनी पेन्शन मिळविण्यासाठी आंदोलन तीव्र करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:34 IST

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा राज्य संवाद मेळावा ८ जून रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे पार पडला. जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांचा हक्क असून हा हक्क मिळविण्यासाठी आंदोलन तीव्र केले जाईल, असा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.

ठळक मुद्देजुनी पेन्शन हक्क संघटनेचा संवाद मेळावा : आगामी रणनीती ठरविण्याबाबत चर्चा; कर्मचाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा राज्य संवाद मेळावा ८ जून रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे पार पडला. जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांचा हक्क असून हा हक्क मिळविण्यासाठी आंदोलन तीव्र केले जाईल, असा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.जुनी पेन्शन मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या माध्यमातून लढा दिला जात आहे. या लढ्याला काही प्रमाणात यश आले आहे. संघटनेच्या रेट्यानंतर काही लाभ कर्मचाऱ्यांच्या पदरात पडले आहेत. मात्र जुनी पेन्शन मिळविणे हा संघटनेचा अंतिम ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी संघटनेमार्फत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला. आजपर्यंत संघटनेची वाटचाल येणाºया काळात आंदोलने करण्यासाठी आखावयाची रणनीती याबाबत विचार मंथन करण्यात आले.या मेळाव्याला राज्यभरातून हजारो कर्मचारी उपस्थित होते. येत्या एक महिन्यात जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य अधिवेशन घेतले जाणार आहे. या अधिवेशनात राज्यभरातून ५० हजार पेक्षा अधिक कर्मचारी उपस्थित राहतील, यासाठी नियोजन करण्याचे ठरविण्यात आले. मुख्यमंत्री, वित्तमंत्री उपस्थित राहतील, यासाठी संघटना प्रयत्न करेल. सत्ताधाऱ्यांना मंचावर बोलावून मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना फॅमिली पेन्शन मिळावी, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पाडले जाईल. राज्य अधिवेशनात सत्ताधारी येण्यास तयार न झाल्यास विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना बोलविले जाईल, अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी दिली. मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यातून संघटनेचे राज्य समन्वयक दशरथ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गुरूदेव नवघडे, अंकुश मैलारे, जिल्हा सरचिटणीस बापू मुनघाटे, धानोरा तालुकाध्यक्ष दीपक सुरपाम, धानोराचे संघटक अमित टेंभूर्णे, संघटक प्रवीण धाडसे आदी उपस्थित होते.मृतक कर्मचाºयाच्या कुटुंबाचे पेंशनअभावी हालअल्पावधीतच मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाचे वेतन दुसऱ्याच दिवशी बंद केले जाते. परिणामी सदर कुटुंब उघड्यावर पडते. संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून जेवढी रक्कम कपात झाली, तेवढी रक्कम सुद्धा मिळण्यास बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. किमान अल्पावधीत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला पेंशन लागू करावी, यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. सदर निर्णय लागू करण्यासाठी संघटना सरकारसोबत वाटाघाटी करेल, असेही ठरविण्यात आले. पेन्शन राज्य अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. त्यामुळे या मेळाव्याला बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.