शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

पुन्हा सुरू झाला प्लास्टिकचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 01:02 IST

प्लास्टिक हा दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. मात्र प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही. त्यामुळे शहरांमध्ये प्लास्टिकचे मोठमोठे ढीग बघायला मिळतात. तसेच प्लास्टिक जाळल्यास मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे सर्व तोटे लक्षात घेता राज्य शासनाने ५० मायक्रोेनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे.

ठळक मुद्देमोहीम थंडावल्याने विक्रेते निर्धास्त : धडक मोहीम सुरू करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्लास्टिकचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन राज्य शासनाने प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. काही विशिष्ट प्रकारचे प्लास्टिक वापरणे कायद्यान्वये गुन्हा ठरविला आहे. मागील वर्षी प्रतिबंधित प्लास्टिक पकडण्याची मोहीम हाती घेतली होती. यावर्षी मात्र ही मोहीम थंडावली असल्याचे दिसून येत आहे.प्लास्टिक हा दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. मात्र प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही. त्यामुळे शहरांमध्ये प्लास्टिकचे मोठमोठे ढीग बघायला मिळतात. तसेच प्लास्टिक जाळल्यास मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे सर्व तोटे लक्षात घेता राज्य शासनाने ५० मायक्रोेनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे. याबाबत राज्य शासनाने २ जुलै २०१८ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली. या अधिसूचनेत प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरावर बंदी घातली आहे. राज्य शासनाने परिपत्रक निर्गमित केल्यानंतर महापालिकेने मागील वर्षी परिपत्रक निर्गमित केले. या परिपत्रकानंतर नगर पालिकेने प्लास्टिक व थर्माकोल जप्त करण्याची मोहीम हाती घेतली होती. याला दुकानदारांनीही चांगला प्रतिसाद दर्शविला. त्यानंतर मात्र नगर पालिकेने प्लास्टिक जप्तीची मोहीम जवळपास बंदच केली आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर वाढला आहे.विशेष म्हणजे प्लास्टिक जप्तीबरोबरच नागरिकांमध्ये प्लास्टिकच्या दुष्परिणांमाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. यासाठी नगर पालिका प्रशासनाने विशेष पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.वर्षभरात केवळ पाच क्विंटल प्लास्टिक जप्तप्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने मागील वर्षी पथक तयार केले होते. या पथकाने २०१९ या वर्षभरात सुमारे १२० आस्थानांची तपासणी केली. त्या तपासणीमध्ये ३२ आस्थापनांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर होत असल्याचे दिसून आले. या दुकानांमधून सुमारे ४३९ किलो प्लास्टिक जप्त केली आहे. तसेच त्यांच्याकडून ३६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतर मात्र मोहीम थंडावली आहे.दंड व कारवासाची शिक्षाप्लास्टिक व थर्माकोल बंदीचा कायदा कडक करताना राज्य शासनाने प्लास्टिक व थर्माकोलचा वापर करणाऱ्यांवर दंड व कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद केली आहे. पहिला गुन्हा केल्यास पाच हजार रुपये, दुसºया गुन्ह्यास दहा हजार रुपये व तिसºया गुन्ह्यास २५ हजार रुपये दंड व तीन महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. मात्र या नियमानुसार कारवाई होत नसल्याने शहरात पुन्हा खुलेआम प्लास्टिकचा वापर सुरू झाला आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी मोहीम उघडण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी