शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

हत्तींनंतर रानगव्यांचा धुडगूस; रबी धान केले बुंध्यापासून फस्त, शेतकऱ्यांचे नुकसान

By गेापाल लाजुरकर | Updated: March 9, 2024 19:21 IST

देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात वाघांची दहशत अजूनही कायम आहे.

गडचिरोली: देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात वाघांची दहशत अजूनही कायम आहे. सोबतच रानटी हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांसह वनविभागास सुद्धा जेरीस आणले आहे. हत्तींची दहशत कायम असतानाच आता १२ ते १३ च्या संख्येत असलेला रानगव्यांचा कळप देखील शेतातील धान पिके बुंध्यापासून फस्त करीत आहे. शुक्रवार ८ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव- विहीरगाव जंगलपरिसरातील पिके रानगव्यांच्या कळपाने फस्त केली.

पिंपळगाव- विहीरगाव जंगलाला लागूनच सिद्धार्थ सहारे व सुखदेव शंभरकर यांचे शेत आहे. सध्या त्यांच्या शेतात. रबी धान पीक आहे. शुक्रवारच्या रात्री ८ वाजेच्या दरम्यान रानगव्यांनी शेतात प्रवेश करून दोन्ही शेतकऱ्यांचे धान पीक विळ्याने कापणी केल्यागत फस्त केले. त्यामुळे नांगरणी, चिखलनी,बी-बियाणे खरेदी, रोवणी, रासायनिक खते खरेदी व कीटकनाशके फवारणीचा खर्च वाया गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. हिरवेकंच धानपिके रानटी प्राणी फस्त करून मातीमोल केल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. सदर रानगव्यांचा कळप गत दोन वर्षांपूर्वीपासून पिंपळगाव वनक्षेत्रात वावरत आहे. या कळपाचे नागझिरा अभयारण्यात जाणे-येणे सुरू आहे; परंतु आजवर शेतशिवारातील पिकांची एवढी मोठी हानी झाली नव्हती. दरम्यान झालेल्या नुकसानीचे पंचनामे विहीरगावचे क्षेत्रसहायक कैलास अंबादे यांनी केले. नुकसान भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी वनरक्षक दिगंबर गेडाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष उईके, बाधित शेतकरी सिद्धार्थ सहारे व सुखदेव शंभरकर उपस्थित होते.

रानटी हत्तींसारखीच गव्यांची दिनचर्याविहीरगाव परिसरात वावरणाऱ्या रानगव्यांच्या कळपाची दिनचर्या अगदी रानटी हत्तींसारखीच आहे. दिवसभर जंगलात, रात्री शेतात हा कळप वावरत असतो. धानाचे पीक विळ्याने कापले जावे, अशीच त्यांची चऱ्हाट आहे. त्यामुळे एकदा खाल्लेले पीक पुन्हा वाढण्यासाठी बराच कालावधी लागतो.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली