शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

हत्तींनंतर रानगव्यांचा धुडगूस; रबी धान केले बुंध्यापासून फस्त, शेतकऱ्यांचे नुकसान

By गेापाल लाजुरकर | Updated: March 9, 2024 19:21 IST

देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात वाघांची दहशत अजूनही कायम आहे.

गडचिरोली: देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात वाघांची दहशत अजूनही कायम आहे. सोबतच रानटी हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांसह वनविभागास सुद्धा जेरीस आणले आहे. हत्तींची दहशत कायम असतानाच आता १२ ते १३ च्या संख्येत असलेला रानगव्यांचा कळप देखील शेतातील धान पिके बुंध्यापासून फस्त करीत आहे. शुक्रवार ८ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव- विहीरगाव जंगलपरिसरातील पिके रानगव्यांच्या कळपाने फस्त केली.

पिंपळगाव- विहीरगाव जंगलाला लागूनच सिद्धार्थ सहारे व सुखदेव शंभरकर यांचे शेत आहे. सध्या त्यांच्या शेतात. रबी धान पीक आहे. शुक्रवारच्या रात्री ८ वाजेच्या दरम्यान रानगव्यांनी शेतात प्रवेश करून दोन्ही शेतकऱ्यांचे धान पीक विळ्याने कापणी केल्यागत फस्त केले. त्यामुळे नांगरणी, चिखलनी,बी-बियाणे खरेदी, रोवणी, रासायनिक खते खरेदी व कीटकनाशके फवारणीचा खर्च वाया गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. हिरवेकंच धानपिके रानटी प्राणी फस्त करून मातीमोल केल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. सदर रानगव्यांचा कळप गत दोन वर्षांपूर्वीपासून पिंपळगाव वनक्षेत्रात वावरत आहे. या कळपाचे नागझिरा अभयारण्यात जाणे-येणे सुरू आहे; परंतु आजवर शेतशिवारातील पिकांची एवढी मोठी हानी झाली नव्हती. दरम्यान झालेल्या नुकसानीचे पंचनामे विहीरगावचे क्षेत्रसहायक कैलास अंबादे यांनी केले. नुकसान भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी वनरक्षक दिगंबर गेडाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष उईके, बाधित शेतकरी सिद्धार्थ सहारे व सुखदेव शंभरकर उपस्थित होते.

रानटी हत्तींसारखीच गव्यांची दिनचर्याविहीरगाव परिसरात वावरणाऱ्या रानगव्यांच्या कळपाची दिनचर्या अगदी रानटी हत्तींसारखीच आहे. दिवसभर जंगलात, रात्री शेतात हा कळप वावरत असतो. धानाचे पीक विळ्याने कापले जावे, अशीच त्यांची चऱ्हाट आहे. त्यामुळे एकदा खाल्लेले पीक पुन्हा वाढण्यासाठी बराच कालावधी लागतो.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली