शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

हत्तींनंतर रानगव्यांचा धुडगूस; रबी धान केले बुंध्यापासून फस्त, शेतकऱ्यांचे नुकसान

By गेापाल लाजुरकर | Updated: March 9, 2024 19:21 IST

देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात वाघांची दहशत अजूनही कायम आहे.

गडचिरोली: देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात वाघांची दहशत अजूनही कायम आहे. सोबतच रानटी हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांसह वनविभागास सुद्धा जेरीस आणले आहे. हत्तींची दहशत कायम असतानाच आता १२ ते १३ च्या संख्येत असलेला रानगव्यांचा कळप देखील शेतातील धान पिके बुंध्यापासून फस्त करीत आहे. शुक्रवार ८ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव- विहीरगाव जंगलपरिसरातील पिके रानगव्यांच्या कळपाने फस्त केली.

पिंपळगाव- विहीरगाव जंगलाला लागूनच सिद्धार्थ सहारे व सुखदेव शंभरकर यांचे शेत आहे. सध्या त्यांच्या शेतात. रबी धान पीक आहे. शुक्रवारच्या रात्री ८ वाजेच्या दरम्यान रानगव्यांनी शेतात प्रवेश करून दोन्ही शेतकऱ्यांचे धान पीक विळ्याने कापणी केल्यागत फस्त केले. त्यामुळे नांगरणी, चिखलनी,बी-बियाणे खरेदी, रोवणी, रासायनिक खते खरेदी व कीटकनाशके फवारणीचा खर्च वाया गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. हिरवेकंच धानपिके रानटी प्राणी फस्त करून मातीमोल केल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. सदर रानगव्यांचा कळप गत दोन वर्षांपूर्वीपासून पिंपळगाव वनक्षेत्रात वावरत आहे. या कळपाचे नागझिरा अभयारण्यात जाणे-येणे सुरू आहे; परंतु आजवर शेतशिवारातील पिकांची एवढी मोठी हानी झाली नव्हती. दरम्यान झालेल्या नुकसानीचे पंचनामे विहीरगावचे क्षेत्रसहायक कैलास अंबादे यांनी केले. नुकसान भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी वनरक्षक दिगंबर गेडाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष उईके, बाधित शेतकरी सिद्धार्थ सहारे व सुखदेव शंभरकर उपस्थित होते.

रानटी हत्तींसारखीच गव्यांची दिनचर्याविहीरगाव परिसरात वावरणाऱ्या रानगव्यांच्या कळपाची दिनचर्या अगदी रानटी हत्तींसारखीच आहे. दिवसभर जंगलात, रात्री शेतात हा कळप वावरत असतो. धानाचे पीक विळ्याने कापले जावे, अशीच त्यांची चऱ्हाट आहे. त्यामुळे एकदा खाल्लेले पीक पुन्हा वाढण्यासाठी बराच कालावधी लागतो.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली