शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दिड महिन्यानंतरही लोहखनिजाचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 01:25 IST

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर असलेल्या लॉयड्स मेटल्सच्या लोहखाणींचे काम दिड महिन्यापासून ठप्प पडले आहे. त्यामुळे या कामावर जाणाऱ्या मजुरांची रोजगाराअभावी होरपळ होत आहे.

ठळक मुद्देरोजगाराअभावी मजुरांची होरपळ : अधिकारी, लोकप्रतिनिधींसह कंपनीने फिरविली पाठ?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर असलेल्या लॉयड्स मेटल्सच्या लोहखाणींचे काम दिड महिन्यापासून ठप्प पडले आहे. त्यामुळे या कामावर जाणाऱ्या मजुरांची रोजगाराअभावी होरपळ होत आहे. हे काम तातडीने सुरू करण्यासाठी मजुरवर्गाने उपोषण सुरू केल्यानंतर जिल्हा प्रशासनातील अधिकारी, आमदार व कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मजुरांना काम सुरू करण्यासंदर्भात आश्वासन दिले. मात्र त्याला तीन आठवडे लोटले तरी काम सुरू झाले नसल्यामुळे त्यांचे आश्वासन हवेतच विरते की काय, अशी भावना मजुरवर्गात व्यक्त होत आहे.गेल्या १६ जानेवारीला गुरुपल्ली गावाजवळ लोहखनिज वाहतूक करणाºया एका ट्रक आणि बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातानंतर लोहखनिज काढण्याचे व वाहतुकीचे काम लगेच बंद करण्यात आले होते. पण काम बंद होताच शेकडो मजुरांचे हात रिकामे झाल्याने मजूरवर्गात असंतोष निर्माण झाला.लोहखाणीचे काम सुरू करण्याची मागणी करीत त्यांनी पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाला साकडे घातले. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्यानंतर त्यांनी ५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. तिसºया दिवशी आ.डॉ.देवराव होळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, लॉयड मेटल्सचे उपाध्यक्ष अतुल खाडीलकर यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. बंद असलेले काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मजुरांनी उपोषण मागे घेतले. पण त्या आश्वासनाला तीन आठवडे लोटूनही हाताला काम मिळत नसल्याने मजुरांमधील असंतोष वाढत आहे.घोडे अडले कुठे? कारण गुलदस्त्यातसुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाचे काम सुरु करण्यास लॉयड मेटल्स कंपनी व जिल्हा प्रशासन तयार आहे. परंतू या कामासाठी लागणारे पोलीस संरक्षण मिळत नसल्यामुळे लोहखनिज प्रकल्पाचे घोडे अडल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहखनिज वाहतुकीसाठी स्थानिक स्तरावरील बेरोजगारांना ट्रकचे मालक बनविण्याचे स्वप्न दाखवत आपल्या हाताने ट्रकच्या चाव्या त्यांना दिल्या. परंतू प्रत्यक्षात त्या ट्रकला कामच मिळाले नाही तर त्यांच्या कर्जाचा हप्ता भरणार कसा? अशी शंका उपस्थित होत आहे. दुसरीकडे पुरेशी सुरक्षा मिळाल्यास महिन्यातून २५ दिवस काम देण्याची तयारी कंपनीकडून दाखविली जात आहे. त्यामुळे केवळ पोलीस संरक्षणाअभावी शेकडो मजुरांची मजुरी बुडत आहे, की यामागे अजून दुसरेच कोणते कारण आहे, याबाबत कोणीच जबाबदार व्यक्ती स्पष्टपणे बोलायला तयार नाही.