शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

दिड महिन्यानंतरही लोहखनिजाचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 01:25 IST

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर असलेल्या लॉयड्स मेटल्सच्या लोहखाणींचे काम दिड महिन्यापासून ठप्प पडले आहे. त्यामुळे या कामावर जाणाऱ्या मजुरांची रोजगाराअभावी होरपळ होत आहे.

ठळक मुद्देरोजगाराअभावी मजुरांची होरपळ : अधिकारी, लोकप्रतिनिधींसह कंपनीने फिरविली पाठ?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर असलेल्या लॉयड्स मेटल्सच्या लोहखाणींचे काम दिड महिन्यापासून ठप्प पडले आहे. त्यामुळे या कामावर जाणाऱ्या मजुरांची रोजगाराअभावी होरपळ होत आहे. हे काम तातडीने सुरू करण्यासाठी मजुरवर्गाने उपोषण सुरू केल्यानंतर जिल्हा प्रशासनातील अधिकारी, आमदार व कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मजुरांना काम सुरू करण्यासंदर्भात आश्वासन दिले. मात्र त्याला तीन आठवडे लोटले तरी काम सुरू झाले नसल्यामुळे त्यांचे आश्वासन हवेतच विरते की काय, अशी भावना मजुरवर्गात व्यक्त होत आहे.गेल्या १६ जानेवारीला गुरुपल्ली गावाजवळ लोहखनिज वाहतूक करणाºया एका ट्रक आणि बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातानंतर लोहखनिज काढण्याचे व वाहतुकीचे काम लगेच बंद करण्यात आले होते. पण काम बंद होताच शेकडो मजुरांचे हात रिकामे झाल्याने मजूरवर्गात असंतोष निर्माण झाला.लोहखाणीचे काम सुरू करण्याची मागणी करीत त्यांनी पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाला साकडे घातले. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्यानंतर त्यांनी ५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. तिसºया दिवशी आ.डॉ.देवराव होळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, लॉयड मेटल्सचे उपाध्यक्ष अतुल खाडीलकर यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. बंद असलेले काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मजुरांनी उपोषण मागे घेतले. पण त्या आश्वासनाला तीन आठवडे लोटूनही हाताला काम मिळत नसल्याने मजुरांमधील असंतोष वाढत आहे.घोडे अडले कुठे? कारण गुलदस्त्यातसुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाचे काम सुरु करण्यास लॉयड मेटल्स कंपनी व जिल्हा प्रशासन तयार आहे. परंतू या कामासाठी लागणारे पोलीस संरक्षण मिळत नसल्यामुळे लोहखनिज प्रकल्पाचे घोडे अडल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहखनिज वाहतुकीसाठी स्थानिक स्तरावरील बेरोजगारांना ट्रकचे मालक बनविण्याचे स्वप्न दाखवत आपल्या हाताने ट्रकच्या चाव्या त्यांना दिल्या. परंतू प्रत्यक्षात त्या ट्रकला कामच मिळाले नाही तर त्यांच्या कर्जाचा हप्ता भरणार कसा? अशी शंका उपस्थित होत आहे. दुसरीकडे पुरेशी सुरक्षा मिळाल्यास महिन्यातून २५ दिवस काम देण्याची तयारी कंपनीकडून दाखविली जात आहे. त्यामुळे केवळ पोलीस संरक्षणाअभावी शेकडो मजुरांची मजुरी बुडत आहे, की यामागे अजून दुसरेच कोणते कारण आहे, याबाबत कोणीच जबाबदार व्यक्ती स्पष्टपणे बोलायला तयार नाही.