शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दिड महिन्यानंतरही लोहखनिजाचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 01:25 IST

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर असलेल्या लॉयड्स मेटल्सच्या लोहखाणींचे काम दिड महिन्यापासून ठप्प पडले आहे. त्यामुळे या कामावर जाणाऱ्या मजुरांची रोजगाराअभावी होरपळ होत आहे.

ठळक मुद्देरोजगाराअभावी मजुरांची होरपळ : अधिकारी, लोकप्रतिनिधींसह कंपनीने फिरविली पाठ?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर असलेल्या लॉयड्स मेटल्सच्या लोहखाणींचे काम दिड महिन्यापासून ठप्प पडले आहे. त्यामुळे या कामावर जाणाऱ्या मजुरांची रोजगाराअभावी होरपळ होत आहे. हे काम तातडीने सुरू करण्यासाठी मजुरवर्गाने उपोषण सुरू केल्यानंतर जिल्हा प्रशासनातील अधिकारी, आमदार व कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मजुरांना काम सुरू करण्यासंदर्भात आश्वासन दिले. मात्र त्याला तीन आठवडे लोटले तरी काम सुरू झाले नसल्यामुळे त्यांचे आश्वासन हवेतच विरते की काय, अशी भावना मजुरवर्गात व्यक्त होत आहे.गेल्या १६ जानेवारीला गुरुपल्ली गावाजवळ लोहखनिज वाहतूक करणाºया एका ट्रक आणि बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातानंतर लोहखनिज काढण्याचे व वाहतुकीचे काम लगेच बंद करण्यात आले होते. पण काम बंद होताच शेकडो मजुरांचे हात रिकामे झाल्याने मजूरवर्गात असंतोष निर्माण झाला.लोहखाणीचे काम सुरू करण्याची मागणी करीत त्यांनी पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाला साकडे घातले. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्यानंतर त्यांनी ५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. तिसºया दिवशी आ.डॉ.देवराव होळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, लॉयड मेटल्सचे उपाध्यक्ष अतुल खाडीलकर यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. बंद असलेले काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मजुरांनी उपोषण मागे घेतले. पण त्या आश्वासनाला तीन आठवडे लोटूनही हाताला काम मिळत नसल्याने मजुरांमधील असंतोष वाढत आहे.घोडे अडले कुठे? कारण गुलदस्त्यातसुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाचे काम सुरु करण्यास लॉयड मेटल्स कंपनी व जिल्हा प्रशासन तयार आहे. परंतू या कामासाठी लागणारे पोलीस संरक्षण मिळत नसल्यामुळे लोहखनिज प्रकल्पाचे घोडे अडल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहखनिज वाहतुकीसाठी स्थानिक स्तरावरील बेरोजगारांना ट्रकचे मालक बनविण्याचे स्वप्न दाखवत आपल्या हाताने ट्रकच्या चाव्या त्यांना दिल्या. परंतू प्रत्यक्षात त्या ट्रकला कामच मिळाले नाही तर त्यांच्या कर्जाचा हप्ता भरणार कसा? अशी शंका उपस्थित होत आहे. दुसरीकडे पुरेशी सुरक्षा मिळाल्यास महिन्यातून २५ दिवस काम देण्याची तयारी कंपनीकडून दाखविली जात आहे. त्यामुळे केवळ पोलीस संरक्षणाअभावी शेकडो मजुरांची मजुरी बुडत आहे, की यामागे अजून दुसरेच कोणते कारण आहे, याबाबत कोणीच जबाबदार व्यक्ती स्पष्टपणे बोलायला तयार नाही.