शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

उन्नतीचे दालन

By admin | Updated: June 15, 2014 23:31 IST

मानव विकास मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण वाढविण्यासाठी ११ जिल्ह्यातील ३७ शेतकरी गटांना पॉवर टिलर, भात रोवणी, कोनोविडर, युरीया ब्रिकेट अप्लीकेटर व भात

कृषी यंत्र बँक : ३७ शेतकरी गटांनी धरली यांत्रिकीकरणाची कासगडचिरोली : मानव विकास मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण वाढविण्यासाठी ११ जिल्ह्यातील ३७ शेतकरी गटांना पॉवर टिलर, भात रोवणी, कोनोविडर, युरीया ब्रिकेट अप्लीकेटर व भात कापणी आदी पाच यंत्रे ९० टक्के सवलतीवर पुरविण्यात आली आहे. कृषी विभागाच्या पुढाकाराने या शेतकरी गटांसाठी कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे. हे ३७ शेतकरी गट कृषी यंत्र बँक सेवा सुरू करणार असल्याने कृषी यंत्र बँक उन्नतीचे दालन ठरणार आहे. कोरची, कुरखेडा, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा या तालुक्यात प्रत्येकी ५ शेतकरी गटाची स्थापना करण्यात आली आहे.तर धानोरा तालुक्यात १, एटापल्ली २, भामरागड १, अहेरी २, सिरोंचा तालुक्यात एका शेतकरी गटाची स्थापना करण्यात आली आहे. या ३७ शेतकरी गटांना मानव विकास मिशन अंतर्गत कृषी विभागामार्फत शेती लागवडीची पाच यंत्रे ९० टक्के अनुदानावर पुरविण्यात आली आहे. सदर यंत्रााचा वापर शेती कामात कसा करायचा, याबाबतचे प्रशिक्षण कृषी विभागाने या गटातील शेतकऱ्यांना दिले आहे. हे शेतकरी गट यंदाच्या खरीप हंगामापासून सामुहिकरित्या यांत्रिकीकरणाद्वारे आधुनिक शेती करणार आहेत. या पलिकडेही रोवणी, कापणी, मळणी या कामासाठी त्यांच्याकडे असलेल्या कृषी यंत्र बँकेतून यंत्राचा पुरवठा भाडे तत्वावर करणार आहेत. जिल्ह्यात शेती लागवडीच्या कामासाठी दरवर्षी मजुराची टंचाई भासते. गडचिरोली शहरातून परिसरातील खेडेगावात दरवर्षी ट्रॅक्टर, आॅटो व इतर वाहनामध्ये बसवून रोवणी करण्यासाठी महिला मजुरांना नेले जाते. यात शेतकऱ्यांना वाहनाचे भाडे व वाढलेली मजुरी द्यावी लागते. परिणामी शेती लागवडीचा खर्च वाढतो. मजुराच्या टंचाईवर मात करून कमी खर्चात फायद्याची शेती व्हावी यासाठी यावर्षीपासून कृषी विभागाने यांत्रिकीकरणाचे पर्व जिल्ह्यात सुरू केले आहे. यंदा पहिल्या वर्षी ३७ शेतकरी गटांचे कृषी यंत्र बँकेतून आर्थिक स्वावलंबन व सक्षमीकरण करण्याचे उद्दीष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. पुरूष शेतकरी गटांसोबतच महिला शेतकरी गटांनाही पुढील वर्षापासून मानव विकास मिशन अंतर्गत कृषी यंत्र ९० टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार असून त्यांचेही सक्षमीकरण करण्याचा मानस कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यंत्राद्वारे शेतीची पूर्व मशागत, चिखलणी, रोवणी, निंदणी व कापणी आदी सर्व कामे करण्यात येणार आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ५०० हेक्टर क्षेत्रात यंत्राद्वारे भात पिकाची लागवड करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)